पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२. लक्ष्य
३. जीवनमूल्ये
कार्यमग्नता:
 व्यवस्थापन गुरु पीटर ड्रकर यांनी म्हटल्याप्रमाणे २० वे शतक उद्योगधंद्यांच्या विकासाचं शतक होतं.त्याकाळी माणसाचं कार्यमग्न आयुष्य ३० ते ३५ वर्षाचं तर काम देणाच्या संस्थेचं आयुष्य १०० वर्षांहून अधिक मानले जात होते. त्यामुळे एखाद्या संस्थेत एकदा चिकटलं की निवृत्त होऊनच बाहेर पडायचं हे ठरलेलं असे. परिणाम कर्मचारी वर्गाची मानसिकताही तशीच बनली व अजूनही ती बच्याच प्रमाणात तशीच कायम आहे.
 २० व्या शतकाच्या अखेरीस आणि २१ व्या शतकाच्या सुरुवातीला ही बदलली आहे. तंत्रज्ञानात सतत होणारे बदल व गतिमान जीवन यामुळे काम देणान्या संस्थेचं आयुष्यमान ३० ते ३५ वर्षीच टिकून राहील असं गृहीत धरले जात. मात्र माणसाचं काम करण्याच आयुष्य ५० ते ६० वर्षाचे आहे. याचाच अर्थ एकाच संस्थेत जीवनभर काम करणंं ही संकल्पना मोडीत निघाली आहे. त्यामुळेच नोकरी सुटल्यानंतर काय हा प्रश्न कळीचा बनला आहे.
 माणसाला दिवसभर काहीना काही काम असेल तर त्याला बरं वाटतं. नोकरीत असताना हे आपोआप होतं. मात्र नोकरी सुटल्यानंतर रिकामा वेळ खायला उठतो. यावेळी स्वतःच पुढाकार घेऊन कार्यमग्न राहणंं आवश्यक आहे.
लक्ष्य किंवा उद्दिष्ट :
 नोकरीत ठराविक काम नेमून दिलेलं असल्याने ते पूर्ण करणे हे उद्दिष्ट असतं, पण नंतर असं कोणतेही लक्ष्य समोर नसल्याने दिशाहीन वाटू लागतं.
जीवनमूल्ये:
 ही दोन प्रकारची आहेत. नैतिक व भौतिक यापैकी भौतिक मूल्यांचा विचार या लेखात प्रामुख्याने केला आहे.निवृत्त होण्यापूर्वी माणसाचे जीवन मुख्यतः तीन भौतिक मूल्यांभोवती फिरत असतं. ती म्हणजे पैसा, प्रतिष्ठा व अधिकार. नोकरी गमावल्यानंतर त्यांना उतरती कळा लागते. दरमहा मिळत असणारे ठराविक उत्पन्न बंद होत. त्यापाठोपाठ प्रतिष्ठा व अधिकारही नाहीसा होतो. उत्पन्नाचं नवं साधन लवकर हाती न लागल्यास शिल्लक पेशावर गुजराण करण्याची पाळी येते.
 थोडक्यात, असलेलं काम वा नोकरी गमवावी लागल्याने
१. आर्थिक विवंचना
२. प्रतिष्ठा व अधिकाराचा लोप

३. रिकामपण व त्यातून निर्माण होणारे मानसिक अस्वास्थ्य

संकटाचे संधीत रुपांतर करा / ३६