सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या १६०१ ते १७००

विकिस्रोत कडून

<poem> परी पाहणें धर्म तिचा विद्यावृत्तींत जें बिंबलें । ईश हें नाम तया आलें । सर्वज्ञ सर्वशक्तिमान उमटले । धर्मही तेथें ॥१॥उगीच प्रेरणा करावी । कर्मसुत्रें स्फूर्ति द्यावी । हाचि धर्म असे स्वभावीं । नियंतृत्वें ईशाचा ॥२॥येथें कोणी आशंका करिती । कीं ईश प्रेरिता जीवाप्रति । तरी होणार तें न चुके कल्पांतीं । मग जीवाचा यत्न व्यर्थ तरी अवधारा याचें उत्तर । होणार तें न चुके अनुमात्र । परी प्रयत्न करिती जे नर । हाही भोग सुखदुःखाचा ॥४॥मग पुरुषप्रयत्न काय राहिला । म्हणसी तरी ऐके या बोला । प्रवृत्तिरूप भोग जीवाला । येविषयीं प्रयत्न नको ॥५॥होणार ते अन्यथा न घडे । न होणार तें नव्हे कोडें । हा नेमचि असे प्रवृत्तीकडे । तो न करो करो प्रयत्न ॥६॥तस्मात् प्रयत्न प्रवृत्तीचा न करावा । घडणार तें घडेल स्वभावा । परंतु निवृत्तिरूप मोक्ष स्वभावा । प्रयत्नेंवीण नव्हे प्रारब्धाधीन मोक्ष नाहीं । कारण कीं अभोक्ता आत्मा विदेही । तो कळावा विचारें निःसंदेहीं । तेथें सुखदुःखें आटतीं सुखदुःख होणें तें प्रारब्धें घडे । कर्महानि प्रारब्धें केवीं जोडे । तस्मात् परमार्थप्राप्ति घडे । श्रवणादि प्रयत्नें ॥९॥अमुक करीन जीवा उद्भवे । तेंचि ईश्र्वरें यया साह्य व्हावें । तरी मग अपौरुषत्व संभवे । जीवासी कैसें ॥१६१०॥असो धर्मधर्मी सांगत असतां । मध्यें आलें तें बोलिलें तत्त्वतां । जीवाचा धर्म ऐके आतां । ईश प्रेरिता सहज ॥११॥अविद्येमाजीं बिंबला असे । तया नेणिवेसीही स्फुरवीतसे । पुढें बुद्धि प्रगटतां अपैसें । तेही भासवी विषयांत ॥१२॥हें पुढें बहुधा निरूपण । जीवाचें रूप स्पष्टतर होणें । परंतु जीवाचा धर्म स्फुरवणें । बुद्धींत बिंबून बुद्धीसी ॥१३॥एवं सहजत्वें वृत्ति जे निर्विकारी । उठली जळीं जेवीं लहरी । तयेचे प्रकार बोलिजे चारी । जीव ईश विद्या अविद्या तया वृत्तीचा जो परिणाम । संकल्परूप मनोधर्म । होय नव्हे संशय परम । हेचि मनाचे स्वभाव ॥१५॥संशय न फिटतां ध्यास लागे । वारंवार स्मरतें वाउगे । तेंचि चित्त भिन्न दिसे प्रसंगें । परी तें मनचि ॥१६॥अमुक होय अथवा नव्हे अमुक । निश्चय करी धर्म हा एक । तेचि बुद्धि निश्चयात्मक । धर्माधर्मीं भेद नाहीं ॥१७॥दुसरा धर्म एक बुद्धीचा । करणें न करणें अभिमान साचा । तो अहंकार नामें वेगळा कैंचा । बुद्धीहूनी ॥१८॥एवं अंतःकरणचतुष्टय । नामें परी असती द्वय । मनोमय विज्ञानमय । कोश दोन्हीं ॥१९॥कोश म्हणजे आहे जें रूप । तें आच्छादून भावावें दुजें अल्प । तयाचि नांवें जाणिजे विक्षेप । जग उद्भवासी ॥२०॥तेचि अंतःकरणवृत्ति उद्भवे । इंद्रियद्वारा विषयीं धांवे । ते पांच प्रकार तया म्हणावें । ज्ञानेंद्रिय ऐसें ॥२१॥श्रोत्रें बरा अथवा वाईट । शब्द ऐकावा हा धर्म स्पष्ट । मृदु कठिण ओळखणें अविट । हा धर्म त्वचेचा ॥२२॥चांगलें ओंगळ रूप पहावें । हा चक्षूचा धर्म स्वभावें । तीक्ष्णादि सर्व रस घ्यावे । हा धर्म जिव्हेचा ॥२३॥सुगंध दुर्गंध घ्यावा । निवडून । यया धर्मासीच नाम हें घ्राण । एवं ज्ञानेंद्रियपंचकै कडून । पंच विषय घ्यावे ॥२४॥उगेचि कांही कळणे नसतां । जडत्वें वावरती देहा आंतौता । अन्नरसा पचवून । समस्तां । देहा पुष्टी द्यावी ॥२५॥क्षुधा तृषा जयाच्या विहरणें । मना इंद्रियां जयांत राहाणें । देहालागींही होय जिणें । हे धर्म प्राणाचे ॥२६॥या प्राणयोगें कर्मेंद्रियासी । वर्तणें असे स्वस्वक्रियांसी । प्राण कर्मेंद्रिय प्राणमय कोशीं । असती दहा ॥२७॥वाचेंनीं वर्णोच्चार करावा । शब्द तितुका मुखीं बोलावा । हा धर्मचि वाणीचा जाणावा । जेणें प्रवृत्ति निवृत्ति चाले घ्यावें द्यावें पदार्थांसी । हा धर्म असे पाणींद्रियांसी । गमन करवावें स्थूलदेहासी । हा धर्म पादांचा ॥२९॥मैथुनानंद प्रजोत्पादन । हा उपस्थेंद्रियाचा धर्म होणें । मलोत्सर्ग सर्वही करणें । गुदाचा धर्म हा ॥१६३०॥एवं स्फुरणादि कर्मेंद्रियांत । जितुकीं चंचंल तत्त्वें समस्त । तितुकींही धर्मधर्मीसहित । जलापरी सांगितलीं ॥३१॥उगेंचि जडपणें असावें । दृश्यत्वें वाईट बरें दिसावें । विकारें वाढावें मरावें । हा धर्म देहाचा ॥३२॥घटापरी उत्पत्ति नाश । जड पराधीन दृश्य । हा स्वभावचि विशेष । साकारमात्राचा ॥३३॥असो स्थूळ घट सूक्ष्म जल । त्यांत प्रतिबिंब तो जीव केवळ । ऐसेचि जाणावे पिंड सकळ । ब्रह्मादि कीटकांत ॥३४॥सर्वांमाजीं तत्त्वें इतुकीं । धर्मधर्मीसहित निकीं । असतीं न होतीं न्यूनाधिकीं । स्थूल सान थोर जरी ॥३५॥जैसे धातु खापरें शेणाचे घट । सान किंवा असोत मोठे । परी जल आणि प्रतिबिंब गोमटें । सर्वांमाजीं सारिखें ॥३६॥तैसे देव मानव कीटकांचे । साकार सान थोर सर्वांचें । परी सूक्ष्म तत्त्वेंसहित जीवाचें । एकरूप सर्वों ॥३७॥ऐशीं नाना पिंडें जंगमाचीं । आणि साकारता सर्व स्थावराची । जया ब्रह्मांडीं वस्ती इतुक्यांची ं तीं पंचमहाभूतें जड सर्व घटासहित सप्राकार मठ । इतुकियांतही एक आकाश दाट । पातळ व्यापलें अविट । एक रेणु रिता नाहीं ॥३९॥घट जल प्रतिबिंबासहित । सर्वही मुख्य आकाशें व्याप्त । परंतु सर्वही विकारासहित । संचलेपणें असे ॥१६४०॥तैसें ब्रह्मात्मत्व सघन । सच्चिदानंद परिपूर्ण । मायादि तृणांत जें निर्माण । व्यापून असे ॥४१॥पंचमहाभूतें व्यापिलें । सर्व ब्रह्मांड जें दृश्यत्वें रचिलें । त्यांतील सान थोर देह दाटले । ब्रह्मात्मयानें ॥४२॥सूक्ष्म तत्त्व तें जितुकें सांगितलें । त्यांत जीवेशही प्रतिबिंबले । हें इतुकेंही व्यापून ठेलें । निश्चल पूर्ण ॥४३॥ऐसें सच्चिदानंद व्यापक । अन्वयें अनुस्यूत एक । हें निरूपण निश्चयात्मक । पुढील पदीं असे ॥४४॥येथें रूप नाम जें जें उद्भवलें । अथवा रूपरसादि दृश्य जेतुलें । इतुक्यांचे धर्माहून भिन्न संचलें । हें निरूपण या पदीं ॥४५॥सर्व धर्मधर्मी कळल्याविण । स्वस्वरूप केवीं कळे विलक्षण । यास्तव सदृष्टांत केलें निरूपण । जें जें रूप जयाचें ॥४६॥आतां रविदत्ता जें स्वस्वरूप । कवणाऐसें असे पाहे साक्षेप । तोही संवाद कीजेल अल्प । सावधान असावें ॥४७॥जैसें आकाश काय मठासम । कीं घट जला ऐसा नेम । किंवा प्रतिभास गगनाचा । भ्रम । तयासारखें तरी असे तैसें परब्रह्म सच्चिदघन । जें व्यापक रितें नव्हे तृण । तें कवणाऐसें पाहे विचारून । पिंडब्रह्मांडीं ॥४९॥आधीं पिंडींचा शोध घ्यावा । मग ब्रह्मगोळ त्या रीतीं जाणावा । ब्रह्मसाम्यता यया सर्वां । कवणिया असे ॥१६५०॥स्थूलसूक्ष्मकारण । जें जड चंचळ अज्ञान । त्यांत प्रतिबिंबित जीव ईशान । स्वरूपसाम्य या कवणा ॥५१॥मुख्य मायास्फूर्ति जलीं लहरी । ते विलक्षण सर्प आणि दोरी । मा तिजपासाव हे तत्त्वें सारीं । तरी त्यां साम्यता कैची ॥५२॥अस्ति भाति प्रिय ब्रह्मात्मा । असज्जड दुःख सर्व अनात्मा । हे दोन्ही एकत्र संगमा । कदापि न मिळती ॥५३॥या सर्वांहून चिती वेगळी । बोलिली श्र्लोकपदीं मुळीं । परी सदानंदता ही निराळी । चिति एक उपलक्षण ॥५४॥स्वरूपलक्षणांतील एक । ग्रहण करितां निश्चयात्मक । उरलें लक्षण जें सकळिक । न बोलता ग्राह्य ॥५५॥असो चित्प्रभा ते विलक्षण । सर्व हे नामरूप मिथ्या संपूर्ण । तेंचि ऐकावें विवेचन । घटांदिकां गगन जेवीं ॥५६॥जड षडविकारी दृश्यपणीं । सर्व सुखदुःखाचे आयतनीं । ऐसिया देहाचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥५७॥विसर्ग होय जयाचेनी । स्थूलाचे मळाची सारणी । ऐसिया गुदेंद्रियाचें रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥५८॥स्त्रीपुरुषाचिये मैथुनीं । क्रिया भोग जयालागुनी । तया उपस्थेंद्रियाचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥५९॥जाणें येणें क्रिया गमनीं । स्थूळासी घडे जयाचेनि । तया पादाचे रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥१६६०॥ग्रहण दानाची जयालागुनी । क्रिया होतसे अनुदिनीं । तया पाणींद्रियाचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥६१॥नानावर्णोच्चारांच्या श्रेणी । उमटती सर्वदां जयेचेनी । तया वागिंद्रियाचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥६२॥देहामाजीं अधोगमनीं । वाहत असे जडपणीं । तया अपानाचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥६३॥ऊर्ध्व वाहे हृदयभुवनीं । श्र्वासोच्छ्वास जयाचेनी । तया प्राणाचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥६४॥स्थूलों कंठस्थानीं राहुनी । प्रवर्तत असे क्षुत्पानीं । तया उदानाचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥६५॥उभय संधींत नाभिस्थानीं । राहून हालवी संधीलागुनी । तया समानाचे रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥६६॥सर्व नाडी अन्नरसें कडोनी । पाववून होतसे पुष्टिदानी । तया व्यानाचे रूपाहुना चित्प्रभा वेगळी ॥६७॥सुगंध दुर्गंध सन्निधानी । घेत असे दोन्ही निवडोनी । तया घ्राणाचे रूपाहूनि । चित्प्रभा वेगळी ॥६८॥कटु तीक्ष्णादि रसश्रेणीं । चाखितां कळे जयेचेनी । तये जिव्हेचे रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥६९॥दृश्य जितुकें साकारपणीं । तितुकीयांची दशा देखणी । तया चक्षूचे रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥१६७०॥सर्व देहाकारें राहुनी । घेत असे स्पर्शालागुनी । तया त्वगिंद्रियाचे रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥७१॥वेदादिकांच्या शब्दश्रेणी । कळू लागती उठतां ध्वनी । तया श्रोत्रेंद्रियाचे रूपाहूनि । चित्प्रभा वेगळी ॥७२॥संकल्प करी संशयेंकडुनी । सदां होय नव्हे चंचळपणीं । तया मनाचे रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥७३॥ध्यासें आठवी अनुदिनीं । सदां प्रवर्ततसे चिंतनीं । तया चित्ताचे रूपाहूनि । चित्प्रभा वेगळी ॥७४॥निश्चयचि जयेची करणी । हें खरेंचि स्थापी अमुक म्हणोनी । तया बुद्धीचेही रूपाहूनि । चित्प्रभा वेगळी ॥७५॥मी मी सर्वदा वाउगा मानी । जो बंधचि बैसला घेऊनी । तया अहंकाराचे रूपाहूनि । चित्प्रभा वेगळी ॥७६॥जो स्फुरवी वृत्तीलागोनी । एकलाचि तिहीं स्थानीं तया जिवाचिये रूपाहूनि । चित्प्रभा वेगळी ॥७७॥जे जीवासी घाली आवरणीं । प्रतिबिंबरूप जीवाची जननी । तये अविद्येचिये रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥७८॥जे विक्षेपें दुजे दावी नयनीं । जयेची येवढी उद्भवली करणी । तये विद्येचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥७९॥जो विद्येमाजी प्रतिबिंबोनी । जीवातें प्रेरी अलिप्तपर्णी । तया ईश्र्वराचे रूपाहूनी । चित्प्रभा वेगळी ॥१६८०॥मृगजलवत जयेची उभवणी । जे प्रकृतिपुरुषात्मक निस्तत्वपणीं । तये मूळमायेचे । रूपाहुनी । चित्प्रभा वेगळी ॥८१॥असो कारणरूप जी मूळ माया । विद्या अविद्या शक्ति जिचिया । तेचि जाहली नाहीं जया ठाया । तरी कार्य उभवे केवीं ॥८२॥न कळण्यासीच नव्हे रूप । तरी कासया ऐसा असे सर्प । तरी भिन्न दोरी हे वाउगे जल्प । व्यर्थ कां न म्हणावें तैशी मूळमाया वंध्यासुताची आई । विद्यादि कन्या इशादि जांवई । हा आनंदकोश निजरूपाचे ठायीं । तें चिद्रूप याहून भिन्न ॥८४॥तया आनंदासीही आच्छादान । करितो कोश नाम विज्ञान । वृत्तीचा परिणाम जे बुद्धि अनान । भाऊन बैसली ते पंचज्ञानेंद्रियद्वारा । होतसे विषयकारा । एवं विज्ञानमयता या साहा प्रकारा । त्याहून भिन्न चित्प्रभा ॥८६॥त्या निश्चयासीही आच्छादिलें । संशयात्मक वरती दिसलें । यासीही ज्ञानेंद्रिय साह्य झालें । इतुका मनोमय कोश त्या मनामाजी व्याप्ति स्वरूपाची । परी ते विकारी चित्प्रभा कैंची । जेवी पाणी आणि तरंगाची । येकरूपता नव्हे ऐसा मनोमयही आच्छादिला । प्राणमयचि जड दिसूं लागला । तो अंतर्बाह्य दशधा जाहला । प्राण कर्मेंद्रिये ॥८९॥जो विकाराचा विकारी । तो कैसा होय निर्विकारी । आकाश असून जलामाझारी । येकत्र कालवती ना ॥१६९०॥या प्राणमयावरती दिसला । स्पष्टत्वें स्थूल साकारला । तो अन्नमयकोश बोलिला । घट जैसा गगनीं ॥९१॥मूळीं मूळमाया नव्हें स्वरूपाऐशी । विद्या अविद्यासह जीवेशासी । तेथें विज्ञानमय प्राण भिन्नत्वेंसी । तेथें साकारा साम्यता ॥९२॥हें बोलणेंचि व्यर्थ कुडें । तैसेंचि भिन्न म्हणणेंहि बापुडें । जैसें जला आणि जलाकाशा न जोडे । तरी गगनासम घट केवीं ऐसेंचि साकार ब्रह्म्य़ापासूनी । कीटकांत सर्वही दृश्यपणी । स्वस्वरूप भिन्न सर्वांहुनी । नाना घटांहून गगन ॥९४॥हे असो भौतिकाची कथा । परी महाभूतें साम्य न होती सर्वथा । जेथें रूपादिकांची व्यवस्था । असे पंचविध ॥९५॥पृथ्वी आणि भौतिक सारीं । हीं सर्व असतीं पंच प्रकारीं । शब्द रूप रस गंधानुकारी । असती पदार्थ ॥९६॥स्वरूप तरी अशब्द अस्पर्श । अरूप अगंध अरस । तस्मात् भिन्न घटाहून आकाश । कां न म्हणावें ॥९७॥आपीं जरी गंध नाहीं । तरी चारी असती सर्वदांही । स्वरूपी रसादि नसती कांहीं । यास्तव भिन्न आपाहुनी तो रसही तेजांत नसतां । शब्द स्पर्श रूप असती आंतौता । म्हणून अग्नीसी स्वरूपसाम्यता । न ये कल्पांतीं ॥९९॥वायुमाजीं रूपही असेना । परी शब्द स्पर्श असती भिन्नपणा । तरी साभ्यता अस्पर्शा होईना । कवणेही काळीं गगनीं स्पर्शही नसे किमपि ॥१७००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.