पान:रामदासवचनामृत.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४१ १] कर्मयोग. आपणास उपाधी मुळीच नाही । रुणानुबंधे मिळालीं सर्वही। आल्यागेल्याची क्षिती नाहीं । ऐसें जाले पाहिजे ॥ २७॥ जो उपाधीस कंटाळला । तो निवांत होऊन बैसला। आटोपेना तो गल्बला । कासयासी ॥२८॥ काहीं गल्बला कांहीं निवळ। ऐसा कंठित जावा काळ।.. जेणेकरितां विश्रांति वेळ । आपणासि फावे ॥ २९॥ उपाधी कांहीं रहात नाहीं। समाधानायेवढे थोर नाहीं।। नरदेह प्राप्त होत नाहीं । क्षणक्षणा ॥ ३० ॥ दा. १९. ८. १९-३०, ८१. समर्थलक्षण. तो सकळ जनासी व्हावा । जेथे तेथें नित्य नवा । मूर्खपणे अनुमान गोवा । कांहींच नाहीं ॥५॥ नाना उत्तम गुण सत्पात्र । तेचि मनुष्य जगमित्र । प्रगट कीर्ती स्वतंत्र । पराधेन नाहीं ॥६॥ राखे सकळांचे अंतर । उदंड करी पाठांतर । नेमस्तपणाचा विसर । पडणार नाहीं ॥७॥ नम्रपणे पुसों जाणे । नेमस्त अर्थ सांगों जाणे । बोलाऐसें व? जाणे । उत्तम क्रिया ॥८॥ जो मानला बहुतांसी । कोणी बोलों न शके त्यासी । धगधगीत पुण्यरासी । माहांपुरुष ॥९॥ तो परोपकार करितचि गेला । पाहिजे तो ज्याला त्याला मग काये उणे तयाला । भूमंडळीं ॥ १० ॥