पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१४९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

किंवा समूहाच्या रूपानंं जागी होऊ शकते. त्यानंतर समाजाला ऊर्जितावस्था प्राप्त होते.
 सज्जनांच्या हातात समाजाचं व्यवस्थापन पुन्हा सोपविण्यासाठी या शक्ताकडून बौध्दिक व वैचारिक पायावर आधारलेलं परिवर्तन घडवून आणलं जातं. त्यालाच क्रांती म्हणतात. क्रांती सशस्त्र आणि निःशस्त्र अशा दोन मार्गांनी होते. उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलमी मोगली राजवटीविरुध्द घडविलेलं परिवर्तन सशस्र होतं तर गांधीजींनी इंग्रजांविरुध्द घडविलेलं परिवर्तन निःशस्त्र होते. मात्र, या दोन्ही क्रांत्यांना प्रबळ असं वैचारिक अधिष्ठान होतं आणि त्यांचा उद्देश सज्जनांचं संवर्धन व दुष्टांचं निर्मूलन हाच होता. थोडक्यात, वर दिलेल्या श्लोकाचा अर्थ लक्षात घेतला तर हे दोघेही 'अवतारी' पुरुषच होते असं म्हणावयास काही हरकत नाही.
 शिवाजी आणि गांधीजी यांच्यात आणखी एक समान दुवा आहे. तो म्हणजे, ही दोघेही युगपुरुष मध्यमवर्गीय घराण्यात जन्माला आलेले होते. शिवाजी महाराजांचा जन्म राजघराण्यात झाला असला तरी, ज्या मोगली आणि विजापुरी राजवटीविरुद्ध त्यांनी क्रांती घडविली, त्यांचं वैभव, सामर्थ्य आणि दरारा पाहता त्यांच्यासमोर शिवाजी जन्म राजघराण्यात झाला असला तरी, ज्या मोगली आणि विजापुरी राजवटीविरद्ध महाराज ‘मध्यमवर्गीयच होते असं म्हणावं लागेल.
 केवळ ही दोन उदाहरणेच नव्हेत, तर दहा हजार वर्षांपूर्वी मानव पृथ्वीवर स्थिरस्थावर होत असल्याच्या कालखंडापासून ते थेट आजपर्यंत इतिहासाच्या प्रत्येक वळणावर क्रांती घडविण्याचं हे 'अवतारकार्य' मध्यमवर्गानंं 'वारंवार' पार पाडलेलं दिसून येतं. म्हणून म्हटलं जातं की,ज्या समाजातला मध्यमवर्ग संवेदशील, जागृत आणि जबाबदारीने वागणारा असतो, तो समाज तत्परतेनं विकसित होतो. वरील श्लोकात 'संभवामि युगे युगे' असं म्हंटल आहे, त्यातील 'मी'म्हणजेच हा मध्यमवर्ग.
जबाबदारी मध्यमवर्गावरच का?
 कोणताही समाज श्रीमंत, मध्यमवर्गीय व गरीब अशा तीन विभागांत वाटला गेलेला असतो. यापैकी श्रीमंत हे तृप्त असतात.त्यामुळे त्यांना क्रांती किंवा परिवर्तन नकोच असते. गरिबाला परिवर्तनाची आवश्यकता असते. पण रोजच्या भाकरीची समस्याच त्याला डोईजड झालेली असल्यानं जो तो देव असं समजण्यावाचून लागणारी त्याला गत्यंतर नसतं. परिवर्तनासाठी आवश्यक असणारा कालावधी आणि त्याला लागणारी उर्जा निर्माण करण्याची त्याची क्षमता नसते.या दोन्ही समाजघटकांनच्या मधलं स्थानं मध्यमवर्गाचं असतं. तो श्रीमंताइतका तृप्तही नसतो आणि गरिबाइतका कंगालही नसतो. साहजिकच क्रांतिकारक बदलांची त्याला आवश्यकता असते, त्याच्या या क्षमतेला संवेदनशीलतेची जोड मिळाली की, अपेक्षित परिवर्तन घडून येतं.

 अनेक क्रांत्यांचा जन्मदाता असणारा हा मध्यमवर्ग हजारो वर्षांपूर्वीच जन्माला

मध्यमवर्ग व समाजचे व्यवस्थापन/१४०