पान:महाबळेश्वर.djvu/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६३ )



पाणी व इतर राबाचे पाणी जाण्यास गटार (ड्रेनेज) बांधून काढले नसल्यामुळे तें जागोंजागीं मुरतें. इकडे म्युनिसिपाल कमिटीचें लक्ष्य गेलें तर लोकांस फार सुखावह होणार आहे. येथील जमीन ढिसूळ असल्यामुळे व वस्ती लहान असले कारणानें हें पाणी मुरल्यापासून जरी हवा दूषित होणेचा संभव कमी आहे, तरी या प्रसिद्ध आरोग्यवर्धक स्थलीं या गोष्टीकडे दुर्लक्ष नसावें. घाण व राबाचें पाणी घराबाहेर न येऊं देणें व घरांतही न सांठूंं देणें याबद्दल येथील म्युनिसिपालिटीची सक्तीची तसदी आहे तरी त्यापासून असलें पाणी सांडण्याची व जमिनींत मुरण्याची क्रिया कमी झाली आहे असें होत नाही; इकडे म्युनिसिपालिटीचे लक्ष्य जाईल काय ! घरांतही पाणी सांडूं नये ह्मटलें, तर घरांत राहणाराचा मोठा निरुपाय होईल असें जाणून दिलेली सवलत ही मोठी मेहरबानीच समजली पाहिजे.

  या हवेंत नेहमीं हुषारी राहते यांचें कारण असें सांगतात कीं, या प्रदेशाची उंची समुद्रसपाठीपासून सुमारें पांच हजार फूट असल्याच्या योगानें शरीरावर