पान:रामदासवचनामृत.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

3] प्रासंगिक गुरुत्व आलें नीच याती। कांहींएक वाढली महती। शंद्र आचार बुडविती । ब्राह्मणांचा ॥ ३४ ॥ हे ब्राह्मणास कळेना। त्याची वृत्तिच वळेना। 'मिथ्या आभिमान गळेना। मूर्खपणाचा ॥ ३५॥ राज्य नेलें म्लेंचि क्षेत्रीं । गुरुत्वं नेले कुपात्रीं। आपण अरत्रीं ना परत्रीं। कांहींच नाहीं ॥३६॥ ब्राह्मणास ग्रामणीने बुडविलें। विष्णूने श्रीवत्स मिरविलें। त्याच विष्णूने श्रापिलें । फरशरामें ॥ ३७॥ आम्हीही तेचि ब्राह्मण । दुःखें बोलिलें हे वचन । वडिल गेंले ग्रामणी करून । आम्हांभोवते ॥ ३८ ॥ आतांचे ब्राह्मणी काय केलें । अन्न मिळेना ऐसें जालें। तुम्हां बहुतांचे प्रचितीस आलें। किंवा नाहीं ॥३९॥ 'बरें वडिलांस काय म्हणावें । ब्राह्मणांचे अदृष्ट जाणावें। प्रसंगें बोलिलें स्वभावें । क्षमा केले पाहिजे॥४०॥ दा. १४. ७. २९-४०. ३. रामदासांचे स्वतःच्या उपासनेचे वर्णन. 'सकळांवडिल अंतरात्मा । त्यासि नेणे तो दुरात्मा । दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा । अंतरला तया ॥१८॥ जवळी असोन चुकलें। प्रत्ययास नाहीं सोकलें। उगेंचि आले आणि गेलें । देवाचकरितां ॥१९॥ म्हणौन सकळां वडिल देव। त्यासी होतां अनन्यभाव । मग हे प्रकृतीचा स्वभाव । पालटों लागे ॥२०॥ र क्षत्रियांनी. २ येथें ना तथे. ३ ग्रामण्याने. ४ मिळविलें.