पान:महाबळेश्वर.djvu/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६२ )



मावळांतील सर्दी कोंकणच्या अंतरंगांतील उष्णता खानदेश व वऱ्हाड येथील रुक्षवात हे गुण येथील हवेंत मुळींच नाहींत.

 ( ४ ) थंड व वनस्पतिमय ठिकाणच्या हवेंत विकार असण्याचा संभव असतो, ते या ठिकाणीं अगदीं नाहीं. याचें कारण पावसाचें सांचलेलें विकारी पाणी डोंगरावर मुळींच न राहतां लागलींच खालीं वाहून जातें आणि नद्यांचे प्रवाहास मिळतें. यामुळे गवत, झाडपाला वगैरे त्या पाण्यांत कुजण्याचा संभवच नसतों. शिवाय येथें दलदली किंवा पाणथळ जमिनी नाहीत; यामुळे हवेत रोगट सर्दी नाहीं. शिवाय डोंगरांच्या सभोंवतील सखल प्रदेशाची हवा स्वभावतःच उत्तम असल्यामुळे खालीं मलेरियासारखे साथीचे विकार होतच नाहीत; तेव्हां अर्थातच तेथून ते वर येण्याचे भय राहत नाहीं. पावसाळा गेलेवर दुस-या कित्येक ठिकाणींं हिंवताप वगैरे येतात, तसे या ठिकाणीं येत नाहींत. पावसाचें पाणी डोंगराला उतार असल्यामुळे जमिनीत न मुरतां निघून जातें, हें जरी मलेरिया न होण्यास कारण खरें आहे, तथापि गांवांत घाणीचे