चतुःश्लोकी भागवत/वैकुंठमहिमा

विकिस्रोत कडून

तें वैकुंठ जाण साचार । सर्व लोकां वरिष्ठवर । त्याहून परतें नाही पर । यालागीं परात्पर ह्नणती त्यातें ॥६०॥
जेथें परमात्मा नांदे स्वयंज्योती । त्या वैकुंठाची वैभवस्थिती । वर्णितां खुंटली परेची गती । यालागी ह्नणती वैकुंठ लोक ॥६१॥
ज्या लोकाचिये ठायी । क्लेशमात्र प्राणियांसी नाहीं । मोहाची वार्ता कांहीं । कोणी स्वप्नीही नदेखती ॥६२॥
नित्य देखतां हरीचे पाय । क्षुधातृषा जिरोनी जाय । तेथें मोहक्लेश कैचा राहे । आनंदे नांदताहे वैकुंठलोक ॥६३॥
ज्या वैकुंठाचें नांव घेतां । काळ पळे मागुता । तेथें कैची भयाची वार्ता । जननिर्भयता नांदे पैं ॥६४॥
ज्या लीकाचिये ठायीं । मरणाचें नांव नाहीं । जरा प्रगटे निजदेहीं । हे जन कोणी जाणेचिना ॥६५॥
ज्या लोकाचें स्तवन । सदाशिव करी आपण । इंद्रादिदेवगण । वैकुंठाचे गुण स्वयें वदती ॥६६॥
मृत्युलोकीचें मुनिगण । पावावया वैकुंठभुवन । अद्यापि करिती अनुष्ठान । भगवद्भजन निजनिष्ठा ॥६७॥
तोचि वैकुंठलोक । पांचश्लोकी श्रीशुक । वर्णितसे आत्यंतिक । ऐके त्यक्तोदक परीक्षिती ॥६८॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.