निर्झरास
<poem> गिरिशिखरे, वनमालाही दरीदरी घुमवित येई कड्यावरुनि घेऊन उड्या खेळ लतावलयी फुगड्या घे लोळण खडकावरती फिर गरगर अंगाभवती, जा हळूहळू वळसे घेत लपत-छपत हिरवाळीत, पाचूंची हिरवी राने झुलव गडे, झुळझुळ गाणे । वसंतमंडप - वनराई आंब्याची पुढती येई. श्रमलासी खेळून खेळ नीज सुखे क्षणभर बाळ । हीं पुढची पिवळी शेतें सळसळती - गाती गीतें, झोप कोठुनि तुला तरी, हास लाडक्या । नाच करी बालझरा तूं बालगुणी, बाल्यचि रे । भरिसी भुवनी ।
बालतरू हे चोहिकडे प्रेमभरे त्यावर तूहि बुदबुद-लहरी फुलवेली सौंदर्ये हृदयामधली गर्द सावल्या सुखदायी इवलाली गवतावरती झुलवित अपुले तुरे-तुरे जादूनेच तुझ्या बा रे? सौंदर्याचा दिव्य झरा या लहरीलहरीमधुनी ताल तुला देतात गडे! मुक्त-मणि उधळून देई! फुलव सारख्या भवताली. हे विश्वी उधळून खुली वेलीची फुगडी होई! रानफुले फुलती हसती निळी लव्हाळी दाट भरे. वन नंदन बनले सारे! बालसंतचि तू चतुरा; स्फूर्ती दिव्य भरिसी विपिनी
आकाशामधुनी जाती इंद्रधनूची कमान ती रम्य तारका लुकलुकती शुभ्र चंद्रिका नाच करी ही दिव्ये येती तुजला वेधुनि त्यांच्या तेजाने धुंद हृदय तव परोपरी त्या लहरीमधुनी झरती नवल न, त्या प्राशायाला गंधर्वा तव गायन रे मेघांच्या सुंदर पंक्ति; ती संध्या खुलते वरती; नीलारुण फलकावरती; स्वर्गधरेवर एकपरी; रात्रंदिन भेटायाला! विसरुनिया अवघी भाने मग उसळे लहरीलहरी दिव्य तुझ्या संगीततति! स्वर्गहि जर भूवर आला! वेड लाविना कुणा बरे!
पर्वत हा, ही दरीदरी गाण्याने भरली राने, गीतमय स्थिरचर झाले! व्यक्त तसे अव्यक्तहि ते मुरलीच्या काढित ताना धुंद करुनि तो नादगुणे दिव्य तयाच्या वेणुपरी गाउनि गे झुळझुळ गान गोपि तुझ्या हिरव्या वेली तुझ्या वेणुचा सूर तरी तव गीते भरली सारी. वर-खाली गाणे गाणे! गीतमय ब्रम्हांड झुले! तव गीते डुलते झुलते! वृंदावनि खेळे कान्हा; जडताहि हसवी गाने; तूहि निर्झरा! नवलपरी विश्वाचे हरिसी भान! रास खेळती भवताली! चराचरावर राज्य करी
काव्यदेविचा प्राण खरा या दिव्याच्या धुंदिगुणे मी कवितेचा दास, मला परि न झरे माझ्या गानी जडतेला खिळुनी राही दिव्यरसी विरणे जीव ते जीवित न मिळे माते दिव्यांची सुंदर माला तूच खरा कविराज गुणी अक्षय तव गायन वाहे तूच निर्झरा! कविश्वरा! दिव्याला गासी गाणे. कवी बोलती जगांतला, दिव्यांची असली श्रेणी! हृदयबंध उकलत नाही! जीवित हे याचे नाव; मग कुठुनि असली गीते? ओवाळी अक्षय तुजला! सरस्वतीचा कंठमणी अक्षयात नांदत राहे!
शिकवी रे, शिकवी माते फुलवेली-लहरी असल्या वृत्तिलता ठायी ठायी प्रेमझरी-काव्यस्फूर्ति प्रगटवुनि चौदा भुवनी अद्वैताचे रज्य गडे! प्रेमशांतिसौंदर्याही मम हृदयी गाईल गाणी आणि असे सगळे रान तेवि सृष्टीची सतार ही दिव्य तुझी असली गीते! मम हृदयी उसळोत खुल्या! विकसू दे सौंदर्याही! ती आत्मज्योती चित्ती दिव्य तिचे पसरी पाणी! अविच्छिन्न मग चोहिकडे! वेडावुनि वसुधामाई रम्य तुझ्या झुळझुळ वाणी! गाते तव मंजुळ गान, गाईल मम गाणी काही!
![]() |
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. | ![]() |
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Question_Copyright_2.png/50px-Question_Copyright_2.png)