पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मालकांना काही विचारायची पध्दत असती का साहेब?” तो अजिजीने म्हणाला: मी स्वतःशीच हसलो, त्याची जास्तच फिरकी घेण्यासाठी मी विचारलं, “मागच्या वेळी मालक आले होते, तेव्हा त्यांनी कोणता साबण वापरला होता ते तुम्हाला माहिती असेलच!’ नाही, तो म्हणाला, “त्यावेळी त्यांनी त्यांचा साबण स्वतःबरोबर आणला होता. जाताना घेऊन गेले. त्यामुळे काही कळू शकले नाही.” ‘धन्य आहे तुझी' मी मनात म्हटलं.
 मालकाबद्दल वाटणारी ही खरी किंवा काल्पनिक भीती हे आपल्या व्यवस्थापकीय संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे आणि हीच सुयोग्य व्यवस्थापनामधली सर्वात मोठी अडचण असते. या भीतीपोटी सोप्या गोष्टी विनाकारण अवघड होतात. वर सांगितलेल्या प्रसंगाचेच पाहा, केवळ मालकाबरोबर सुसंवाद नसल्याने गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकाने एकाऐवजी सात साबण आणून कारखान्याचा पैसा निरुपयोगी व अनुत्पादक कामांसाठी खर्च केला. अशा साध्या साध्या गोष्टीत इतकी अनागोंदी व पैशाचा इतका अपव्यय होत असेल, तर कारखान्याची मोठमोठी कामे करताना काय होत असेल याची कल्पना केलेली बरी.
 या भीतीमुळे उद्योगांचेच नव्हे तर कोणत्याही कामाचं कसं वाटोळे होते व ते टाळण्यासाठी काय उपाय आहेत, ते आपण या लेखात पुढे पाहणारच आहोत. पण त्या अगोदर आणखी एक मजेदार किस्सा सांगतो.
 बऱ्याच वर्षांपूवीं मी केरळला गेलो होतो. त्यावेळी सहज मित्रांबरोबर खाण्यापिण्याविषयी गप्पा मारताना एकाने जी.डी. बिर्ला यांच्याबाबत घडलेली गोष्ट सांगितली. केरळमधील ‘ग्वालियर रेयॉन फॅक्टरी'ला भेट देण्यासाठी ते तेथे आले होते. त्यांना सकाळच्या नाश्त्यासाठी जिलबी लागत असे, पण केरळमध्ये जिलबी त्यावेळी मिळत नसे. म्हणून बिर्ला यांच्याकरीता मुंबईहून खास विमानाने जिलबी मागवण्यात आली.
 आता एवढ्या अपसव्यानंतर बिलनी नाश्ता कितीसा केला? तर दोन जिलब्या, एक समोसा व एक कप चहा, बस्स.
 हे ऐकल्यावर मी विचारलं, “पण जिलबी एवढ्या विमानाने मागवायची काय गरज होती? केरळमध्ये किती सुंदर व चविष्ट खाद्यपदार्थ मिळतात. इडली, सांबर, डोसा, वडा, अप्पम... या पैकी काही तरी घेऊन पाहा, असं तुम्ही बिर्लांना का नाही सांगितलं. नवा पदार्थ चाखून ते कदाचित खूश झाले असते.”
 "हॅ, भलतंच काय, मालकांना कसं सांगायचं?’ मित्र म्हणाला.
 म्हणजे 'मालकांना विचारायचं कसं’ आणि 'मालकांना सांगायचं कसं?' हे व्यवस्थापकापासून ते अगदी निम्न पातळीवरील कर्मचाऱ्याला पडणारे यक्षप्रश्न आहेत.

मात्र, हे केवळ प्रश्न नाहीत तर ती एक संस्कृती आहे. एक मानसिकता आहे आणि

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/९