शून्य मनाचा घुमट
Jump to navigation
Jump to search
शून्य मनाच्या घुमटांत
कसलें तरि घुमतें गीत;
अर्थ कळेना कसलाही,
विश्रांती परि त्या नाहीं;
वारा वाही,
निर्झर गाई,
मर्मर होई.
परि त्याचे भीषण भूत
घोंघावत फिरतें येथ.
दिव्यरूपिणी सृष्टी जरी
भीषण रूपा एथ धरी;
जग सगळे भीषण होतें
नांदाया मग ये येथें;
न कळे असला,
घुमट बनविला,
कुणीं कशाला?--
![]() |
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. | ![]() |
