सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या २००१ ते २१००

विकिस्रोत कडून

<poem> स्थूल साकार तरी दृश्य । ब्रह्म निराकार अदृश्य । येथें हें हें म्हणून निर्देश । तेथें वाणी मन मुरडे ॥१॥जें जें दिसे तें तें नासे । दिसे तेंचि हें हें म्हणो येतसे ।तस्मात् हें हें ब्रह्म होईल कैसें । अदृश्य अग्राह्य जें ॥२॥ब्रह्म सत् देह असत् । जो क्षणक्षणांत असे नासत । ब्रह्म चिद्रूप देह जड समस्त । प्राणामुळें चळे ॥३॥याचि हेतु श्रुति बोले वचन । कीं देहाहून अन्य आत्मा प्राण ।तेणेंचि देहासी होतसे पोषण । तस्मात् प्राण कीं आत्मा प्रथम साधकाचें शुद्ध हृदय ।असे कीं नसे पाहे निश्चय । म्हणून श्रुति होय कीं न होय ।ब्रह्म हें पाहें विचारें श्रुति निर्धारें जरी सांगती । तरी विचार करी कासया म्हणती । ऐशी तों भलल्याची असे रीती ।ज्याचे त्यामुखें निवडावें ॥६॥साधक हेंचि खरें म्हणून बैसे । तेव्हां श्रुति अनधिकारी म्हणून त्रासे ।जो विचारें नव्हे म्हणून पुसे । तया आल्हादें सांगे ॥७॥अरे वास्तविक जर ब्रह्म नव्हे । अविद्या ज्यांत वास करून राहे ।आतां प्राण ब्रह्म याहून आहे । तेंही पाहे विचारें पूर्वींचा आडाखा जो बोलिला । कीं भूतसंघ जाहला राहिला मेला । जेथें तें ब्रह्म तोचि बैसविला । कीं प्राणास्तव होती निमती ॥९॥या प्राणमय कोशासीही पांच अंगें । विचार करावा म्हणून सांगें ।हें पाहून साधकें लागवेगे । विचार कीजे प्राणाचा ॥२०१०॥प्राणाचि प्राणमयाचें शिर । व्यान तोचि दक्षिण पक्ष थोर । समान तोचि पक्ष उत्तर । आकाश आत्मा ॥११॥पृथ्वी पुच्छ प्राणमयासी । हेंचि आधीं विचारिजे मानसी ।कीं देहाच्या आधारें वायूसी । उद्भव जाहला ॥१२॥यंत्र जैसें कळासावें । तेवीं शिरांचे ओढीनें वायू उद्भवे ।त्या ओढीनें जरी ढिलें पडावें । तरी जावें देह त्यागोनि ॥१३॥व्यान समान आणि प्राण । हेंचि शिर येक पक्ष दोन ।हें तव प्राणवायूचें लक्षण । व्यापारभेदें नामें ॥१४॥परी संचार नव्हे पोकळविण । कठिनत्वा न जाय भेदून ।म्हणून श्रुति बोलिली योजून । आकाश आत्मा ॥१५॥ब्रह्म तरी निराकार । प्राणविकारें टाकी फूत्कार ।ब्रह्म निराधारत्वें सर्वां आधार । प्राण देह तोंवरी दिसे ॥१६॥ब्रह्म पदार्थमात्रीं व्यापलें । प्राण पोकळीत वास्तव्य केलें ।प्राण वाहतसे दशांगुलें । ब्रह्म सर्वत्रीं सम ॥१७॥ब्रह्म सद्रूप प्राण नासे । ब्रह्म चिद्रूप प्राण तो जड असे ।झोपेंत निवारींना अल्पसें । वस्त्रें नेतां तस्करी ॥१८॥हें असो प्राण सुखदुःखदायक । ब्रह्म आनंदघन एक ।तस्मात् प्राण ब्रह्म निश्चयात्मक । नव्हे कल्पांतीं ॥१९॥हा साधकें विचार पहावा । प्राण हा अविद्याकृत स्वभावा ।तस्मात् अनात्मा म्हणून त्यागावा । ब्रह्म खरें जाणोनी ।प्राणासी साह्य कर्मेंद्रिय । जडत्वें याची क्रिया होय ।प्राणचि अनात्मा तरी निश्चय । अनात्मत्व कर्मेंद्रियां ॥२१॥ब्रह्मलक्षणें प्राणासी नसती । ऐसा विचार जो करी सुमती ।तया विचारवंता श्रुति मागुती । आल्हादें सांगें ॥२२॥कीं प्राण नव्हे ब्रह्म परिपूर्ण । तरी अन्य आत्मा याहुन मन ।मनेंचि हा व्यापिला प्राण । तस्मात् मन ब्रह्मचारी ॥२३॥मनापासून सर्व भूतें जाहलीं । मनास्तव सर्व राहती मेलीं ।हीं ब्रह्मलक्षणें मनावरी कल्पिलीं । कीं साधकें निवडावीं पांचचि अंगें मनोमयासी । यजुर्वेदचि शिर ययासी । ऋृग्दक्षिण पक्ष जयासी । उत्तर पक्ष साम ॥२५॥उपदेश आत्मा बोलिला । अथर्वांगिरस पुच्छत्वीं स्थापिला ।हें किन्निमत्त याचा विचार केला । पाहिजे साधकें ॥२६॥मुख्य रूप मनाचें संकल्पात्मक । कांहीं संशयरूप करावा तर्क ।होय नव्हे हें निश्चयात्मक । कदां नाहीं ॥२७॥तया संशयाचे चिंतन । तेंचि चित्त परी मनाचे पोटीं लीन ।या अंतर्वृत्तीचें निर्गमन । पांचा ज्ञानेंद्रियद्वारा गगनीं वायु जेवीं उठे ।तेवीं आत्मत्वीं संकल्प उमटे । संशयात्मक चिंतन प्रगटे । श्रोत्रादि द्वारा ॥२९॥चिंतन संशय उभय लक्षण । तें अंतर्वृत्ति येकरूप मन । आणि ज्ञानेंद्रियपंचक मिळोन । साही मनोमय कोश ॥३०॥या मनोमय कोशामाझारी । विद्या अविद्या वास करी ।म्हणून बंधमोक्ष दोन्ही उभारी । प्रवृत्तिनिवृत्तिरूप ॥३१॥कामादि विषयासक्तीनें । जीवास बंध दृढ होणें । धर्मार्थ काम प्रवृत्तीच्या गुणें । कामादि अभावें मोक्ष ॥३२॥धर्म अथवा अर्थ काम । हाही मनाचा मनोधर्म । परी कळेना केवीं कर्माकर्म । म्हणून वेदाज्ञा पाहिजे ॥३३॥त्या वेदाज्ञे ऐसें प्रवर्तता । चारी पुरुषार्थ होती तत्वतां । परी जोंवरी विषयासक्तता । तोंवरी मोक्ष नाहीं ॥३४॥असो विद्या अविद्यात्मकामुळें । प्रवृत्ति निवृत्ति दोन्ही निवळे ।परी वेदाज्ञेवीण कांहीच न कळे । म्हणून वेदचि अंग मनाचें ॥३५॥यजुर्वेद शिर ऋृग्दक्षिण पक्ष । साम तो मनाचा उत्तर पक्ष । हे वेदत्रयी प्रवृत्तिरूप प्रत्यक्ष । येणें धर्मार्थ काम ॥३६॥येणें अविद्यात्मक विषयासक्ति । वाढूं लागे अधिक प्रवृत्ति ।बंधनींच पडे अभिमान उन्नति । तेव्हां जीव जन्मे मरे प्रवृत्ति अथवा निवृत्तीचा । उपदेश मनोमयीं साचा । म्हणोनि आदेश आत्मा बोले वाचा । श्रुति मनोमयासी ॥३८॥हें चवथें अंग मनोमयाचें । येथें वास्तव्य विद्या अविद्येचें ।जरी बोधकत्व प्रवृत्तीचें । तरी धर्मार्थकाम वाढे ॥३९॥निवृत्तीचा जेव्हां उपदेश । कीं आत्मा ब्रह्म हाचि निर्देश ।वेदत्रयी त्यागे विशेष । या विद्यात्मकें मोक्ष लाभे ॥४०॥पुढें जीवन्मुक्तिसुख हाणें । यास्तव अथर्वंगिरस पुच्छ म्हणे ।परी हा निश्चय बुद्धीनें करणें । मनीं उपदेश मात्र ॥४१॥याच हेतु मनोमयाहून । अन्य आत्मा कोशविज्ञान ।तेणेंचि मनाची पूर्णता होणें । नातरी संशयीं पडे ॥४२॥विज्ञान आत्मा जरी यथार्थं । तरी मनासी आत्मत्व वचन व्यर्थ ।आणि मन विकारी एक पदार्थ । ब्रह्म तों निर्विकार मनासी तों संकल्प विकल्प । ब्रह्म तां सदा निर्विकल्प । मन उठे निमे असद्रूप । ब्रह्म तिहीं काळीं सत् ॥४४॥मन जीवाचे प्रकाशें वर्ते । नातरी हें जडचि ऐतें ।ब्रह्म तों स्वप्रकाशें सुप्तीतें । जाणें स्वप्रभें ॥४५॥मन हें सुखदुःखें शीण पावे । ब्रह्म आनंदस्वरूप स्वभावें ।तस्मात् मना ब्रह्मत्व न संभवे ।बोलिले ते उपचारिक जरी मनचि ब्रह्म असतें । जीवा बंधन कासया करितें । मागुती निर्विषयत्वें सोडवितें । हें निर्विकारी विकार कां ऐसे नाना परीचे विरोध । मन ब्रह्म कल्पिता बहुविध । मना प्रत्यक्ष संकल्पविकल्प द्विविध ।ब्रह्म तरी निर्विकल्प मन वृत्तिनिवृत्तीचे साधन । ब्रह्म साध्यरूप द्वैतेंविण । तस्मात् मन त्यागून समाधान । साधकें पावावें ॥४९॥असो मनाचें अनात्मत्व जयासी । यथा कळलें निश्चयेसी । श्रुति माउली उपदेशी तयासी । कीं अन्य आत्मा विज्ञान विज्ञानास्तव सर्व होतें ॥२०५०॥विज्ञान आहें तों राहतें । शेवटीं ज्ञानीं लया जातें ।तरी पाहें होय कीं नव्हे ॥५१॥हें लक्षण ब्रह्मीचें बुद्धीवरी । योजना घडे परी निर्धारी ।बुद्धी नुरेचि मुप्तीमाझारीं । आणि पुन्हां उद्भवे ॥५२॥उद्भवतां मनाच्या सहवासें । संकल्पविकल्पा साह्य होतसे ।निश्चय करी परी विश्र्वासें । सत्यत्व स्थापी मिथ्यत्वा मी देह म्हणून दृढतर । निश्चयें घेतसे अहंकार । म्हणोनि अहंता धर्म साचार । बुद्धीचा असे ॥५४॥हेही पंचज्ञानेंद्रियद्वारा । बाह्य वर्ते विषयाकारा ।परी मन संशया मोडोनि निर्धारा । अमुकसा निश्चय करी ॥५५॥मनासी इच्छा कामादिकांची । तरी तैशीच आज्ञा पाळी वेदाची ।त्याच रीतीं बुद्धि घे रुचि । प्रवृत्तीकडे ॥५६॥अथवा मनें मोक्षाची इच्छा घेतां । आज्ञा तेचि मानी त्रयी परता ।तैशीच बुद्धीसी होय निश्चयात्मकता । यास्तव श्रद्धा शिर प्रवृत्तीकडे जरी आवडी । तरी स्वर्गादिकां सत्यता स्थापी प्रौढी ।अथवा मोक्षाकडे निश्चयाची वोढी ।तरी सत्यता ब्रह्मींची हा निर्धार बुद्धीचा पाहिला ।म्हणून श्रुतीनें असे नेम केला । ऋृत म्हणतसे दक्षिणपक्षाला ।सत्य उत्तर पक्ष ॥५९॥जें का सत्य म्हणून मानिलें । तेथेंचि अनुसंधान दृढ केलें ।हे बुद्धीचे स्वभावचि देखिले । तेव्हां योग आत्मा श्रुति म्हणे जे कां सत्य म्हणून मानिलें ।तेथेंचि अनुसंधान दृढ केलें । हे बुद्धीचे स्वभावाचि देखिले ।तेव्हां योग आत्मा श्रुति म्हणे योग म्हणजे अखंड उद्योग ।सत्य वस्तूचा ध्यानें संयोग । कदांही होऊं नेदी वियोग ।हें चवथें अंग विज्ञानाचें ॥६१॥त्या संयोगें जें अप्राप्त । तेंचि करून घेतसे प्राप्त । मग साभिमानें मानी कृतकृत्य । यास्तव महा पुच्छ बोलिलें ॥६२॥धन्य मी जें हृदयीं धरिलें । त्या वस्तूसी प्राप्त करून घेतलें ।ऐसें बुद्धीनें महत्त्व स्वीकारिलें । तस्मात् महा पुच्छ खरें एवं श्रद्धाचि विज्ञानाचें शिर ।ऋृत सत्य पक्ष दक्षिणोत्तर । योग आत्मा हा निर्धार । महा पुच्छ प्रतिष्ठा ॥६४॥ऐसा विज्ञानाचा प्रकार । श्रुति सांगतसे निर्धार । याचा साधकें अंतरीं विचार । या रीतीं केला पाहिजे ॥६५॥जैसें पंचज्ञानेंद्रियसहवासें । मन हें विषयाकार होतसे ।तैसेंचि विज्ञाना साहायत्व असे । पंचज्ञानेंद्रियांचें ॥६६॥तस्मात् पंचज्ञानेंद्रिय बुद्धि एक । हा विज्ञानकोश मिळून षट्क ।हा आनंदमयासी आच्छादक । कारण मनाचें ॥६७॥जरी बुद्धीस्तव सर्व जाहलें राहिलें । बुद्धि अभावीं लया गेलें ।परी यासी ब्रह्मत्व नाथिलें । नाश होय म्हणोनी ॥६८॥जैसें मन एक विषयग्रहणा । साधन असे भक्त ते विधाना ।तेवींच साधनता यया विज्ञाना । असे साध्यचि ॥६९॥तमात् विज्ञानात्मा कल्पूं नये । कोश हा अनात्मा निःसंशय ।परी विज्ञानयोगें कार्य । साधून घ्यावें ॥२०७०॥श्रद्धा शिर जें विज्ञानाचें । जें कां आवडतेपण स्वर्गादिकांचें ।तेंचि त्यागावें इहपर साचें । दोषदृष्टीनें विचारें ॥७१॥एक वेदांतप्रसिद्ध जें ब्रह्म । तेंचि गुरुमुखें आकळावें वर्म ।तेथेंचि बुद्धीची श्रद्धा परम । येर अनात्मजात त्यागा तेंचि ऋृत तेंचि सत्य साचाराशब्द दोन परी अर्थ एक हा निर्धार । तस्मात् ब्रह्म सत्यत्वें बत्तीस हे येर ।मिथ्यात्वें समजावें मिथ्यात्व कळतां श्रद्धा उडे । आणि सत्य ते सत्यत्वें जोडे । बुद्धीचा निश्चय धांवे तिकडे ।तेव्हां श्रद्धा ही सत्याची ॥७२॥मग देहबुद्धीचा करी त्याग । बह्मात्मयाचा अखंड योग ।सदां ध्यानाचा लागवेग । विसरचि पडो नेदी ॥७५॥ऐसा अभ्यास दृढ होती । शनैःदेहबुद्धि होय त्यागिता ।मग आपुलें महत्त्व स्फुरे तत्त्वतां । जें पुच्छत्वीं प्रतिष्ठिलें ॥७६॥अहंबह्मास्मि तरी स्फुरे । परी त्रिपुटी साधकत्वें उरे ।तेंचि महत्त्व विज्ञानानुकारें । निश्चयरूप ठसावें ॥७७॥येऱ्हवीं बुद्धि बंधासी कारण । परी विवेचनें मोक्षद होय आपण ।म्हणूनि मुमुक्षें जावें शरण । यया बुद्धीसी ॥७८॥देहबुद्धीचा निश्चय त्यागी । आत्मा ब्रह्म प्रतिपादी वेगीं ।मग मनही संशयातें त्यागी । एवं उपयोगी परमार्था ॥७९॥परी विज्ञानमय ब्रह्म साधावया । साधन असे गा शिष्यराया ।तस्मात् साधकत्व असे जया । तें साध्य ब्रह्म नव्हे साध्य तें उर्वरित उरावें । साधकें तत्क्षणीं नसावें । म्हणून विज्ञान तें ब्रह्म नव्हे । कवणे काळीं ॥८१॥ब्रह्म सत् बुद्धि असत् । ब्रह्म चित् विज्ञान जड उद्भवत ।विज्ञान सदां सुखदुःखें शिणत । ब्रह्म सुखैधन ॥८२॥ऐसें विलक्षण परस्परें । म्हणोन विज्ञान ब्रह्म नव्हे खरें ।हें साधकें पहावें विचारें । निःसंशयपणें ॥८३॥जरी विज्ञान कारण सर्वांसी । लय स्थिति कीं उद्भवासी ।परी कार्यरूपता विज्ञानासी । कारण आनंदमय ॥८४॥श्रुति बोले या विज्ञानाहून । अन्य आत्मा आनंदमय पूर्ण ।तेणेंची बुद्धीची पूर्णता होणें । तस्मात् विज्ञान अनात्मा आतां आनंदमय कोश हा पूर्ण ।कार्य करणासीही कारण । बुद्धीसहीत सर्व भूतें निर्माण ।होतीं राहतीं नासतीं ॥८५॥येर अन्नादि विज्ञानांत चारी । कारणें कल्पिलीं असतीं निर्धारी ।परी आनंमयाची नये सरी । कारणत्वाविशीं ॥८६॥आनंदेवीण भूतें नाना । कदापि उत्पन्न होतीना । आणि आनंदेवीण राहतीना । क्षणभरी जीवत्वे ॥८८॥सुप्तिकाळीं विज्ञानासहित । त्यागून अन्नमयादि समस्त ।प्राण जरी असती वावरत । परी सद्भाव नाहीं ॥८९॥एवं चारीही कोशांवांचून । सर्व भूतें सुप्तींत पूर्ण । असतां आनंदमयामाजीं लीन । वंचतीं सुप्तिसुखें ॥२०९०॥एवं चारी असतां येका आनदें । वांचतीं भूतें सुखस्वादें ।परी एक आनंदेविण चारी विशदें । असतां भूतें न वांचतीं तस्मात् मुख्य कारण आनंदमय ।आणि आनंद कोणाचें नव्हें कार्य । येरांशी कारणाचा आरोप होय ।परी कार्यरूपी चारी ऐसा आनंदमय मुख्य कारण । परी याचाही विचार साधकें करणें । ऐसें श्रुतीही बोलिली जें वचन । तेव्हां उणीवता वाटे आणि कोश ऐसे आनंदा म्हणतां ।हें तों प्रत्यक्ष आच्छादकता । परी आच्छादिले असेल आंतौता ।तें तों भिन्न याहुनी ऐसा विचार साधकें करावा ।या आच्छादनीं कोण स्वभावा । तो निवडुन येर त्यागावा गोंवा ।कोश नामाचा ॥९५॥याही कोशासी पांच अंगें । पक्षा ऐसींच श्रुति सांगे । हेंचि किमर्थ हा लागवेगें । विचार करावा ॥९६॥जरी अतिसूक्ष्म विचारवंत । तरीच आनंदमयातें निरसित ।येऱ्हवीं मागुतीं बंधनीं पडत । जरी चारी कोश निरसिले जैसें तृण वरचिल जळालें ।भूमीपोटीं बीज उरलें । तेवीं विज्ञानादि चारी निरसिले ।परी अज्ञान उरे आनंदीं ॥९७॥वर्षांकाठीं पुन्हां तें तृण । पूर्ववत् होतसे निर्माण । तैसी विज्ञानादि भूतें संपूर्ण । उद्भवती पूर्णपरी ॥९९॥ते कां निरसिलें ऐसें म्हणावें । जरी पुन्हां मागुतीं बाधक उद्भवें ।असो साधकें येथें विचारें पहावें ॥२१००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.