पान:रामदासवचनामृत.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- RIP EURALaw २०१ - - -- - ६११६] ऐतिहासिक. यावरुनु देशांतरी सांप्रदाय व श्रीच्या स्थापना जाहल्या त्यास ग्रामभूमीची पत्रे करून पाठविली. श्रीसंनिध चाफळी एकशे एकवीस गांव सर्वमान्य व एकशे एकवीस गांवीं अकरा बिधे प्रमाणे भूमी व अकरा स्थळी श्रीची स्थापना झाली. तेथें नैवेद्यपूजेस भूमि अकरा बिधे प्रमाणे नेमिले आहेती ऐसा संकल्प केला आहे. तो सिद्धीस नेहण्याविषयी विनंति केली तेव्हां संकल्प केला तो परंपरेनें सेवटास न्याहावा ऐसी आज्ञा जाहली त्याजवरून सांप्रत गाऊ व भूमी नेमिले. तपशील१ मौजे चाफळ, मौजे नाणेगांव......वगैरे गांवें ३३. २ मौजे दहीफळ बुद्रुक, परगणे ढवळी,श्रीश्रेष्ठाचे समाधीकडे देहे २ ३ गांव गंना जमीन बिधे चारशें एकोणीस. धान्य गल्ला हरजिनसी खंडी १२१ एकशे एकवीस. येकूण दरोवस्त सर्वमान्य गांऊ तेहेतीस व जमीन बिघे गाऊगना चारशें येकोणीस व कुरण एक श्रीचे पूजा उछाहाबद्दल संकल्पांतील सांप्रत नेमिले व उछाहाचे दिवसास व इमारतीस नक्ती ऐवज व धान्य समयाचे समयास प्रविष्ट करीन. येणे करोन अक्षई उछा. हादि चालविण्याविषीं आज्ञा असावी. राज्याभिषेक ५ कालयुक्ताक्षि नाम संवत्सरे अश्विन शुद्ध १० दशमी बहुत काय लिहिणे हे विज्ञापना . ११६. आनंदवनभुवन. जन्मदुःखें जरादुःखें । नित्य दुःखें पुनः पुन्हा। संसार त्यागणे जाणे । आनंदवनभुवना ॥ कष्टलों कष्टलों देवा । पुरे संसार जाहला। .. - देहत्यागासि येणे हो। आनंदवनभुवना ॥