पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/24

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.



प्रशिक्षणाचा खरा अर्थ



 शाळेत आपण गेलो की कुणीतरी शिक्षक आपल्यासमोर येतो. पुस्तकांत काहीतरी लिहिलेलं असतं, एकामागून एक धडे शिक्षक शिकवत राहतात आणि परीक्षेला यातलं काही तरी उत्तर द्यायला लागेल हे समोर ठेवून ती उत्तरे कशी द्यावी याची तयारी व्हावी या दृष्टीने थोडीशी पोपटपंची करायला आपण शिकतो. काही ठराविक प्रकारच्या प्रश्नांना ठराविक प्रकारची उत्तरे दिली म्हणजे परीक्षेत आपण पास होऊन जाऊ, मग नंतर त्या विषयाचा आपला काही संबंध राहिला नाही तरी चालेल; एकदाचा शिक्का मिळाला की आपण कर्तव्यातून मोकळे झालो अशा कल्पनेतून आपण शाळा-कॉलेजातून जात असतो.
 कृषि अर्थ प्रबोधिनीतील या प्रशिक्षणवर्गाची कल्पना थोडी वेगळी आहे. कशी वेगळी आहे हे समजून घेण्याकरिता शेतकरी संघटनेच्या गेल्या दहा वर्षांतील यशाचं, अपयश पुष्कळ आहे पण त्यातलं जे यश आहे त्याचं कारण काय हे समजावून घेतलं तर या प्रशिक्षणवर्गाची आणि वर्गातील कामाच्या पद्धतीची सहज कल्पना येईल. शेतकरी संघटनेची आंदोलनं काही पुढे गेली, काही मागे गेली. कांद्याला भाव वाढवून मिळाला, उसाला मिळाला, दुधाला मिळाला, कपाशीला मिळाला. रक्कम काढायला गेलो तर खूप मोठी रक्कम होईल. अगदी कर्जमुक्तीच्या वेळचा आकडा घेतला तरी हिंदुस्थानामध्ये चार हजार कोटी रुपयांची कर्जमुक्ती ही शेतकरी संघटनेच्या आंदोलनातून निघाली याबद्दल कुणाला शंका नाही. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने शेतकऱ्यांचा रुपया-पैशांत किती फायदा झाला असे विचारले तर हजारो कोटी रुपयांचा फायदा झाला हेच त्याचे उत्तर येईल. पण माझ्या दृष्टीने तो फारसा महत्त्वाचा नाही.

 शेतकरी संघटनेने घडवून आणलेली सगळ्यात अद्भुत गोष्ट कोणती? दहा

बळिचे राज्य येणार आहे / २६