चतुःश्लोकी भागवत/आत्मज्ञान

विकिस्रोत कडून

गुरुकृपेशिवाय आत्मज्ञान नाहीं
न होतां गुरुकृपा संपूर्ण । कदा न साधे आत्मज्ञान । त्या गुरुत्वालागी नारायण । आपुलें आपण स्वरुप दावी ॥५०॥
नसेवितां सदगुरुचरण । स्रष्टयासी नव्हे ब्रह्मज्ञान । त्या गुरुत्वाचें महिमान । श्रीनारायण स्वये दावी ॥५१॥
मागे उपदेशिलें ‘ तप तप ’ । परी प्रत्यक्ष नव्हे सदगुरुरुप । गुरुकृपा नव्हतां सद्रूप । शिष्याचे विकल्प न तुटती कदा ॥५२॥
संतोषोनी सदगुरुनाथ । शिष्याचे माथां जों न ठेवी हात । तोंवरी नातुडे परमार्थ । हा निश्चितार्थ हरि जाणे ॥५३॥
यालागी श्रीनारायण । गुरुत्वें आपुलें आपण । शिष्यासी देऊनी दर्शन । स्वयें ब्रह्मज्ञान उपदेशितसे ॥५४॥
निष्ठें केली तपस्थिती । तेणें झाली सदगुरुप्राप्ती । आतां गुरुमुखें प्रजापती । आत्मज्ञानप्राप्ती पावेल पां ॥५५॥
जैं पूर्वपुण्याची निष्काम जोडी । हैं सदगुरुचरण जोडिती जोडी । गुरुचरणी आवडी गाढी । तैं पाविजे रोकडी ब्रह्मप्राप्ती ॥५६॥
गुरुविषयीं लवमात्रहि विकल्प उपयोगी नाहीं
गुरुच्या ठायी नींचपण । शिष्यें देखिले असे जाण । अणुमात्र केलिया हेळण । ब्रह्मज्ञान कदा नुपजे यालागी कृष्णकृपानिधी । निजवैभवविद्धि स्त्रष्टयासी दावी ॥५८॥
गुरुचे अगाध महिमान । दावावया श्रीनारायण । जेथें लक्ष्मी करी संमार्जन । तें वैकुंठभुवन स्वयें दावे ॥५९॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.