सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या २३०१ ते २४००

विकिस्रोत कडून

<poem> ऐसें ऐकतांचि रविदत्तासी । अति आल्हाद जाहला चित्तासी ।साष्टांग नमितसे चरणासी । प्रदक्षणा करी ॥१॥पुढें बद्धांजुळी जोडुनी । विनवीत मंद मंद वाणी । जी जी स्वामी कृपा करोनि । दीना उपदेशिलें ॥२॥हे स्फुरणापासून बत्तीस । देहत्रयात्मक पंचकोश ।याहून आत्मा तूं चिदंश । हें हें भ्रमें दिसे ॥३॥हें सत्य सत्य जी सप्रमाण । हें अनात्मजात मी नव्हे संपूर्ण ।तोचि आत्मा सच्चिद्धन । निजांगें ब्रह्म ॥४॥यांत अन्यथा कधीं न घडे । वाजती श्रुतीचे चौघडे ।परी हे सारे दिसती रोकडे । ज्ञानाचे दृष्टीं ॥५॥तैसा आत्मा सच्चिद्रूप । अनुभवासी न ये अल्प ।तरी निश्चयाचा साक्षेप । कैसा करावा ॥६॥तस्मात् केवळ स्वरूप स्वभावें । केवढें किती तें अनुभवावें ।जाणिल्यावरी निजांगें व्हावें । या रीतीं आज्ञा ॥७॥परी आधीं जाणिल्यावीण । कवणिया निश्चयें अंगें होणें ।तस्मात् मज दीनासी करावें पावन । माझें निजरूप मज द्यावें ऐशी प्रार्थना सच्छिष्याची । ऐकून वृत्ति तुष्टली गुरूची । प्रतीति बाणवूं पाहे आतांचि ।ऐसें बोलून आलिंगिलें ॥९॥परी आरंभीं आत्मा ब्रह्म । किती उघडा ऐस परम ।हें हें दिसें जें रूप नाम । जाहलेंचि नाहीं तेंचि आहे ॥२३१०॥जैसें अलंकारीं सुवर्ण । अंतर्बाह्य परिपूर्ण । नग नाहींच जाहले उत्पन्न । आहें तें सुवर्णचि ॥११॥तैसें नाम रूप वाउगें कल्पिलें । तें काय दिसावया योग्य खरें जाहलें ।अधिष्ठान मात्र तें न जाय लोपलें । कवणेंही काळीं ॥१२॥तस्मात् रविदत्ता आत्मयाचे । जितुकें उघडेपण साचे ।तितुकें नव्हे या पंचकोशाचें । जीवेशासहित ॥१३॥आणि ब्रह्मात्मयाची जितुकी व्याप्ति । इतुकी जीवेशाची नव्हे वस्ती ।तेचि कैशी ऐकें एकाग्र मतीं । सप्रतीत सांगू पुढें आपोआप तुझा तुजला । स्वानुभव जाईल बिंबला । परी प्रस्तुत साधने श्रवणाला ।चित्त हें करावें ॥१५॥रूपरसादीनांविकल्पनेसाएवअनुवर्तते ॥रूप म्हणजे ईशादि ईशनिर्मित । रसादि विकल्प ते जीवकृत ।या इतुकीयांचे ठायीं एकचि वर्तत । ते चित्कळा निश्चयें ॥१६॥ईशादि तृणांत या सर्व रूपीं । आणि रसादि जीवकृताचे विकल्पीं ।आत्मा ब्रह्मचि सच्चिद्रूपी । व्यापून असे ॥१७॥ब्रह्मत्मयाचे ठाईं प्रथम । वाउगा स्फुरणासी जाहला उद्भम ।जाहला परी तोचि नाशिला भ्रम । कार्यानुमेय कल्पिला ऐसी स्फूर्ति तेचि मूळमाया ।होऊन दिसतसे वायां । जैशी शुक्तिकाची एक असोनियां ।भ्रमें रजत भासे ॥१८॥रजत नाहीं आणि दिसेना । तेवीं मूळ माया न दिसे असेना ।शिंप जैसी दिसे आहेपणा । तेवीं ब्रह्म सच्चिद्रूप आहे शिंप दिसे शिंप ।तेवी ब्रह्म असे भासे सच्चिद्रूप । रजत नाही दिसे आरोप । तेवीं माया नाहीं न दिसे ॥२१॥एवं मायेसी निस्तत्त्व अभान । ब्रह्म तें अस्तित्वें भासमान ।या उभयतांचेंही स्वभावलक्षण । येणेंरीतीं अकृत्रिम ।तस्मात् ब्रह्म आत्माचि स्फुरणीं आहे । स्फूर्तिरूप माया पहातां न लाहे । तरी रविदत्ता उघडें पाहे ।विचारें ब्रह्म ॥२३॥शिंप जैशी उघड भासे । इतुकें रजतपण कोठें असे ।ब्रह्मात्मरूप तें सिद्ध ऐसें । माया नाहीं गा नाहीं ॥२४॥तया मायेच्या दोन शक्ति । विद्या अविद्या नाम पावती ।परी त्या कवणें रीतीं रूपा येती । कारण तेवींच कार्य ॥२५॥जैसें शिंपींचें न कळणें । दुसरें रजताचें उत्पादन । तैसें एक निजरूपाचें विस्मरण । दुजें उभवी जगा ॥२६॥हेंचि विद्या अविद्येचें लक्षण । यासि कोणतें असे आहेपण ।जेवीं काय असे शिंपीविण । तेवीं स्वरूपाविण काय ॥२७॥आहे स्वरूपप्रतीति स्वरूपाची । निस्तत्त्वता विद्या अविद्येची ।तेवींच प्रतीतिही नव्हेची । नसती म्हणोनी ॥२८॥तस्मात् विद्या अविद्या अमुक परी । दावावया नसती निर्धारी ।तया अविद्या विद्येमाझारीं । जीवेश बिंबले ॥२९॥जरी प्रतिबिंब ब्रह्मात्मयाचें । परी नाहींपण विद्या अविद्येचें ।तरी जीवेशासी रूप कैचें । मृगजल मीनापरी ॥ब्रह्मात्मयाचा आहेपणा । तेणें प्रतिबिंब दिसती नयना ।ब्रह्मात्मा चिद्रूपें देखणा । तो प्रकाश उमटे जीवशीवीं ॥३१॥निजात्मयाची सुखरूपता । उमटली जीवेशांसी तत्त्वतां ।येऱ्हवीं या उभयांसी पाहतां । रूपचि नाहीं ॥३२॥रूप नाहीं या नांव असत् । रूपेंवीण चेतन कवणा येत ।म्हणोनि जें का परप्रकाशयुक्त । तें जडचि खरें ॥३३॥ऐसिया निस्तत्त्व जडासी । सुखरूपता असे कैशी ।सुखदुःखाचिये मिरासी । राहणें जया ॥३४॥तस्मात् जीवेश दुःखरूप । तया कैचें सच्चिदानंदरूप ।वाउगा भासला प्रतिभासा आरोप । मुख्य स्वरूपाचा जेवीं दर्पणीं मुख्य सूर्याचें । प्रतिबिंब पडिलें जेवीं साचें । वाटोळें प्रकाशित तरी तें कैचें ।असे सत्य ॥३६॥तैसेचि जीवेश हे दोन्ही । निस्तत्त्वें पाहती मुख्य ज्ञानी । येरव्हीं सत्य मानिजे अज्ञानीं । बाळपणीं प्रतिबिंब खरें ॥३७॥असो ब्रह्मात्माची एकरूप । जाहलाचि नाहीं जीवेश आरोप ।तस्मात् नाहींच तयासी कैचें रूप । आहे तेंचि आहे ॥३८॥एवं विद्या अविद्यात्मक मायास्फूर्ति । आणि जीवेश प्रतिभास भासती ।ऐसे पांच प्रकार एकत्र वसती । तो आनंदमय हाचि कारण समष्टीचा ।तोचि पृथक जाहला व्यष्टीचा । यासी ब्रह्मात्मयावीण कैंचा । असे प्रभाव ॥२३४०॥ऐसिया आनंदमयापासूनी । भूतभौतिकांची उभवणी । प्रथम आकाश जाहलें दृश्यपणीं । तें पहावें विचारें ॥४१॥गगनींही आहेपणा ब्रह्मींचा । म्हणोनि आकाश आहे बोलिजे वाचा ।जेवीं रजतासी आहेपणा शिंपीचा । तेवीं सद्रूपा आकाश नांव ॥४२॥शिंपीचा आहेपणा त्यागूनी । रजत घेतां न ये जोखुनी । तैसें ब्रह्म सद्रूपावांचोनी । गगन दृश्य होय कैसें ॥४३॥तस्मात् वाउगें गगन नाम ठेविलें । परी तें निस्तत्त्वपणें नाथिलें ।आहे तें ब्रह्म सद्रूप संचलें । दिसतांही जरी ॥४४॥ऐसें असतां केवढें अज्ञान । खरेंच केलें नसोनि गगन । परी ज्ञाते जाणती नाहींच म्हणून । आहे तें ब्रह्मरूप ॥४५॥जैसें मृगजळ दिसे उखरीं । तें सत्य मानिती मृगें सारीं ।परी जे विवेकी दिसतांही नेत्रीं । सत्य कधी मानिती ना ॥४६॥तैसें अज्ञानें जें सत्य भाविलें । तें ज्ञानया नवचे सत्य जाहलें ।गगन नाहींच एक निर्धारिलें । सत्य ब्रह्म आत्मरूप ॥ऐसेचि वायु तेज आप भूमि । निस्तत्त्व पहावे अनुक्रमीं ।एक सद्रूप असे रूपनामीं । दुजा भाव असेना ॥४८॥येक शीत चांचपावें । सर्व भिन्न भिन्न नलगे पहावें ।तैसें आकाश विवेचितां समजावें । चारी भूतें निस्तत्त्व ॥४९॥भूतांपासून जन्मल्या खाणी । त्या पंचप्रकारें दिसती नयनीं ।जारज अंडज स्वेदज हे तिन्ही । उद्रिज्ज मानसिक पांचवी ॥५०॥ एवं दशधा जड प्रकार । आकाशापरी निस्तत्त्व समग्र ।हें नाहींच एक निर्विकार । अस्तिभातिरूपें ॥५१॥तया एकेक देहीं भिन्न भिन्न । राहिला वर्ते जागरीं स्वप्न ।तया सूक्ष्मदेहाचें लक्षण । सत्रा प्रकारें ॥५२॥ते एकचि वृत्ति विभागली । भिन्न भिन्न सत्रा प्रकारें जाहली ।ते साकल्यत्वें पूर्वीं निरोपिली । जीवत्वासहित ॥असो चंचळ सत्रा प्रकार । हेही निस्तत्त्व पाहतां विचार ।वाउगा भास मात्र दिसे विखार । जैसा रज्जूवरी ॥५४॥स्वरूपाचे अस्तित्वें आहे । स्वरूपाचे भानें दिसूं लाहे ।स्वरूप निर्धारितां यासी न साहे । आहेपणा किमपि ॥५५॥मग सत्राही निस्तत्त्वरूप । भासतीही न किंचित् अल्प ।एक ब्रह्मात्मा सच्चिद्रूप । आदि अंतीं तेवीं मध्यें ॥५६॥एवं बत्तीस तत्त्वें भिन्नभिन्न । निस्तत्त्वपणें भासमान । या इतुकियांतही परिपूर्ण । चित्प्रभा वर्ते ॥५७॥स्फूर्तीपासून कीटकापर्यंत । बत्तीस तत्त्वांचा केला संकेत ।परी त्रिगुण नाहीं आले आंत । कल्पील कोणी ॥५८॥तरी गुण हे धर्मवृत्तीचे । जेवीं विकार कामादिकांचे तेवी गुणदोषांत गणन त्यांचें ।परी रूपें बत्तीस ॥५९॥असा बत्तीसही नामरूपात्मक । सर्वही असज्जड दुःखात्मक ।ब्रह्मात्मा परिपूर्ण व्यापक । अनुस्यूत सर्वत्रीं ॥व्यापक म्हणतां भावील कोणी । कीं हे पदार्थही असती सत्यपणीं ।या अंतबार्ह्य राहिला व्यापोनी । तरी ऐसें नव्हे ॥६१॥जैसें सुवर्ण नगा आंत । कीं अंतर्बाह्य मृत्तिका घटांत । घट नग नाहींतचि किंचित् । सुवर्ण मातीच सारी ॥६२॥तैसें परब्रह्म पदार्थमात्रीं । पदार्थ नाहींतचि तिळभरी ।रजत नाहींच शिंपचि सारी । कीं तरंगीं जीवन ॥६३॥ऐशिया दृष्टांता पडिपाडें । ब्रह्मात्म तत्त्वचि उघडें । अन्य पदार्थ किंचित न जोडे । परी भ्रमें भासती ॥६४॥यासी विवर्तात्मक म्हणावें । न होतां वाउगेंचि कल्पावें ।परी कारणचि अंतर्बाह्य आघवें । भ्रमें दिसताही ॥६५॥या भ्रमाचें मात्र निरसन । व्हावें यथार्थाचें ज्ञान होऊन ।तेव्हां नामरूपें जाती निपटून । मग उघड आत्मा ब्रह्म एवं स्फूर्तीपासून देहापर्यंत ।बत्तीस तत्त्वांचा संघात । नामरूपें मात्र दिसत ।परी एक ब्रह्म आत्मा ॥६७॥यापरी बत्तिसांचे रूपी । अनुस्युत ब्रह्मात्मा चिद्रूपी ।तैसाचि गुणदोषांचेही संकल्पीं । अन्वयरूपें असे ॥६८॥जो जया योनींत जन्मला । तितुका देह भोक्तेपणें जाहला ।येर खाणीसी कीं भूतांला । भोग्यत्वें कल्पी ॥६९॥तेचि रसादि पंचविषय । भोग्य करून भोगिता होय ।इकडे एका देहीं जितुका समुदाय । एक होऊन भोक्ता जाहाला ॥७०॥आनंदमयींच कोश भोक्ता । परी तेथें असे निर्विकल्पता । म्हणोनि सत्रा तत्वें मानितां । भोक्ता होय सूक्ष्म ॥७१॥परी सूक्ष्मासीही स्थूलाविण । व्यापारीं न घडेचि वर्तन ।म्हणून स्थूलासहित संपूर्ण । भोक्ता जाला ॥७२॥वृत्ति उठोन इंद्रियद्वारा । येत असे विषया सामोरा ।तेथें चांगुलें वाईट करी त्वरा । हे कल्पना जीवित्वाची ॥७३॥हेचि गुणदोषात्मक जागृति । तैशीच स्वप्नाचीही रीती ।कल्पनेचे अभावीं ते सुषुप्ति । परी तेही गुणदोषात्मक ॥एवं तिहीं स्थळींची जे क्रीडा । विकल्पीं ब्रह्मात्मा उघडा ।व्यापक परी विकल्पाचा शिंतोडा । न स्पर्शे सहसा ॥७५॥ऐसा बत्तीस तत्त्वांचे रूपीं । अथवा गुणदोषांचे विकल्पीं ।आत्मा ब्रह्म सच्चिद्रूपी । अंतबाह्य व्यापक ॥७६॥इतुकी व्यापकता असे कवणासी । जरी ईशासहित या बत्तिसी ।स्थूल तो असे एकदेशी । जो हा मांसमय ॥७७॥ऐसाचि चारी खाणीसह मानसिक । म्यां योनी निर्मिल्या पृथक पृथक । त्या कधींच न होती व्यापक ।संचरती एकदेशी ॥७८॥सप्तद्वीपवती पृथ्वी । त्रिलोकात्मक आघवी । परी सीमा सरतां पुढें नसावी । तरी व्यापक नव्हे ॥७९॥जीवन कोठें असे कोठें नसे । जरी आवरणही विस्तीर्ण दिसे ।परी पुढें मागें पाहतां नसे । म्हणोन व्यापक नव्हे ॥प्रगटे विझे तो हा अग्र । आवरणरूपी जो भासमान । परी अमुक ऐशी होय गणन । दशगुणें उणा वायूसी ॥८१॥वायूही उत्पन्न होय तेव्हां असे । वितळून जातां कोठें न दिसे ।आवरणासिही सीमा दिसे । म्हणोनि व्यापक नव्हे आकाश जरी स्वरूप सम । तरी तें भासलें ब्रह्मासी नाम । परी शब्दगुणी गगनाचा नेम । तें तो व्यापक नव्हे ॥८३॥असो देह आंत जो प्राण । जो पंचधा पावला चळण । तो देहाबाहेरी न करी गमन । तरी व्यापकता कैंची ॥८४॥कर्मेंद्रियांची गोलकीं वस्ती । तेथूनिचि क्रिया करिती ।तैशींच ज्ञानेंद्रियें विषय घेती । ठाईंच राहूनी ॥८५॥मन धांवे ब्रह्मांडा आंत । परी एकदेशीं उसळूनि मरत ।अष्ट दिशांसी व्यापिना समस्त । तरी तें व्यापक कैसें मना ऐसाचि बुद्धीचा निश्चय । एकदेशीच होतसे प्रत्यय । तयेसी व्यापकत्व म्हणूं नये ।जे नासे क्षणक्षणीं ॥८७॥आतां बुद्धिगत जो जीव । येणें स्फुरवावा किंचिद्भाव । परी तेव्हांचि लय होतसे सदैव । नाहीं आणि एकदेशीं ॥विद्या अविद्या माया स्फूर्ति । याची तों एकदेशी उत्पत्ति ।तरी ते सर्वत्रीं कैंची व्याप्ति । म्हणोनि अव्यापक ॥८९॥ईश नुसधी करी प्रेरणा । परी बुद्धि ऐलीकडे असेना ।मायेपैलीकडे दिसेना । तरी व्यापकता कैंची ॥२३९०॥ईशाऐसाचि कारणरूप जीव । एकदेशीय होतसे उद्भव ।तस्मात् बत्तीस जे हें रूप नांव स्वरूपीं एकदेशी ॥९१॥आणि हे असज्जड दुःखात्मक । वाउगेंचि भासलें अनेक ।तें कैसें होईल व्यापक । ब्रह्मात्मयासम ॥९२॥आपुले अस्तिभातिप्रियत्वानें । मायेपासून तृणांत व्यापणें ।शेखीं असंभाव्य परिपूर्णपणें । अगणित मायातीत ॥९३॥तयाची कोण करील मर्यादा । बोलतां मौन पडे वेदा ।तेथें एकदेशी वाणीचे संवादा । आकळे कैसा ॥९४॥परी बोलल्यावीण कळेना । म्हणोनि यथामति कीजे वल्गना ।अगा रविदत्ता सावध मना । ऐसा ब्रह्मात्मा तूं एक ॥हे बत्तीस नाहींतचि तुजवरी । तूंचि एकला एकचि निर्विकारी ।पाहे उघडा आणि अससी अंतरीं । जेवीं अळंकारीं हेम सुवर्ण उघडें कीं नग उघडे । ऐसें विचारें पाहें कोडें । या बत्तिसांसी अस्तित्व न जोडे ।तूंचि सघन एकरसी ॥९७॥आतां तुझी कल्पना ऐशी । कीं प्रत्यक्ष अनुभवावें आपणासी ।तरी तो अनुभव व्हावा कवणासी । तुजसी किंवा बत्तिसां जरी बत्तिसांतून एकादिया ।शक्ति होईल जाणावया । तरी उणीवता येईल वेदराया ।आणि अनुभव युक्तीसीही ॥जेणें सवा स्वप्रकाशें जाणिजे । तो कवणें जडें पाहों लाहिजे ।ऐशी वेदवचनें असती जें जें । तयां बाध आला ॥२४००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.