पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाढवेल असं म्हणत राहायचं. पण या प्रयोगाचा ४० वर्षांमध्ये पराभव झाला आहे.
 सगळ्या जगाला जर पुरेसं खाऊ घालायचं असेल तर काय करावं? विकासाचा प्रश्न, औद्योगिकीकरण, भांडवल वगैरे सोडून द्या; पण सगळ्या जगाला खाऊ घालण्याइतकं पुरेसं धान्य तयार व्हायचं असेल तर त्यात मोठी अडचण काय? त्यात मोठी अडचण अशी आहे की सोन्याची अंडी घालणारी कोंबडी कापून खाण्याचा प्रयत्न चालला आहे. तो थांबला पाहिजे. तिच्या पोटात खूप अंडी आहेत असं म्हणून ती कापून खाल्लीत तर ती अंडीही मिळायची नाहीत आणि काहीच मिळायचं नाही. या अंडी घालणाऱ्या कोंबडीला जर खाऊ घालण्याची तुम्ही व्यवस्था केली, जो अन्नधान्य पिकवतो त्याला उपाशी राहावे लागणार नाही अशी जर व्यवस्था असली तर तो उत्साहाने अधिक पिकवेल. अधिक पिकवल्यांनर आपल्या हाती काही बचत राहते असं म्हटल्यानंतर तो स्वतः व्यवस्थाही वाढवेल, संशोधनही करेल, नव्यानव्या पद्धतीही अवलंबेल, नवनवं तंत्रज्ञानही शोधून काढेल. जग उपाशी राहातं आहे याचं प्रमुख कारण आपण अन्नदात्याला उपाशी ठेवतो आहोत, अन्नदात्याला जर उपाशी ठेवलं नाही तर जगाला खाऊ कसं घालावं हा प्रश्न काही फारसा राहणार नाही.
 (जूनच्या शेवटच्या आठवड्यात पॅरिस येथे जगातील ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ आणि नियोजनकारांची जगापुढे उभ्या ठाकलेल्या अन्नधान्य तुटवड्याच्या समस्येतून मार्ग काढण्यावर विचार करण्यासाठी एक परिषद झाली. शेतकरी संघटनेचे नेते श्री. शरद जोशी यांना या परिषदेत आपले विचार मांडण्यासाठी बोलावले होते. परंतु ऐनवळी दिल्लीतील कामकाजामुळे त्यांना जाता येणार नाही असे लक्षात आल्याने "How to feed the world?" या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भरलेल्या या परिषदेत आपले विचार "Feed the feeder to feed the world" या निबंधाद्वारे पाठविल. या निबंधाचा आशय श्री. शरद जोशी यांनी कृषी अर्थ प्रबोधिनीतील शिबिरार्थीना समजावून सांगितला. त्यावर आधारीत हा लेख.)

(शेतकरी संघटक, ६ जुलै १९९०)

बळिचे राज्य येणार आहे / २५