पान:रामदासवचनामृत.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

N -२०० रामदासवचनामृत-दासबोध. [६६३ दिधल्याविण पाविजेना। पेरिल्याविण उगवेना। ऐसें हे वाक्य जना । ठाउकेंचि आहे ॥२०॥ न करितां सेवेच्या व्यापारा । स्वामीस म्हणे कोठे मुशारा। तैस अंती अभक्त नरां । स्वहित न घडे ॥ २१ ॥ जितां नाहीं भगवद्भक्ती । मेल्या कैंची होईल मुक्ती। असो जे जे जैसें करिती। ते ते पावती तैसें ॥ २२ ॥ एवं न करितां भगवद्भजन । अंती नहीजे पावन । जरी आलें बरें मरण । तरी भक्तीविण अधोगती ॥ २३ ॥ म्हणोन साधूनें आपलें । जीत अस्तांच सार्थक केलें। शरीर कारणी लागलें । धन्य त्याचें ॥ २४॥ जे कां जीवन्मुक्त ज्ञानी । त्यांचे शरीर पडो रानी। अथवा पडो स्मशानीं । तरी धन्य जालें ॥ २५ ॥ साधूचा देह खितपला । अथवा श्वानादिकी भक्षिला। हे प्रशस्त न वाटे जनाला । मंदबुद्धीस्तव ॥ २६ ॥ अंत बरा नव्हेचि म्हणोन । कष्टी होती इतर जन । परी बापुडे अज्ञान । नेणती वर्म ॥ २७ ॥ जो जन्मलाच नाहीं ठाईचा । त्यास मृत्य येईल कैंचा। विवेकबळें जन्ममृत्याचा । घोट भरिला जेणें ॥ २८ ॥ स्वरूपानुसंधानबळें । सगळी मायाच नाडळे। तयाचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ २९ ॥ तो जीतचि असतां मेला । मरणास मारून ज्याला । जन्ममृत्य न स्मरे त्याला। विवेकबळें ॥३०॥ १ पगार. २ न होईजे. ३ घुटका. ४ सांपडत नाही. ५ जगला.