या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६०
[§८९
रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ.
जनीं भोजनी नाम वाचे वदावें ।
अती आदरें गद्य घोषे म्हणावें ॥
हरीचिंतने अन्न जेवीत जावें ।
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावें ॥ ८९ ॥
गजेंद्रू महां संकटी वास पाहे ।
तया कारणे श्रीहरी धांवताहे ॥
उडी घातली जाहला जीवदानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११८ ॥
नसे पीत ना श्वेत ना शाम कांहीं ।
नसे वेक्त आवेक्त ना नीळ नाहीं ॥
म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १५० ॥
दिसेना जनीं तेंचि शोधूनि पाहें ।
बरें पाहतां गूज तेथेंचि आहे ॥
करीं घेउं जातां कदा आढळेना ।
जनीं सर्व कोंदाटले ते कळेना ॥ १५५ ॥
विधी निर्मितां लीहितो सर्व भाळीं ।
परी लीहिता कोण त्याचे कपाळी ॥
हरु जाळितो लोक संव्हारकाळीं ।
परी शेवटी शंकरा कोण जाळी ॥ १७५ ॥
तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले ।
तया देवरायासि कोण्ही न बोले ॥
जगी थोरला देव तो चोरलासे ।
गुरूवीण तो सर्वथाही न दीसे ॥ १७९ ॥
अती आदरें गद्य घोषे म्हणावें ॥
हरीचिंतने अन्न जेवीत जावें ।
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावें ॥ ८९ ॥
गजेंद्रू महां संकटी वास पाहे ।
तया कारणे श्रीहरी धांवताहे ॥
उडी घातली जाहला जीवदानी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११८ ॥
नसे पीत ना श्वेत ना शाम कांहीं ।
नसे वेक्त आवेक्त ना नीळ नाहीं ॥
म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १५० ॥
दिसेना जनीं तेंचि शोधूनि पाहें ।
बरें पाहतां गूज तेथेंचि आहे ॥
करीं घेउं जातां कदा आढळेना ।
जनीं सर्व कोंदाटले ते कळेना ॥ १५५ ॥
विधी निर्मितां लीहितो सर्व भाळीं ।
परी लीहिता कोण त्याचे कपाळी ॥
हरु जाळितो लोक संव्हारकाळीं ।
परी शेवटी शंकरा कोण जाळी ॥ १७५ ॥
तिन्ही लोक जेथूनि निर्माण जाले ।
तया देवरायासि कोण्ही न बोले ॥
जगी थोरला देव तो चोरलासे ।
गुरूवीण तो सर्वथाही न दीसे ॥ १७९ ॥