सप्तशती आर्या/अध्याय पांचवा

विकिस्रोत कडून

ते चंड मुंड तेथुनि गेले घेऊनि कटक चतुरंग ॥ ज्यांचे रजें मळविती दिगिमकटहि न स्वःभट कच तुरंग ॥१॥


जें प्रिय वाहुनि चरणीं फल जळ दळ एक सुमाहि मागा तें ॥ ऐसें जी माय ह्मणे जीचा कवि वृंद सु- महिमा गातें ॥२॥


तीतें तुहिन नर्गांच्या कांचन शृंगीं सलील वसलींतें ॥ ते खळ देखति सिंही कांहिंसे शृंगीं सलील वसलीतें ॥


पाहुन सिद्धी धरया झाले दुर्गेसि बहुत पामर ते ॥ न च शक्तें जरि शतदा नियमें साधुनि बहु तपा मरते ॥४॥


कोपे त्यांवरि देवी तें जेंशरदिंदुकान्तिचें सदन ॥ झालें कज्जलवर्ण क्रोधें तत्काल तें तिचें वदन ॥५॥


झालें ललाट तीचें सहसा क्रोधें करुन जें कुटिलें ॥ तेथुनि काळी प्रकटे वाटे काळादिकांसि ती कुटिलें ।\६॥


ती खंग पाश हस्ता अत्युग्रा त्या सुराऽरि कटकांत ॥ शिरली सशांत जैशी व्याघ्री स्येनाहि जोविं चटकतं ॥७॥


वीरांसाह कवळ जसा हय रथहि तसाचि ती करी सगळा ॥ जीचा न चाविला जो त्यासि मुखें वाटे करीत गळा ॥८॥


तीच्या दशनांसि कठिण परशस्त्रांचे न रासि पापडसे ॥ तद्धेहा अस्त्र जेअसें न ब्रह्माज्ञा नरासि पाप डसे ॥९॥


सर्वत्र पाविजेला क्षणमात्रें नाश चंड सेनांहीं ॥ करिती परांसि चरणहि काळीचे काळ दंडसे नाहीं ॥१०॥


जे प्रबळां असुरांतें कालीचे चुर्ण करिति दंत कसे ॥ ते न ह्माणावे चंडे मुंडें अत्युग्र मूर्त अंतकसे ॥११॥


ज्यातें अवलंबुनि ज्या निजशत्रु बळासि न हरि खपवी तें ख्पवुनि काळिका त्या देईल न लाज न हैरिख पवीतें ॥१२॥


चंडाच्या शस्त्राचा न करि तिचें गरळ कटु निकरें काहीं ॥ मुंडायुधवृष्टिही नग भग्न न केलाचि झटुनि करकांही ॥१३॥


मुंडें सहस्त्रशः क्षय त्या कालीजा कारावया वक्त्रें ॥ शक्रें ज्यां जोडावें कर ऐशीं सोडिलीं महाचक्रें ॥१४॥


सुबहु दिवाकर बिंबे जैशीं मेघोदरीं तशी शिरलीं ॥ काली मुखांत चक्रें जेवि अपक्रुतें महाशनीं जिरलीं ॥१५॥


चक्रें गिळोनि काळी त्रिभुवन भय कारका महास्पातें ॥ पसरुनि करी धरुनियां सुर रिपु वध सारकाम हास्यातं ॥१६॥


जेणें हरिलीं होतीं अमर नरांची किरीट मुंडांसी ॥ काळी खवळुनि कवळुनि कटक भिडे सुरजयार्थ मुंडासी ॥१७॥


काळींने धरिला जों प्राशाया पर तमासि असिं तरणी ॥ प्रसवे धवळ यशा जरि आपण वर्णेंकरुनि असित रणीं ॥१८॥


धांवे वेगें परम क्षुधितां धृष्टांखुवारि जसी व्याली ॥ त्या पुंडां मुंडाचे मस्तक खंडी महाऽसिनें काली ॥१९॥


त्या चेंड मस्तकार्तें खंडी त्याच्या कंचांसि कवळुन ॥ खवळुनि रणीं मुखवी विश्वस यशे अशेष धवळुन ॥२०॥


त्याचें हत शेष बळ न टिकलें कालीपुढेंक भयें पळ तें ॥ सव पळालें जैसें तिमिर दिनकरप्रभोदये पळतें ॥२१॥


जें चंड मुंड मस्तक युग काली दे तिला उपायन तें ॥ केल पुरुषार्थचे सफळीचे ज्या सर्वही उपाय नतें ।|२२॥


काली ह्मणे महापशु दिधले म्यां चंड मुंड तुज आधीं ॥ शुंभ निशुंभ शिवे तुं वधुनि रण मखीं यश स्वयें साधीं ॥२३॥


देवी ह्मणे मजकडे तुं घेउनि चंड मुंड आलीस ॥ यास्तव तुज चामुंडा हे दिधलें ख्यात नाम आलिंस ॥२४॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.