पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/२८९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केली नाही, तरी येत्या १००-२०० वर्षामध्ये आईबाप लग्न झाल्यानंतर म्हणू लागले की आम्हाला अमिताभ बच्चनसारखा दिसणारा आणि सचिन तेंडुलकरसारखा क्रिकेट खेळणारा मुलगा पाहिजे तर अशा मुलाचेसुद्धा वाण करायचे तंत्रज्ञान विकसित झालेले असेल! त्या तंत्रज्ञानातून जे बीटी कपाशीचे बियाणे तयार झाले त्या बीटीच्या उत्पादनाने व्यापार वाढला, कापसाचा उद्योग धंदा वाढला.
 वीस वर्षापूर्वी मी पहिल्यांदा सांगितले की तंत्रज्ञानाचा राग करून, रासायनिक खताचा राग करून तुम्ही जर नैसर्गिक शेतीकडे गेला तर प्रगती होणार नाही. मागे जाऊन कधी प्रगती होत नाही, प्रगती पुढे गेल्याने होते. रासायनिक औषधे वापरून जर जमीन खराब होत असेल तर रसायने कमी वापरा; जैविक बियाणे वापरा ज्याच्यामध्ये बोंडअळी नष्ट होऊन जाते म्हणजे मग औषध फवारायचे काम राहत नाही. तेव्हा, प्रगती पुढे जाऊन होते हा सिद्धांत महत्त्वाचा. तंत्रज्ञान जसजसे पुढे जाईल तसे तसे आपण पुढे जाऊ. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांची पीछेहाट झाली, शेतकरी सारे कर्जबाजारी झाले. सध्या बऱ्यापैकी पोटभर खातोय हे खरे; पण आपण पोटभर खातो याचे श्रेय नेहरूंना नाही, कोणत्याही सरकारला नाही; हे श्रेय ज्यांनी गव्हाचे संकरित बियाणे शोधून काढले त्या तंत्रज्ञानाला, ज्यांनी हे तंत्रज्ञान शोधून काढले त्यांना आहे. जर तुम्हाला कोणी देव मानायचे असेल तर तंत्रज्ञानाला देव माना आणि तंत्रज्ञानाची पूजा करा.
  मी शाळेत होतो तेव्हा १९४७ साली, एखादा माणूस ५०-५५ वर्षाच्या भेटला की लोक म्हणायचे, 'झाले, याचे दिवस संपत आले बरे का?' आता वयाची ७५ वर्षे झाली, ८० वर्षे झाली तरी लोक काही लगेच मरतील असे काही दिसत नाही. सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्रे काढली म्हणून माणसे अधिक काळ जगतात असे नाही, शास्त्रज्ञांनी अँटिबायोटीकचे तंत्रज्ञान शोधून काढल्यामुळे ते झाले आणि त्या अँटिबायोटीकच्या इंजेक्शननंतर कुठे प्लेग झाला, कॉलरा झाला, देवी आल्या, टायफाईड झाला असे ऐकू येत नाही. पूर्वी चागंली चागंली माणसे ३०-३५ व्या वर्षी टायफाईड होऊन मरून जायची. तंत्रज्ञानाच्या कृपेमुळे आज तुम्ही आम्ही ७५-८० वर्षे जगतो.

मानव जातीची प्रगती त्याचे हात धड आहेत आहे म्हणून नाही, पाय मजबूत आहेत म्हणून नाही, तर कोणत्याही प्राण्यापेक्षा माणसाची बुद्धी श्रेष्ठ आहे म्हणून झाली. तो शोधतो आणि म्हणून मनुष्य पुढे जातो.
 औरंगाबाद अधिवेशनाचा मुख्य विषय हा हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचे आणि जैविक तंत्रज्ञानाचे फायदे दिसू लागल्यानंतर आपल्या समोर जे प्रश्न उभे राहू

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / २८९