पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४. असुरक्षितता
५. नैराश्य
ही संकटं उभी राहतात.
 यावर काही उपाय आहे का? अवश्य आहे. मात्र सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, नोकरी सुटल्यावर कराव्या लागणाच्या उपाययोजनांची पूर्वतयारी नोकरी चालू असतानाच करून ठेवणे आवश्यक आहे.ज्यांची नोकरी अजून गेलेली नाही पण ती टिकून राहीलच असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही, अशा सुधीरसारख्या तरुणांच्या बाबतीत ही बाब महत्त्वाची आहे.
 नोकरीत असतानाची तीन जीवनमूल्ये आपण वर पाहिली. नोकरी गेल्यानंतरच्या काळात पुढील तीन जीवनमूल्यांचा आधार घेतल्यास या संकटावर मात तर करता येतेच, शिवाय बच्याच वेळा नोकरीपेक्षाही जास्त फायदा होण्याची शक्यता असते. ही मूल्ये म्हणजे -
१. सृजनशीलता क्रिएटिव्हिटी)
२. स्वायत्तता (ऑटॉनॉमी)
३. निष्ठा (इंटिग्रिटी)
 प्रत्येक माणसात जन्मत: कमी अधिक प्रमाणात हे तीन गुण असतातच. त्यांना आपण जितक्या अधिक प्रमाणात जागे करू तितके ते कठीण परिस्थितीत आपल्या मदतीला धावतात. नोकरीत असताना आवडत असो वा नसो आपल्याला ठराविकच काम करावं लागतं. त्यात दिवसाचा बराच वेळ जात असल्याने आपल्यातील इतर कलागुणांना न्याय देणे शक्य होत नाही. कित्येकदा असे कलागुण किंवा नवनिर्मिती करण्याची क्षमता आपल्यात आहेयाचीही आपल्याला जाणीव नसते. नोकरी सुरू असताना वेळात वेळ काढून हे गुण जागते ठेवल्यास कठीण काळी जिवाभावाच्या मित्राप्रमाणे ते साहाय्याला येतात. नोकरी सुटल्यानंतरही उपलब्ध वेळेचा उपयोग अशा सृप्त कला-कौशल्यांचा विकास करण्यासाठी करता येतो. सृजनशील व्यक्तींसाठी नोकरी सुटणं हे संकट नसून संधी असते.
 नोकरीत असताना आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर बंधनं येतात.मनाप्रमाणे जीवन जगणे शक्य नसते, पण नंतरच्या काळात हे स्वातंत्र्य आपण उपभोगू शकतो. निष्ठेबाबतही असंच आहे. नोकरीमध्ये निष्ठा आपल्यावरची जबाबदारी, आपली संस्था व सहकारी यांना वाहिलेली असते. निवृत्तीनंतरच्या काळात हीच निष्ठा स्वतःच्या विकासासाठी उपयोगात आणता येते.
 हा थोडासा तत्त्वज्ञानाचा भाग झाला. आता प्रत्यक्षात नोकरीला पर्याय म्हणून कोणते

मार्ग चोखाळता येतात, ते पाहू.

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/३७