पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





अंदाजपत्रक आणि शेतीच्या समस्या


 संयुक्त पुरोगामी आघाडी द्वितीय (संपुआ-२) सरकारचे पहिले संपूर्ण अंदाजपत्रक तयार करण्याची यंत्रणा कार्यरत झाली आहे. ६ जानेवारी २०१० रोजी श्री. प्रणव मुखर्जी, केंद्रीय अर्थमंत्री, शेतीमध्ये आर्थिक हितसंबंधी घटकांच्या प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा करतील.
 सध्याचे दिवस दिल्लीतील अर्थमंत्र्यांसाठी फारसे चांगले आहेत असे नाही.
 जागतिक मंदी
 जागतिक मंदीच्या धक्क्यापासून भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर बचावली आहे. सरकारी धोरणांचा त्याच्याशी काही संबंध नाही; त्याचे सारे श्रेय काटकसर करून बचत करणे आणि निर्यातीतसुद्धा सुमारे २५ टक्क्यांनी घट झाली आहे. अप्रत्यक्ष करांच्या रूपाने महसुलातही या वर्षी त्याच प्रमाणात घट झाली आहे. अप्रत्यक्ष करप्रणालीमध्ये मोठे बदल करण्यास हा काळ अनुकूल निश्चित नाही. २०१० सालासाठी 'व्यापारी माल आणि सेवाकर' (GST-Goods and Service Tax) लागू करण्याचा संकल्पही सरकारला बासनात गुंडाळून ठेवावा लागेल अशी भीती आहे. वित्तीय शिस्तीच्या मर्यादांशी ताळमेळ राखणेही अर्थमंत्र्यांना अवघड जाण्याचीच शक्यता आहे.
 अंतर्गत सुरक्षा
 देशातील अंतर्गत सुरक्षेची स्थिती फारशी आनंददायी नाही. नक्षलवाद्यांविरोधी मोहीम वर्तमान अंदाजापेक्षा कितीतरी अधिक खर्चीक होणार आहे. देव न करो, पण पुन्हा आतंकवादी हल्ला झाला, तर योजनांवरील खर्चासाठी अर्थमंत्र्यांच्या हाती फारच तोकडा निधी राहील, अशी शक्यता आहे.
 हवामानबदल

 दुर्दैवाचे फेरे कमी का आहेत, नेमके याच वेळी हवामानातील बदलांनी

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / १६५