पान:महाबळेश्वर.djvu/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ९० )



बहुधां नियमित आहेत, असा सुप्रकृति व स्वस्थ प्रकृतीच्या माणसांवर तत्ववेत्यांनीं प्रयोग करून अनुभव घेतला आहे. कधीं कधीं चुकून अथवा वैद्यांच्या प्रमादानें अन्नेतर (अन्न अथवा पौष्टिक आहाराबाहेरचे) पदार्थाचें मनुष्यानें सेवन केल्यामुळे जीं अस्वस्थतेचीं अथवा इंद्रियव्यापार बिघडल्याचीं लक्षणें होतात त्यांचाही क्रम नियमित आहे, असें सिद्ध होतें. त्याचप्रमाणें विवक्षित वनस्पतींची शरीरावर विवक्षित कार्यें होतात व त्यांतील सत्वांची अशनमात्रा अथवा भक्ष्यप्रमाण कमजास्त झालें असतां रोगांचीं लक्षणें बदलतात असेंही आढळून आलें आहे. अशा वनस्पतींच्या क्रियेंत आपल्या चुकीनें सत्वनाश व कुसंयोग जरी उत्पन्न होतात तरी ते सृष्ट कार्यात स्वाभाविक क्रमानें क्वचित् होतात, ह्मणून ती क्रिया बिनचूक साधल्यास अनेक नवे नवे रोग हटविण्याचे सामर्थ्य वैद्यांस अथवा कल्पकांस येतें, असें असल्यानें वनस्पतींचा उपयोग औषधि करण्यास फार होतो. परंतू त्यांची माहिती व ओळख फारच थोडया वैद्यलोकांस असते. यामुळे वरचेवर ताज्या वनस्पति बिनचूक मिळणे कठिण पडतें.