पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वेढा घातला. महाबतखान या आदिलशहाच्या सरदाराने कील्ला शर्थीने लढविला. पण यात त्याचा पराभव झाला. राजाने मात्र महाबतखनास अभय देऊन त्याच्या इच्छेनुसार विजापुरी जाण्यास परवानगी दिली.पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, या लढाईत राजाच्या लष्करातील हजाऱ्या इब्राहीम याने फार मोठा पराक्रम गाजविला. स्वराज्याचा पहिला सेनापती म्हणून नेताजी पालकर याचे नाव सहजच जिभेवर येते. पण पायदळचा पहिला सरनोबत हा नूरखान बेग होता याची नोंद घेणे अत्यंत आवश्यक आहे. अफजलखानाच्या वधाचा प्रसंग थरारकच. शिवाजीने आपला जीव धोक्यात घातला होता. कोठल्याही क्षणी जिवास दगाफटका होण्याची शक्यता असतानासुद्धा शिवाजीच्या जिवाचे रक्षण करण्यासाठी जे अत्यंत विश्वासातील १० लोक शिवाजीबरोबर होते त्यात सिद्दी इब्राहीम हा मुसलमान त्यांच्या अगदी जवळ होता. अफजलखानाच्या वधानंतरचा सर्व नाट्यपूर्ण रोमांचकारी प्रसंग डोळ्यांपुढे आणला असता अफजलखानासकट त्यांच्याबरोबर आलेले वकिल कृष्णाजी भास्कर यांच्यासह दहा लोक ठार मारले गेले. आणि शिवाजी व त्याचे सर्व सहकारी सुरक्षितपणे प्रतापगडावर परत आले ही इतिहासातील नोंद टाळता येणार नाही. आग्र्याच्या तुरुंगातून राजे सुटेल की नाही अशा चिंतेत स्वराज्य होते, स्वराज्यावर संकट होते. औरंगजेबसारख्या करड्या, धर्मवेड्या मोगल सम्राटाच्या तावडीतून सहिसलामत सुटून बाहेर येणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून परत येणे होय. ही घटना खरेच अतुलनीय आहे. पण अशा प्रसंगी जी जिवाभावाची माणसे प्राणाची बाजी लावून उभी राहतात त्यात त्यांचा धर्म, जातपात काही शिल्लक राहत नाही. राजे औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर तर पडला खरा, पण बराच काळ तो तेथेच आहे हे नाटक वठवून मोगली पहारेदारांना गाफद्दल ठेवण्याचे काम हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर यांनी केले. मदारी मेहतर हा मुसलमान. परंतु नात्यागोत्याचा, रक्ताचा तर सोडाच पण तेथे धर्माचासुद्धा राजाशी त्याचा संबंध नव्हता. त्याचे इमान होते ते शिवाजीराजाच्या पायाशी, स्वराज्याच्या सिंहासनाशी.

 पन्हाळगडावर विजापूरकरांचा सरदार सिद्दी जोहर वेढा घालून बसला होता. वेढा पडून तीन महिने झाले. राजाच्या सुटकेचे काही चिन्ह दिसेना. त्याचा सेनापती नेताजी पालकर याच्या फौजेत सिद्दी हिलाल व त्याच्या तरुण मुलगा सिद्दी वाहवाह हे होते. अफजलखानाच्या वधानंतर सतत सात महिने नेताजी पालकरचे सैन्य स्वराज्याच्या सीमा रुंदावत दौडत होते. प्रचंड थकवा, ताण असतानासुद्धा.पण राजाची सुटका करण्याच्या एकमेव हेतूने नेताजी पालकराने सिद्दी जौहरच्या फौजेवर हल्ला केला. या लढाईत नेताजी पालकराला यश मिळाले नाही, पण सिद्दी हिलालचा

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ४७