संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण/ आजचे आपले अस्वस्थ वर्तमान

विकिस्रोत कडून

 माझे बहुतांश लेखन याच भूमिकेतून झालं आहे. मला हे मान्य आहे की, एक लेखक म्हणून मी हे जग कदाचित बदलू शकणार नाही, पण बदलणा-या जगात काय असावं, काय असू नये याची नीलप्रत - ब्ल्यू प्रिंट मी देऊ शकतो. उदाहरणार्थ, या जगात बालमजुरी प्रथा असता कामा नये, कोणत्याही मुलाचं बालपण गरिबीमुळे हरवता कामा नये, त्यासाठी मी 'हरवलेले बालपण' कादंबरी लिहिली किंवा स्त्रीभ्रूणहत्या हे सामाजिक पातक आहे, (म्हणून ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह मी सिद्ध केला.) किंवा जगाला दहशतवादानं ओलीस धरता कामा नये आणि कट्टर धर्मांधता आणि हिंसा हे कॉकटेल जगासाठी विनाशकारी आहे. (त्यासाठी मी ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही कादंबरी लिहिली) आणि अशा अनेक प्रश्नांचा साहित्यातून वेध घेऊन मी माझे लेखकिय नैतिक कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न केला आहे.
 साहित्य हे धर्म आणि विज्ञानाप्रमाणे सत्याचा शोध घेण्याचे साधन आहे, तद्वतच ज्या तीन मूल्यांद्वारे आधुनिक सुसंस्कृत समाजाची निर्मिती होते, ती तीन मूल्ये म्हणजे विज्ञानवाद, विवेकवाद आणि मानवतावाद होय. प्रश्न विचारणे व बुद्धीच्या कसोटीवर पारखून कोणतीही गोष्ट स्वीकारणे म्हणजे विज्ञानवाद. सत्असतूची व नैतिक-अनैतिकतेची कसोटी लावून वागणं म्हणजे विवेकवाद. माणसानं माणसावर प्रेम करावं व एकमेकाला धरून राहावं आणि शांततामय सहअस्तित्व मान्य करीत जगावं म्हणजे मानवतावाद. या तिन्ही मूल्यांचं भरण-पोषण माणसाच्या मनात चांगल्या साहित्यानं होत! म्हणून साहित्याला या आशयाचे सामाजिक प्रयोजन आहे. मानवी संस्कृतीचा उद्देश हा मानवी कल्याण हा आहे व साहित्याचा पण तोच उद्देश आहे. ही माझी साहित्याची वाचन-चिंतन आणि प्रतिभेतून सिद्ध झालेली भूमिका आहे. त्या दृष्टीने आपण माझ्या साहित्याचे वाचन व समीक्षा केली तर मला आनंद होईल.


तीन
आजचे आपले अस्वस्थ वर्तमान


 जेव्हा साहित्यिक - कलावंत सद्य:स्थितीवर सत्ताधा-यांना न रुचणारं परखड भाष्य करतो किंवा एखाद्या चळवळीला समर्थन देतो आणि त्यात भाग घेतो, तेव्हा राजकीय माणसं - पक्ष कधी साळसूदपणे तर कधी छद्मीपणे विचारतात, 'तुम्ही तुमचं साहित्य-बिहित्य, लेखन-बिखन खुशाल करा, इथं कशाला लुडबूड करता ?' याद्वारे साहित्यिकांचं राजकारण हे क्षेत्र नाही, असं त्यांना सांगायचं असतं! त्यांना आज मला हे या पवित्र मंचावरून सांगू द्या की, केवळ कला व सौंदर्यबोध हेच साहित्याचे प्रयोजन नाही, तर वास्तव दर्शन आणि भविष्यसूचन हेही साहित्याचं सामाजिक प्रयोजन आहे. लेखक-कवी जेव्हा माणसाच्या दु:ख, वेदना आणि शोषणाची कहाणी सांगत असतो व त्याचा आवाज बनत असतो, तेव्हा ज्या व्यवस्थेमुळे हे दु:ख होतं, त्यावर तो भाष्य करीत असतो. व्यवस्था-सिस्टीम जी राजकीय, सामाजिक व प्रशासकीय यंत्रणा नियंत्रित करतो आणि प्रसंगी सामान्य माणसाची कोंडी करते, त्यावरचं निर्भीड लेखन व चिंतनशील भाष्य करणारे साहित्य हे व्यापक राजकीय भाष्यच असतं! दबलेली - पिचलेली माणसं व्यवस्थेनं हतबल असतात. त्यातील काही बंडखोर होत आवाज उठवतात, व्यवस्थेला आव्हान देतात, त्यामुळे व्यवस्था काही प्रमाणात हादरते - बदलते. पण व्यवस्थेची मूळ प्रवृत्ती असते, मूठभरांचं बहसंख्य जनतेवर नियंत्रण राखणं, त्यांना दाबात ठेवणं, आपल्यावर विसंबून राहायला भाग पाडून त्यांना पंगू-कमजोर ठेवणं.... पण लेखककलावंत हे स्वभावत:च या बहुसंख्य असलेल्या 'नाही रे' वर्गाच्या, शोषितपीडितांच्या मानवी दु:खानं दूवणारे असतात आणि त्यांचं लेखन हे जी परिस्थिती माणसाला दु:ख, वेदना व शोषण देते, त्यावर प्रहार करतं आणि ही व्यवस्था बदलली पाहिजे असे सांगतं. म्हणून त्यांचं हे व्यवस्थेवर प्रहार करणारं लेखन राजकीय असतं, व्यापक - सामाजिक असतं. म्हणून खरा जातिवंत लेखक हा राजकीय लेखकच असतो. राजकीय भाष्यकारच असतो! तो त्याला भारतीय संविधानानं दिलेला अधिकार आहे.
 मित्रहो, मी ही व्यवस्थेवर प्रहार करणारा व ती बदलावी म्हणून लेखन आशारा राजकीय लेखक आहे. जेव्ही मी 'पाणी ! पाणी!!' कथासंग्रहात पाणी चाई व दुष्काळाचा मानवी नातेसंबंधावर कसा परिणाम होतो याच्या कथा लाल्या तेव्हा त्याला कारणीभूत असणा-या राजकीय नेते व नोकरशाहीच्या भ्रष्ट युतीवर कथेच्या ओघात भाष्य केलं. ते माझं राजकीय लेखनच आहे, असे मी नाना. कारण मला मानवी दु:खाला कारणीभूत असणारी निरंकुश सत्ता छ वित्रणाची राजकीय व्यवस्था मान्य नसते. म्हणूनच भाष्य करतो.... हिंदी कवी दुष्यंतकुमाराच्या 'मैं फरिश्ता हैं। सच बताता हैं।' या कवितेचा संदर्भ देत हे सांगू अच्छतो की, मीही त्याच जातकुळीचा फरिश्ता असलेला लेखक आहे व आजवर माझ्या कथा-कादंब-यातुने भ्रष्ट व्यवस्थेचं रूप नग्न करून कोरडे ओढणारं भाष्य कल आहे. ते राजकीय आहे व त्याला माझा नाइलाज आहे. मी माझ्या भवताली व माझ्या राज्यात- देशात जे घडतं आणि सामान्य माणसाच्या पदरी दारिद्रय, वंचना आणि हतबलता इथली राजकीय-सामाजिक-प्रशासकीय व्यवस्था व संस्था / पक्ष टाकतात, तेव्हा मी स्वस्थ बनू शकत नाही. मी त्यांच्यासाठी व त्यांच्याबाजूने आवाज उठवणार. पण माझा मार्ग साहित्याचा आहे व लेखणी हे माझे शस्त्र - माध्यम आहे. पुन्हा माझ्या भारतीय संविधानानं मला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं आहे. आज या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून मला सामान्य माणसाची अस्वस्थता, दु:ख, खदखद व्यक्त करू द्या. ती व्यवस्थेनं ऐकावी, समजून घ्यावी व बदलण्याचा प्रयत्न करावा म्हणून.
 शंभर वर्षांपूर्वी ह. ना. आपटेंनी दुष्काळाचा वेध घेणारी एक दीर्घ कथा लिहिली होती. ‘काळ तर मोठा कठीण आला' सामान्य माणसांसाठी आजचा काळ तर फारच मोठा कठीण आला आहे. शिक्षणामुळे आलेलं आत्मभान पण बेकारी व रोजगार विरहीत विकासामुळे प्रामाणिक व समाधानी जीवन जगता न येणं, हे आजचे रोकडं काळं वास्तव आहे. साध्या, किमान गरजांचीही पूर्तता न होता अभावाचं जगणं जगावं लागणं ही भारतातल्या एका फार मोठ्या लोकसंख्येची तेवढीच फार मोठी शोकांतिका आहे. मूठभरांची श्रीमंती व वाढती विषमता, खरे प्रश्न सोडवता येत नाहीत म्हणून पद्धतशीरपणे बुद्धिभ्रंश करीत धार्मिक उन्माद निर्माण करणं, जुन्या भूतकालीन इतिहासात जगायला लावणं आणि आजच्या तरुणाईला पथभ्रष्ट - गुमराह करणं, स्त्रिया-बालके व वाढत्या लोकसंख्येचे ज्येष्ठ नागरिक यांचे बिकट प्रश्न, हे। पाहता पुन्हा हताशपणे ‘काळ तर मोठा कठीण आला' असंच म्हणायची वेळ आली आहे. या कठीण काळाचा आरसा मला तुम्हाला दाखवू द्या.
 भारत हा खेड्यांचा देश आहे व कृषिसंस्कृती हीच या देशाची संस्कृती आहे. देशाचा पोशिंदा बळीराजा शेतक-याच्या वाढत्या आत्महत्या हे आपल्या बाजारकेंद्रित विकासाचं कुरूप फळ आहे. मी ललित लेखक असल्यामुळे आकडेवारीतून प्रश्न सांगण्याऐवजी मानवी संवेदनेच्या संदर्भात प्रश्न - दु:ख मांडणं माझी स्वाभाविक प्रवृत्ती आहे. म्हणून शेतक-यांच्या संदर्भात 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या नव्या वर्षाच्या प्रारंभी २ जानेवारीच्या बातमीकडे मला आपलं लक्ष वेधू द्या. 'शेतकरी घरातील स्त्रियांना नवरा हवा आहे. शिपाई पण चालेल, पण शेतकरी नको त्या बातमीत दरमहा वीस हजार रुपये शेतीतून उत्पन्न कमावणाच्या एका शेतक-याची सत्यकथा आली आहे. गेली दहा वर्षे त्याला एकही मुलगी चांगली शेती असूनही पसंत करत नाही. मागच्या वर्षी या संदर्भात काही गावांचे सर्वेक्षण झालं होतं, त्यातून शेती करणाच्या तरुणांचं लग्न होणं किती कठीण झालं आहे, हे विदारक चित्र समोर आलं आहे. त्यामुळे व शेती परवडत नसल्यामुळे मागील काही वर्षांत एक कोटीहन जास्त शेतक-यांनी शेती सोडली आहे. जे आज शेती करतात. ते नाइलाजानं. त्यांना दुसरा रोजगार मिळाला असता तर, त्यांनीही शेती सोडली असती. जगण्यासाठी शिक्षण-आजारपणासाठी पुरेसं उत्पन्न काबाडकष्ट करूनही मिळत नसेल, आत्महत्येला प्रवृत्त करत असेल, घड लग्नही होत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं? एकेक शेतकऱ्याचं जगणं आणि एकेक शेतकरी आत्महत्या इथल्या व्यवस्थेला आव्हान देत आहे की, तुमची धोरणं व विकासनीती आमच्यासाठी कामाची नाही....या साऱ्यांवर अनेक लेखक-कवींनी हृदय पिळवटून टाकणारं लिहिलं आहे. मीही लिहिलं आहे..... आज मला सत्ताधारी पक्ष व शासनाला हा सवाल करायचा आहे, की आपण जागे कधी होणार? किती काळ आपण असा अंत पाहाणार आहात शेतकऱ्यांचा ? दंडकारण्य भागात आदिवासींवर अन्यायाची परिसीमा झाली, म्हणून त्यातून नक्षलवाद जन्मला.... आपल्याला हे शेतकऱ्यांच्या संदर्भात परवडणारं नाही. शेतकरी सोशिक आहे, त्याचं काळ्या आईबर प्रेम आहे व न परवडणारी शेती करीत तो देशाचं पोट भरत आहे. सबब आपण समाज व सरकार त्यांचं जगणं कसं सुखाचं करणार आहोत, हा या घडीचा कळीचा प्रश्न आहे. तो मला आज या मंचावरून सरकारला व समाजाला विचारायचा आहे. हे राजकीय भाष्य समजू नका; पण एक कलावंत म्हणून मी शेतकरी- कष्टकऱ्यांच्या दु:खाशी आयडेंटिफाय करतो - तो माझा धर्म आहे. त्यांना स्वर देणं, त्यांचा आवाज बुलंद करणं ही आमची कमिटमेंट आहे.
 भारताचं दुसरं भळभळतं दु:ख म्हणजे तरुणांची बेरोजगारी, आजचा आपला देश तरुणांचा भारत आहे. इथले ६५% लोक हे पस्तीस वर्षाखालचे आहेत आणि त्यांना पुरेसं व सन्मानजनक वेतन देणारं काम निर्माण होणं कमी कमी होत चाललं आहे.जागतिकीकरण, बाजारी अर्थशास्त्र आणि डब्ल्यू. टी. ओ. आदीवर भरपूर बोलून झालं आहे. उत्पादन क्षेत्रातलं यांत्रिकीकरण - ऑटोमायझेशन एवढं वाढलं आहे की, तिथे नव्या रोजगाराला बावच उरला नाही. रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातलं उच्च संशोधन व ते उत्पादनवाढीसाठी वापरणं यामुळे उद्योगपतींचा उत्पादन खर्च कमी होतोय व नफा वाढतोय, पण त्याच वेळी तरुणांचे लाखो रोजगार हिरावले जात आहेत. नवे उच्च बुद्धिमत्तेचे नवे रोजगार निर्माण होत आहेत, हे खरे असले तरी त्याचा लाभ मूठभर बुद्धिमंतांनाच मिळणार आहे. इतर लाखो सामान्य तरुणांचं काय? माणसाला यंत्र त्याचं कष्टाचे काम सुकर व्हावं म्हणून निर्माण झाले, पण आज व भविष्यात तेच जर हावी होणार असतील तर, तरुण बेकार व रिकामा राहील, त्यानं काय करायचं? कारण काम न करणं व रिकामं राहाणं हा शाप आहे आणि रिकामं मन हे सैतानाचं घर असतं, ही सत्यरूपी म्हण तर सर्वांना माहीत आहे. मग असे रिकामे मन, रिकामे हात असलेल्या अस्वस्थ तरुणांनी काय करायचं? त्यांच्यात वाढत जाणारी धार्मिकता व उन्माद कशाचं लक्षण आहे? आणि त्याचा लबाडीने राजकीय पक्ष, जातीय-धार्मिक ध्रुवीकरणासाठी वापर करत आहेत. मतांचं भरघोस पीक काढत आहे. आज तरुण एवढा खदखदतो आहे की कोणत्याही निमित्तानं त्याच्या दबलेल्या रागाचा व संतापाचा उद्रेक होतो. मग हिंसा, महिलांवरील अत्याचार, दहशतवाद हे एकरूप या उद्रेकाचं दिसतं तर दुसरं ताणतणावाचं. सत्तर-ऐंशी टक्के तरुण जर असे अस्वस्थ व आशेचा दीप मालवून बसलेले असतील तर देश कसा समर्थ होणार? त्यामुळे आजचा तरुण जातीय अस्मिता, इतिहासकालीन प्रेरणा आणि भ्रामक धार्मिक परंपरेत अडकला जात आहे. पुन्हा निवडणुकीच्या राजकारणामुळे तो धर्म-जात-समूहाची आधुनिक काळाला विसंगत असणारी अस्मिता जखमांप्रमाणे कुरवाळीत बसत आहे. तो ‘व्हिक्टिमहुड सिंड्रोम'चा शिकार झाला आहे. हे सारे आम्ही लेखकांनी लिहायचे नाही, तर कुणी लिहायचे ? ते लिहिताना सरकार, राजकीय पक्ष आणि भ्रष्ट बेलगाम झालेल्या शासन व्यवस्थेवर आसूड ओढायचे नाहीत का?, भाष्य करायचं नाही का?, आवाज उठवायचा नाही का? तो निर्भीडपणे उठवलाच पाहिजे. धोरणकर्त्या सरकारला आणि अंमलबजावणी करणा-या नोकरशाहीला जाब विचारला पाहिजे! माझी लाईफ' ‘टाइम'चा ‘फॉर्म्युन या कथेत भ्रष्ट व्यवस्थेचे बळी ठरलेले तीन तरुण तीन भिन्न दिशेने कसे जातात हे दाखवले आहे. एक टोकाची भूमिका घेत नक्षलवादी होईन म्हणतो, दुसरा परिस्थितीशी जमवून घेत भ्रष्ट व्यवस्थेचा भाग होतो, तर तिसरी तरुणी याविरुद्ध लढण्याचं ठरवते. ही आजच्या तरुणाची प्रातिनिधीक स्वरूपाची कहाणी आहे. ती व्यापक अर्थात राजकीय कथा आहे.
 मी आता 'इंडियन एक्स्प्रेस' मधली एक बातमी सांगणार आहे. तिचं शीर्षक आहे, 'No country for women, children and Dalit' नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो डाटा २०१६ च्या अहवालाच्या आधारे या बातमीत हा तुमचा-माझा देश स्त्री. मुले व दलितांसाठी त्यांच्यावरील वाढत्या गुन्हे व अत्याचारामुळे कसा व किती असुरक्षित झाला आहे, यावर भेदक प्रकाश टाकला आहे. अल्पवयीन मुलेखास करून मुलीवरील बलात्कार आणि ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्स' (पोंकसो) या कायद्याखाली नोंदलेल्या गुन्ह्यात ८२% वाढ एका वर्षात झाली आहे. गरिबी, कंटाळवाणी शाळा आणि शिकून उद्या काय नोकरी मिळणार आहे? तर मग आजच कामास लागून पैसा कमवावा म्हणून लाखो बालकाचं बालपण हिरावून घेतलं जातंय. बालमजुरी हा देशावरचा सर्वांत मोठा कलंक आहे. लहान वयात मुलांना उबदार घर व सुरक्षित बालपण -शिक्षण व मनोरंजन, क्रीडा सोडून दहा-बारा तास उरस्फोडी काम करावं लागणं किती भयानक आहे? त्यामागे भ्रष्ट राजकारणी व नोकरशाहांची नफेखोर मालकांशी झालेली युती आहे. हे मी माझा 'हरवलेले बालपण' कादंबरीत दाखवले आहे. ज्या देशाचं बालपण असुरक्षित आहे, तो देश कसा सुरक्षित राहील? यावर अभ्यासकासोबत कलावंतांनी पण आवाज उठवला पाहिजे. बालमजुरी बंद झाली पाहिजे. बालकांवर अत्याचार होणार नाहीत यासाठी सरकारनं काम केलं पाहिजे, तर समाजानं याबाबत ‘झिरो टॉलरन्स' दाखवला पाहिजे.
 आजची भारतीय स्त्री पण कुठे सुरक्षित आहे? निर्भया प्रकरण ताजं आहे. रस्त्यावर ती बेगुमान झालेल्या पुरुषी वासनेला बळी पडते आहे, पण घरी तरी, ती कुठे सुरक्षित आहे? घरातली मोठी माणसंच आपल्या मुलीबाळींवर अत्याचार करीत आहेत व त्यांची संख्या वाढत आहे. विवाहित स्त्रीला पण नव-याकडून छळ, मारहाण, हुंड्याची मागणी आणि बळजबरी नव्हे बलात्कार यांना हरघडी सामोरं जावं लागत आहे. काय झालं आहे भारतीय पुरुषी मानसिकतेला? जातीबाहेर लग्न केलं म्हणून ‘ऑनर किलिंग' घडवून आणणं, आंतरधर्मीय विवाह केला म्हणून धार्मिक थयथयाट करणं व नवदाम्पत्यास जगणं नकोसं करणं, मुलाच्या हव्यासापायी स्त्रीभ्रूण हत्या करणं, बालविवाह, कुपोषण, मुलीच्या आधुनिक पेहरावाबाबत - मोबाईल वापरण्याबाबत बंदी घालणा-या जातपंचायती, जबानी तलाकाला बळी पडणाच्या मस्लीम स्त्रिया व त्यांना संरक्षण देणे दूर, पण त्याबाबच्या कायद्यावरून राजकारण व धार्मिक तुष्टीकरण करणे...किती व काय सांगावं ? स्त्रियांचे हे सारे प्रश्न पुरुषसत्ताक वर्चस्वाने निर्माण झाले आहेत. त्यावर भारतीय संविधानात उत्तर आहे, तोडगे आहेत व मार्गदर्शक तत्त्वे आहेत. पण आपली राजकीय व्यवस्थाही पुरुषप्रधान आहे, आणि मुख्य म्हणजे ती स्त्रीसाठी फार मोठ्या प्रमाणात अनुदार आहे..... हे माझं निरीक्षण राजकीय टीप्पणी आहे का? आजच्या गढूळ वातावरणात ती जरूर ठरू शकते. अशा स्त्रीसाठीच्या अत्यंत विपरीत परिस्थितीत लेखक- कलावंतांनी स्त्री हक्काची बाजू घेत आवाज उठवला पाहिजे. स्त्री ही शिक्षण घेत स्वावलंबी होत सावित्रीबाई फुल्यांची खरीखुरी लेक होत असताना इथला पुरुष वर्ग बदलत नाही, स्त्रीला समान लेखत नाही व त्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुलेंचा तो वारसदार पुत्र होताना दिसत नाही..... ही आमच्या भारतीय स्त्रीची शोकांतिका आहे.
 आपल्या भारतीय संविधानानं अस्पृश्यतेचे उच्चाटन केले आहे पण सत्तर वर्षे झाली तरी तथाकथित वरिष्ठ जातिजमातीची मानसिकता फारशी बदललेली नाहीय. २०१६ या एका वर्षात लखनौ, हैदराबाद व बेंगळूरू शहरात दलितांवरील अत्याच्याराच्या प्रकरणात मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. ती प्रामुख्याने 'प्रिव्हेंशन ऑफ अॅट्रोसिटीज अॅक्ट' अंतर्गत झाली आहे. याच कायद्यातंर्गत उत्तर प्रदेश, बिहार व राजस्थानमध्येही मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले आहेत. आपल्या महाराष्ट्राची पण परिस्थिती फार चांगली नाही. खैरलांजी ते नगर जिल्ह्यातील मागील काही वर्षांत घडलेल्या अंगावर काटा आणणा-या घटनांची आठवण महाराष्ट्र विसरला नसणार.... नितीन आगे या दलित तरुणाचे त्याच्यापेक्षा उच्च जातीच्या मुलीशी तथाकथित प्रेम किंवा मैत्री आहे, तो तिच्याशी बोलत होता म्हणून त्याचा खून झाला. नुकतेच त्यातील सर्व आरोपी पुराव्याअभावी म्हणजे साक्षीदार फितूर झाल्यामुळे सुटल्याच्या घटनेनी दलितांवरील अत्याचाराचा व त्यांना न्यायव्यवस्था योग्य न्याय देत नसल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उनाला गोहत्या केल्याच्या संशयावरून दलित तरुणांना उघडे करून पट्यानं मारणं असो की २०१८ च्या प्रथम दिवशी कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे जमा झालेल्या लाखो दलित बांधवांच्या अभिवादन समारंभाच्या निमित्ताने झालेली दंगल असो.... उच्चवर्णीय हिंदू समाजास संविधानाच्या शस्त्राने व शिक्षणामुळे आलेल्या आत्मभानातून जागी झालेली दलित अस्मिता सहन होत नाही. कारणे काहीही असू देत, पण पीएच्. डी. करणा-या बुद्धिवान दलित तरुण रोहित वेमुलास आत्महत्या करावी लागते, ही का केवळ त्या समाजाची शोकांतिका आहे? नव्हे, ती सर्व भारताची शोकांतिका आहे. २०१६ मध्ये मी ‘बाटगी विहीर' ही कथा लिहिली होती. त्यात एका गावात दलितांच्या कबड्डी खेळाडूंना लाल मातीत खेळल्यानंतर शरीर स्वच्छ करण्यासाठी गावकरी अंघोळीला पाणी देत नाहीत, तेव्हा ते काही वर्षांपासून बंद पडलेल्या विहिरीतील पाणी उपसण्यासाठी उतरतात व पालापाचोळा कुजल्यामुळे निर्माण झालेल्या विषारी वायूमुळे गुदमरून मरतात.... हा त्या कथेचा आशय आहे. मला एका सत्य घटनेवरून ही कथा सुचली होती व मी ती लिहिली. तेव्हा एका दिवाळी अंकाने ती मध्यमवर्गीय शहरी वाचकांना दिवाळीच्या आनंदात विरजण टाकणारी वाटेल, म्हणून छापायची नाकारली होती. ब-याच वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं जाहीर दहन केलं होतं, त्या स्त्रीशूद्र वर्गास दुय्यमत्व व गुलामी देणा-या ग्रंथाचा आज कोणी जाहीर उच्चार करते नाही, पण वाढते दलित अत्याचार हेच दर्शवतात की, आजही तथाकथित उच्चवर्णीयांच्या मनात वर्णव्यवस्था व त्यामुळे जन्मलेली अस्पृश्यता जिवंत आहे. त्यावर राजकीय पक्ष एक तर भूमिका घेत नाहीत, नाही तर त्याचा राजकीय मतांचं पीक घेण्यासाठी वापर करतात. या दोन्ही अनिष्ट व निंदनीय प्रवृत्ती आहेत, त्याचा आपण साहित्यिक व वाचक म्हणून किती प्रमाणात निषेध करतो? भारताचं हे दुर्दैवी वास्तव आहे की, इथे पाण्यालाही जात असते - आजही आहे. माझ्या ‘पाणी ! पाणी!!' कथासंग्रहात मी पाणी टंचाईचा सामना करताना गावकुसाबाहेरचे दलित, बलदंड व सत्तास्थानी असलेल्या जाती, बहुजन समाज व खेड्यात अगदी अल्प असलेल्या ब्राह्मण समाज यांच्यात जातीच्या उतरंडीमुळे कसा फरक पडत जातो, यावर चारे कथा आहेत. त्यातील दलित व बहुजनांच्या जीवनावर पाणी टंचाईचा किती विपरीत परिणाम होतो, हे मी दाखवायचा प्रयत्न केला आहे.
 मित्रहो, दलित समाजाचा प्रश्न केवळ शिक्षण व रोजगाचा नाही तर, तो आहेच पण त्याहून जास्त त्यांच्या जागृत झालेल्या आत्मभानाचा व अस्मितेचा उच्चवर्णीय समाज स्वीकार करत नाही, उलट ती प्रसंगोप्रसंगी ठेचायचा प्रयत्न करतो हा अधिक आहे. मराठीतला विजय तेंडुलकरांनी लिहिलेला व जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेल्या 'सामना' चित्रपटातील मास्तरांचा आर्त व नैतिक प्रश्न मारूती कांबळेचं काय झालं?' आजही तेवढाच जिवंत व प्रखर आहे. मारूती कांबळे हे केवळ रूपक नाही, तर दलित व 'नाही रे' वर्गाच्या दडपल्या जाणा-या अस्मितेचा आकांत आहे. आता सुदैवानं दलितातून नवं नेतृत्व पुढे येत आहे, जे भारतीय संविधानानं त्यांना दिलेले अधिकार मागत आहेत. त्यासाठी संघर्ष व्हावा, हे भारतीय समाजाला एकविसाव्या शतकात शोभत नाही. त्यामुळे सरकार, राजकीय पक्ष व व्यवस्था आणि आपण सान्या सुशिक्षित विचारी माणसांनी यावर बोललं पाहिजे, सामूहिक आवाज बुलंद केला पाहिजे. मी माझ्या काही कथातून याला वाचा फोडून दाहक वास्तवाचा आरसा वाचकांपुढे धरत माझे लेखकिय कर्तव्य पार पाडलं आहे. मराठीतले अनेक लेखक-कवी मोठ्या ताकदीनं प्रश्न मांडत आहेत. प्रज्ञा दयो पवारांचं ‘खैरलांजी'वरचं नाटक, अरविंद जगतापांचं 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' आणि शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीम मोहल्ला' या राजकुमार तांगडेच्या नाटकाचं आपण या दृष्टीने स्वागत केलं पाहिजे. या कलाकृती आपल्या सामाजिक दस्तावेज आहेत, त्यतिल धगधगतं दलित अत्याचाराचं वास्तव संपून या कलाकृती कालबाह्य वे इतिहास जमा जितक्या लवकर होतील तितकं या लेखकांना समाधान वाटेल व त्यांच्या लेखणीचं सार्थक होईल! पण - पुन्हा तोच शायरे आझम साहिर लुधियानवीचा प्रश्न मला पडतो. 'वो सुबह कभी तो आयेगी?' त्यासाठी आमचा जात वास्तवाचा अंधार तरी आम्हास दाखवू द्या. बंडखोरीच्या काही मशाली खनातून पेटवू द्या व समाजाला व व्यवस्थेला दाखवू द्या, की हा अंधार अजूनही किती घनदाट- घनगर्द आहे व तो दूर करणारी पहाट किती दूर आहे ! हे करायच यासाठी की संघर्ष करायला अधिक बळ मिळावं!
 आता मी आणखी एका अस्वस्थ समाजघटकाबद्दल बोलणार आहे. भारताच्या लोकसंख्येचा अठरा टक्के असणा-या मुस्लीम समाजाच्या प्रश्नाकडे मला तुमचे लक्ष वेधू द्या. मी मूळचा मराठवाड्याचा आहे, त्यामुळे साहजिकच हिंदूमुस्लीम धर्मीयांच्या 'मिलीजुली', 'गंगा-जमनी' संस्कृतीचा पुरस्कर्ता आहे. भारताची धर्मावर आधारित झालेली फाळणी हे एक ऐतिहासिक वास्तव आहे, पण भारत ही आपली भूमी मानून इथं राहणा-या मुस्लिमांकडे आपल्या हिंदू समाजातील काही तथाकथित कट्टर लोक शंका व विद्वेषानं आजही का पाहत आहेत? सविधानानं त्यांनाही समान नागरिकत्व में सर्व मूलभूत अधिकार दिले आहेत, पुन्हा त्यांना आपली भाषा व संस्कृती व धर्म जपण्याचे पण अधिकार दिले आहेत. पण एका बाजूला त्यांचा मतासाठी अनुनय करणारे पक्ष तर दुसरीकडे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे - त्यांना प्रतिनिधित्व नाकारणारे पक्ष, या दोन्हींनी मुस्लिम समाजावर फार मोठा अन्याय केला आहे. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे त्यांना असुरक्षित केलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या 'आयडेंटिटी'चा प्रश्न जीवन मरणाचा बनला आहे. पुन्हा या समाजाला, जो हिंदू धर्मीयांशी गुण्यागोविंदाने नांदत आहे व बहुसंख्य हिंदू समाजही त्यांच्यासह शांततामय सहअस्तित्वानं राहत आहे, त्या समाजाला सौदी अरेबिया - पाकिस्तान - सिरिया व इराक आदी देशातून पैदा झालेल्या व ज्यानं अक्राळविक्राळ असं दहशतवादाच हिंस्ररूप 'सलाफी बहाबीझम' या बहुसंख्य इस्लामी धर्मगुरूंनाही पसंद नसलेल्या कट्टर तत्त्वज्ञानाची कास धरीत धारण केलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे संशयानं पाहिलं जात आहे. हेही मान्य केलं पाहिजे की, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून व ‘इस्लाम खतरे में है'ची आरोळी ठोकत काही कट्टर संस्था मुस्लीम तरुण वर्गास भडकवत आहेत, त्याला काही बेकार सुशिक्षित मुस्लीम तरुण बळी पडत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.पण त्यामुळे संपूर्ण समाजाकडे संशयानं पाहत त्यांना दुषणं देणं कितपत योग्य आहे? मागील काही काळात गोहत्या बंदीचं उल्लंघन केलं या संशयावरून किंवा घरी बीफ ठेवलं म्हणून काही मुस्लिमांना जमावानं सरेआम मारलं आहे, हे किती भयानक आहे? माणसानं माणसाला धर्म-पंथजातीवरून मारणं हे निषेधार्ह आहे. ती आपली भारतीय संस्कृती नाही. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात' असं ‘पसायदाना'मध्ये ज्ञानेश्वर माउलीनं ‘विश्वात्मक देवा'कडे प्रार्थना करीत प्रसाद मागितला होता. माणसाप्रमाणे प्राणिजात, अगदी किडा-मुंगीचंही अस्तित्व मान्य करणारा भारतीय समाज आहे. त्याची ही सहिष्णू प्रवृत्ती आहे, मग त्यातल्या मूठभर वर्ग का कट्टर होतो आहे? का माणसं मारण्याइतपत क्रूर-अंध होतो आहे?
 ही गुजराथची भूमी आहे, म्हणून मला या संदर्भात महात्मा गांधी काय म्हणाले होते, याची आठवण करून द्यावीशी वाटते. त्यांच्या विपुल लेखनातील काही विचारांचं 'इन्स्पायरिंग थॉट्स' हे मीरा जोहरीनी संकलित केलेल्या पुस्तकातील खालील विचारांकडे मला आपलं लक्ष वेधायचं आहे. ते म्हणतात,
 'Free India will be no Hindu raj. It will be Indian raj based not on the majority of any religious sect or community but on the representative of the whole people without distinction of religion'
 अर्थात ‘स्वतंत्र भारत हे हिंदू राष्ट्र असणार नाही. ते कुण्या बहुसंख्याक पंथ किंवा समाजाचं राज्य नसेल तर धर्माधारित भेदभाव न करता सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करणारं भारतीय राज्य असेल !'
 आपण गांधीजींना राष्ट्रपिता मानतो, आदर्श मानतो, तर मग त्यांचं सर्व धर्मांना समान लेखणारं व केवळ हिंदू बहुसंख्याक म्हणून त्यांचं हिंदू राज्य असावं हे अमान्य असणारे विचार लेटर अॅण्ड स्पिरिटमध्ये उतरविणं व तसं वागणं याची आज कधी नाही एवढी गरज आहे आणि त्यासाठी 'प्यार की राह दिखा दुनिया को, रोके जो नफरत की आँधी | तुझमें ही कोई होगा गौतम, तुझमें ही कोई होगा गांधी ।' या प्रसिद्ध गीताप्रमाणे आपणही थोडे गौतमबुद्ध होत प्रेम व करुणेची कास धरू या. थोडं गांधी होत हिंदू-मुस्लीम ऐक्य व सर्वधर्मसमभावाचं वागण्या-बोलण्यातून आपल्या पुरतं तरी आचरण करू या. एका प्रसिद्ध शायरनं भारतमातेचा एक डोळा हिंदू तर दुसरा मुसलमान अशी कल्पना केली आहे. मी ती कल्पना विस्तारत असं म्हणतो की, दोन्ही डोळ्यांतून एकच वस्तू एकसंघ दिसते, तसंच आपण सान्यांनी एका डोळ्याच्या हिंदू नजरेनं व दुस-या डोळ्याच्या मुस्लीम नजरेनं पाहत समोरचा माणूस एकच व पूर्ण पाहू या. तो फक्त माणूस आहे, मग नंतर तो हिंद-मुस्लीम आहे...आज जागतिक स्तरावर वहाबी इस्लामी कट्टरवाद्यांचं आव्हान उभं ठाकलं असताना भारतीयांनी आपल्याच मुस्लीम बांधवांना आरोपीच्या पिंज-यात उभे न करता ते याच भूमीत आपल्यासारखेच जन्मलले व मरणारे भारतीय आहेत, असे मनापासून मानू या. तसे वागू या व त्याना दिलासा देऊ या.
 पुन्हा येथे मला महात्मा गांधींचा आणखी एक विचार सांगू द्या. ते म्हणतात,
 'All Religion proceeds from the same God, but all are imperfect because they have come down to us through imperfect human instrumentality.'
 अर्थात 'सर्व धर्म एकाच ईश्वरापासून निर्माण झाले आहेत, पण ते सारे अपूर्ण आहेत. कारण ते अपुर्ण माणसामार्फत आले आहेत, त्यांचा आणखी एक विचार असा आहे,
 "Hindus, if they want unity among differents races must have the courage to trust minorities.'
 अर्थात जर हिंदूंना विविध वंशपंथांत एकता हवी असेल तर त्यांनी अल्पसंख्याकांवर विश्वास ठेवण्याचे धाडस केले पाहिजे.
 आज देशात धर्म व विश्वासाच्या संदर्भात जे उन्मादी वातावरण आहे, त्यावर गांधी विचार हा अक्सीर अशी रामबाण उपाय आहे.
 सयाजीराव गायकवाड हे १९३३ साली शिकागोमध्ये भरलेल्या दस-या विश्वधर्म परिषदेचे उद्घाटक होते. १८९३ मधली पहिली धर्म परिषद स्वामी विवेकानंद यांनी गाजवली होती. त्यांच्याप्रमाणेच महाराजांनी दुसन्या विश्वधर्म परिषदेत अत्यंत मूलगामी भाषण करून सर्वधर्मभावाचा प्रभावी पुरस्कार केला व परखड धर्म चिकित्साही केली. त्यांच्या भाषणातील काही विचार आजच्या उन्मादी व असहिष्णू वातावरणात आपणा सर्वांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. ते असे आहेत.
 ‘स्फूर्ती व ज्ञान प्राप्त होण्यासाठी माणसाला धर्माची गरज आहे, पण जर या कामी त्याला धर्मामुळे अडचण व्हायला नको असेल तर धर्माचीच पुनर्घटना झाली पाहिजे. आधुनिक लोकांना धर्म सुबोध होईल असा करणे व त्यात जे पोकळ अवडंबर माजले आहे, हेही नाहीसे करून तो आदरणीय वाटेल असा करणे आवश्यक नाही का? जगातील सर्व मोठ्या धार्मिक चळवळीचा प्रारंभ धर्माच्या अशा मूल्यपरिवर्तनानेच व धर्माला सर्वसुलभ करण्यानेच होत असतो. गौतमबुद्धाने आपल्या वेळच्या ब्राह्मणधर्मात जे परिवर्तन घडवून आणले ते त्या धर्माच्या सर्वसुलभ अंगावर भर देऊन व धर्मचर्चेसाठी प्राकृत लोकांची भाषा वापरूनच घडवून आणले. आजही धर्मातीत किती तरी व्याख्या बदलून नव्याने करण्याची वेळ आली आहे.'
 ‘प्रत्येक धर्माने आपल्यात इष्ट ती सुधारणा करावी व राष्ट्राचे बरे करण्यासाठी प्रत्येक धर्माने आपल्या भांडारातल्या जुन्या इलमा बाहेर काढाव्या.'
 ‘अज्ञान, स्वार्थ व जडवाद या मानव जातीच्या शत्रूशी झगडण्यासाठी आपण सौजन्याने व बंधुभावाने एकी करू या. धर्माची स्वरूपे भिन्न-भिन्न दिसत असली तरी धर्म ही वस्तू तत्त्वत: एकच आहे.'
 महाराजांचे हे विचार आज भारतातील धर्माच्या संदर्भात दोन समाजात जी दरी वाढताना दिसते, त्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक आहेत. त्याचे पालन गुजराथने व देशानेही करायला हवे.
 मित्रहो, मी विस्तृतपणे आजच्या परिस्थितीचे चित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामागे एक साहित्यिक म्हणून माझा काही एक उद्देश आहे. एक विचारवंतानं ‘कवी हा प्रेषित असतो' असं म्हणलं आहे. त्या अर्थाने लेखक-कलावंत हे। समाजासाठी मार्गदर्शक असतात. ते समाजपुरुषापुढे लेखनातून आरसा धरतात व त्याच्या चेहरयावर चढलेली व मनात घर करून असलेली काजळी व विद्रुपताकुरूपता दाखवतात व सांगतात की, ती कमी करीत आपला मूळचा मानवी चेहरा व सुंदर नैतिकता असलेलं विवेकी मन अधिक सुंदर - अधिक उजळ केलं पाहिजे. भारतीय संस्कृतीचं सार तीन शब्दांत सांगायचं झालं तर, ते ‘सत्य - शिव - सुदर असं सांगता येईल. सत्य कठोर असलं तरी, ते शिव म्हणजे अंतिमत: मंगलमय लोककल्याणी असतं म्हणूनच ते सुंदर असतं आणि म्हणूनच जीवनातील विषमता व द्वेषरूपी कुरूपता नष्ट करून ते सुंदर व शिव करणं हेच साहित्याचं नैतिक व सामाजिक प्रयोजन असतं. ते करण्याचा मी माझ्या कुवतीने आजवर केला आहे, व पुढेही करीत राहीन. त्यामुळे मला जो थोडा फार नैतिक अधिकार प्राप्त झाला असेल तर, तो वापरून मी माझ्या सहप्रवासी साहित्यिक - कलावंतांना समाजातली