पान:महाबळेश्वर.djvu/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २ )



हें अत्यंत रमणीय स्यान मृष्टिसैौंदर्याच्या व आरोग्याच्या दृष्टींनीं स्पृहणीय आहे. माथाळ्यावर दिलेल्या कविवर्य मुक्तेश्वराच्या सृष्टिवर्णनात्मक उता-यांत वर्णिल्याप्रमाणे खरोखरच येथें स्थिति आहे. या स्थानीं आजमित्तीस अनेक ठिकाणांहून व प्रांतांतून उन्हाळ्याच्या सुटींत अनेक श्रीमंत लोक येऊन राहतात. त्या ठिकाणीं आज वाचकांस नेऊन सोडण्याचा आमचा विचार आहे. इलाख्यांतील अनेक ठिकाणांहून अनेक रस्त्यांनीं लोक येथें येतात. परंतु मुंबई हें आजकाल पश्चिम हिंदुस्थानाचें केंद्र स्थान होय. त्या स्थानापासूनच आपण निघालों अशी कल्पना करूं. मुंबईपासून वाटारापर्यंत आगगाडीचा रस्ता आहे. मुंबईस सुमारें दुपारी अडीच वाजतां गाडींत बसलें म्हणजे सायंकाळीं पावणे सात वाजतां आपण पुण्यास येतों. तेथून सदर्न मराठा रेल्वेनें सवासात वाजतां निघून वाटारास मध्यरात्रीनंतर थोडया वेळानें पोंचतों. तेथें भाडोत्री तांगे, किंवा बैलगाडया यांची सोय असते. परंतु चांगल्या फैटण गाड्यांची सोय पुण्याच्या मेल कंत्राटदाराकडे आगाऊ लिहूनच करावी लागते. फैटणीत बसून निघालें ह्मणजे उजाडण्याचे