पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ओंडका आणि मासा

णताही उद्योग अथवा संस्थेचे 'व्यवस्थापन’ पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची नेहमी तक्रार असते की, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं जात नाही. ‘वरून’ दबाव येतो, त्यामुळे योग्य निर्णयही बदलावा लागतो. कित्येकदा अंतर्गत ओढाताणीमुळे नाईलाजास्तव इच्छेविरुध्द निर्णय घेण्याची पाळी येते. खास करून राजकीय दबावामुळे अनेकदा योग्य निर्णय घेणं अशक्य बनतं. अशा वेळी ‘प्रेशरमुळे असे करावे लागले’ हे कारण पुढे करून आपल्या चुकीच्या निर्णयांचं समर्थन करण्याची प्रवृत्ती व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांमध्ये वाढीला लागते.
 'पाहा, ही अशी समस्या आहे. त्याबाबत आपणं काय कराल?’ या प्रश्नाला ते चेहरा टाकून सांगतील, ‘काही करता येईल असं वाटत नाही. शेवटी आपलया हातात आहे तरी काय?’ या हतबल स्थितीचं वर्णन चपखल शब्दांत करताना एका व्यवस्थापकानं मला सांगितलं, “आमची अवस्था नदीच्या पाण्यावर तरंगणाऱ्या लाकडाच्या ओंडक्यासारखी आहे.काठावरून पाहणाऱ्याला वाटतं की, हा ओंडका पाण्याच्या ‘वर' असलयाने त्याची पाण्यावर सत्ता आहे. मात्र, प्रत्यक्षात तो पाणी नेईल तिकडे वाहत जात असतो."
 कित्येक व्यवस्थापक या स्थितीची शिकार बनलेले असतात.बाहेरच्या माणसांना वाटतं की, सर्व अधिकार त्यांच्या हातात आहेत. मात्र सत्य हे असतं की, त्यांचा अधिकार त्यांना वापरू द्यायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार वेगळ्याच माणसांच्या हातात असतो. अर्थात,सर्वच असे नसतात. काही कर्तव्यदक्ष व्यवस्थापक नदीतील ओंडक्याचा नव्हे, तर माशाचा आदर्श पाळतात.
 नदीतलया माशावरही पाण्यांच्या प्रवाहाचा परिणाम होत असतोच. तरीही तो आपलया इप्सिताच्या दिशेने पोहत असतो. पाण्यातच राहून पाण्याशी झुंजण्याचं व स्वतःची दिशा ठरविण्याचं कौशलय त्याच्यापाशी असतं. अन्यथा, नदीबरोबर सर्वच मासे समुद्रात गेले असते आणि नदीत एकही मासा शिल्लक राहिला नसता.

 विशेषत: पुनरुत्पादनाच्या मोसमात अंडी घालण्यासाठी मासे नदीच्या प्रवाहाच्या विरुध्द दिशेने प्रवास करतात.कारण ‘अंडी घालण्याचा' मोसम माशांच्या जीवनात सर्वाधिक महत्वाचा व निर्णायक कालावधी असतो. मत्स्यजातीचे भवितव्य त्यांवर

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ ५