पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


बांडगुळांची दादागिरी


 ळीचा अजगर बनला
 कामगार चळवळीचे अनेक महत्त्वाचे टप्पे आहेत. सोळा सोळा तास काम, रजा नाही, नोकरीची शाश्वती नाही, दोनअडीच आणे वेतन... अशा परिस्थितीत काम करणाऱ्या कामगारांना संघटित करून, त्यांची स्थिती थोडीफार सुधारण्याचा प्रयत्न ना. म. जोशी यांच्या कालखंडात झाला. कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या कामगार चळवळीत पगार-बोनसच्या मागण्या लढवता लढवता कामगारांचे राज्य साऱ्या पृथ्वीतलावर आणण्याचे स्वप्न रंगवले गेले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात जॉर्ज फर्नाडिस यांनी कामगारांच्या लढ्याने विरोधी पक्षांचे राजकारण केले. संघटित क्षेत्रातील कामगारांची परिस्थिती गेल्या तीन वर्षांत झपाट्याने सुधारली. लायसेंस परमीट राज्यात अंदाधुंद फायदे कमावणाऱ्या कारखानदारांना कामगार संघटनांशी संघर्ष परवडतही नव्हता आणि आवश्यकही वाटत नव्हता. बंदिस्त बाजारपेठेतील ग्राहकाला यथेच्छ लुबाडल्यानंतर जमा झालेल्या लुटीत कामगारांनाही सहभागी करून घ्यायला त्यांना काही अडचण वाटत नव्हती. संघटित कामगार या काळात शोषक बनला. कामगारराज्याचे स्वप्न संपले, अर्थशास्त्राशी काडीमोड झाली. "हे... मालक वाटेल तसे फायदे कमावतात, त्यांच्याकडून कितीही पैसा हिसकावून घेण्यात गैर काहीच नाही. त्यासाठी कोणताही मार्ग वापरावा लागला तरी चालेल," अशी भाषा आर. जे. मेहता आणि दत्ता सामंत यांच्या काळात सरळ सीधी वापरली जाऊ लागली. कामगार चळवळ म्हणजे गुंडगिरी असे एकदा ठरल्यानंतर, मग त्या आखाड्यात डाव्यांचा जातीयवाद्यांसमोर टिकाव कसा लागावा?
 संपन्न कामगारांचा आक्रस्ताळी पवित्रा

 कामगार चळवळीच्या एका नव्या कालखंडाची सुरवात २० ऑगस्ट १९९३

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ३८