रूप पालटू शिक्षणाचे/साखरशाळा प्रकल्पात विद्याथ्र्यांचा सहभाग

विकिस्रोत कडून
साखरशाळा प्रकल्पात विद्यार्थ्यांचा सहभाग

 'रूप पालटू देशाचे' या विचाराने कटिबद्ध झालेल्या ज्ञान प्रबोधिनीतील शिक्षणाची सुरुवात बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाने झाली. गेली अनेक वर्षे विविध प्रकारचे प्रयोग ह्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केले जात आहेत. अर्थात हे सर्व प्रयोग तेवढ्याच गटापर्यंत मर्यादित न ठेवता समाजाच्या विविध स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
 १९९० च्या सुमारास पडसरे येथील आदिवासी मुला-मुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या १०० दिवसांची शाळा' या उपक्रमामध्ये प्रबोधिनीचा सहभाग सुरू झाला. शाळेपासून दूर असणाऱ्या, शिक्षण ही दुर्मिळ गोष्ट वाटणाऱ्या गटासाठी सुरू झालेला हा उपक्रम, ही कल्पना मात्र आता प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी एक ताकदवान प्रयोग म्हणून रुजली आहे.
 दुर्गम आदिवासी भागातील या उत्साहवर्धक अनुभवानंतर १९९२ साली ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी ज्ञान प्रबोधिनीने साखरशाळा सुरू केली.
 महाराष्ट्राच्या समृद्धीचे एक कारण सहकार चळवळीतून उभे राहिलेले साखर कारखाने ! पण या भौतिक शोषणामागचा घटक, ऊसतोडणी कामगार मात्र कायम दुर्लक्षित राहिला आहे. वर्षातील सात-आठ महिने स्वत:चे गाव सोडून महाराष्ट्र रातील व सीमेवरील विविध साखर कारखान्यांच्या परिसरात हे लोक मजुरीसाठी जातात. या कामावरच त्यांचे पोट अवलंबून असते. अर्थात सर्व कुटुंबाचेच हे स्थलांतर असते. ऊसाच्या पाचटातूनच त्यांनी आपली खोपटी उभारलेली असतात. घरातील सर्वांनाच या कामात हातभार लावावा लागतो. अर्थात हे कामही तसे कौशल्याचे. पण मजुरी मिळते ती दिवसाला ४०-५० रुपये. शिवाय मुकादमांकडून आधीच घेतलेल्या उचलीची परतफेड करण्यात ते संपून जातात. शिक्षण नाही. हिशेबाचे ज्ञान नाही, अशा परिस्थितीत वर्षानुवर्षे ही भटकंती सुरूच राहते.
 कुटुंबाबरोबरच अर्थात मुलांचेही स्थलांतर होते. १०-१२ वर्षांहून मोठी मुले- मुली, आई-बापाबरोबर ऊसतोडणीला जातात. पहाटेपासून रात्रीपर्यंत ही ऊस तोडणी-बांधणी-कारखान्यात पोचवणी चालते. अशा वेळी लहान मुले कोप्यांमधूनच असतात. बिनदाराच्या कोपीची राखण करणे, गुरे सांभाळणे, लहान भावंडांची काळजी घेणे, पाणी भरून ठेवणे आणि अन्य वेळात भटकणे हा या छोट्यांचा दिनक्रम. क्वचित प्रसंगी गावातील बाजारात पाणी विकण्याचे किंवा गावात

रूप पालटू शिक्षणाचे(५१)

गोवऱ्या, वाढे विकण्याचे कामही ही मुले करतात. हातात थोडा का होईना पैसा

खेळायला लागतो. भोवतालच्या वातावरणातून कुसंस्कार होण्याचीच शक्यता जास्त ! गावाकडे शिकलेली शाळा काही दिवसांतच विसरली जाते. गावी चौथी-पाचवीत नाव असूनही या मुलांना लिहिता-वाचतासुद्धा येत नसते. पत्ते, जुगार खेळणे, विड्या ओढणे या सवयी लागतात. एक निरक्षर आणि हताश, हतबल ऊसतोडणी कामगार या चक्रामधून घडत असतो.
समस्येची व्याप्ती
 गेली चाळीस वर्षे हे चक्र चालू आहे. लहानपणी आईबापाबरोबर बोट धरून आल्याच्या आठवणी अनेक प्रौढ कामगार सांगतात. महाराष्ट्रातील सुमारे १२५ कारखान्यांमधून सरासरी प्रत्येकी पाच हजार कुटुंबे धरली तरी सुमारे सहा लाख कुटुंबांचे म्हणजे कमीत कमी तीस लाख माणसांचे हे स्थलांतर आहे. एकूण स्थलांतरित लोकांपैकी पन्नास टक्के कामगार बीड जिल्ह्यातील आहेत. शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे तीन लाख इतकी आहे.
प्रबोधिनीची भूमिका
 एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी एकीकडे शिक्षणापासून वंचित होत आहेत आणि एकीकडे शिक्षणातील विविध प्रयोग केले जात आहेत. ज्ञान प्रबोधिनीत केले जाणारे शिक्षणविषयक प्रयोग समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रमांतून नेहमीच प्रयत्न केले जातात. शिवाय राष्ट्रीय एकात्मता हा प्रबोधिनीच्या कामाचा महत्त्वाचा विषय असल्याने साहजिकच वंचितांसाठी काम हा प्राधान्याने करत असणाऱ्या कामातील एक भाग.
साखरशाळा उद्दिष्ट व कार्यपद्धती
 १०० दिवस चालणारी अन् साखर कारखान्याच्या परिसरातली ही साखरशाळा प्रामुख्याने बालवाडी ते पाचवी-सातवीपर्यंत चालू असते. वयोगटापेक्षा कोणाला काय येते याची चाचणी घेऊन त्यांची इयत्ता ठरवली जाते. प्रत्येक वेळी ती त्यांना सांगणे अडचणीचे जाते. (दहा वर्षांच्या मुलाला/मुलीला तू पहिलीत आहेस हे सांगितलेले आवडत नाही.) म्हणून निर्वर्ग पद्धतीने त्यांना शाळेत शिकविणे चालू केले जाते.
 साखरशाळेच्या कामाची काही उद्दिष्टे ठरविण्यात आली आहेत. साखरशाळेच्या




(५२) रूप पालटू शिक्षणाचे
विद्यार्थ्यांसाठी वाचन, लेखन, अंकगणित, आरोग्य, स्वच्छता, व्यायाम तर प्रेरक,

प्रबोधक आणि शिक्षक या गटासाठी संस्कार, करमणूक व एकात्मता असा विचार करून त्याप्रमाणे नियोजन व कार्यवाही केली जाते.
 हे विद्यार्थी साखरशाळेत चारच महिने असतात. त्यामुळे शासनमान्य शाळेतील अभ्यासक्रमच त्यांना शिकवावा लागतो. पण अभ्यासेतर अनेक गोष्टींतूनही विद्यार्थी सतत काहीतरी शिकत असतात. प्रकल्प, सहाध्यायदिन, साहस सहली इ. चे नियोजन त्यांच्या वेळापत्रकातच केले जाते. परिसर अभ्यास त्यांना परिसरात फिरूनच शिकविला जातो. शिवाय वक्तृत्व, कथाकथन, नाट्य हे धाडस, आत्मविश्वास मिळवून देणाऱ्या अभिव्यक्तीच्या प्रकारांचे त्यांच्या परिपाठाच्या वेळीच नियोजन केलेले असते. अगदी बालवाडीपासूनचे विद्यार्थी यात सहभागी होत असतात.
शिक्षक रचना
 ह्या सर्व गोष्टी यशस्वीपणे होण्यासाठी, उत्तम होण्यासाठी प्रयत्न करणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शिक्षक. साखरशाळेतील शिक्षक हे स्थानिकच निवडले जातात. ग्रामीण पार्श्वभूमी असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मिसळायला कुठलीही अडचण येत नाही. हे अध्यापक शिक्षणशास्त्रातले पदवीधर नाहीत. आठवी ते पदवीधर असणाऱ्या या शिक्षकांना प्रबोधिनीत प्रशिक्षित केले जाते. विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाबरोबर, अध्यापन प्रक्रिया, अध्यापन कौशल्ये, मानसशास्त्र या विषयांचा समावेश असतो. बहुतेक शाळा एकशिक्षकी असल्यामुळे बहुवर्गीय व बहुश्रेणी अध्यापन करावे लागते. अशा वेळी अध्ययन व मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांना आणखी काही व्यक्तींची आवश्यकता भासते. शिक्षकांच्या मदतीसाठी प्रबोधिनीतून प्रेरक म्हणून महाविद्यालयीन गटातील युवक-युवतींना व इयत्ता आठवी-नववीतील विद्यार्थ्यांना प्रबोधक म्हणून पाठविले जाते.
प्रशालेतील विद्यार्थ्यांचा सहभाग
 १०० दिवसांच्या शाळेतही मुलांवरील वेगवेगळ्या संस्कारांचे कार्य दिवसभराच्या कार्यक्रमातून होत असते. मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक यांच्या बरोबरीने 'प्रेरक आणि प्रबोधक' संस्कार रुजविण्याचे कार्य करत असतात.
 मुलांच्या मानसशास्त्राचा विचार केल्यास शिक्षकांच्या शिकवण्याबरोबरच त्यांना एखाद्या मार्गदर्शकाची व त्यापेक्षा अधिक मित्राची आवश्यकता असते. ही गरज प्रबोधक भरून काढतात.

रूप पालटू शिक्षणाचे(५३)

 सध्या या साखरशाळा महाराष्ट्रात थेऊर, राहुरी, इचलकरंजी व सोलापूर येथील

कारखान्यांच्या परिसरात चालविल्या जातात. त्यांपैकी थेऊर परिसरात सर्वात जास्त म्हणजे १५ शाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये शिक्षकांबरोबर प्रबोधक म्हणून ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतील इ. आठवी, नववीचे विद्यार्थी गटागटाने जात असतात. विद्यार्थ्यांचे ४-४ चे गट केले जातात. प्रत्येक आठवड्याला २ गट एका पाठोपाठ एक पुण्यापासून २५ ते ३० कि.मी. अंतरावरील साखरशाळांमध्ये शिकविण्यासाठी जातात. सोमवारी सकाळी एक गट जातो तो गुरुवारी संध्याकाळी परत येतो तर दुसरा गट गुरुवारी सकाळी निघून शनिवारी रात्री परत येतो. गरजेप्रमाणे हा गट रविवारीही तिथे राहतो.
 शाळेचा दिनक्रम व प्रेरक-प्रबोधकांची जबाबदारी यांचा एकमेकांशी योग्य समन्वय ठेवून नियोजन केले जाते.

दिनक्रम प्रबोधकांची जबाबदारी
स. ७ ते ७.४५ प्रात:स्मरण, ६वा. उठून आवरणे, वस्तीवर

उपासना,व्यायाम विद्यार्थी गोळा करून उपासना, सूर्यनमस्कार व चेतना व्यायाम शिकवणे.

७.४५ ते ९.०० आंघोळ, परिसर ज्ञान जवळच्या टाकी वा नळकोंडाळ्यावर

मुलांना आंघोळ घालणे. (आठवड्यातून एकदा डेटॉलने) नंतर परिसरात फिरून माहिती देणे.

९.०० ते १०.०० न्याहरी व आवरणे
१०.०० ते १०.३० मुले गोळा करणे वस्तीत फिरून शाळेत

न आलेल्या मुलांना समजावून शाळेत आणणे.

१०.३० ते ११.३० परिपाठ-प्रार्थना मुलांनी शिस्तीने, शांततेने

वागावे यासाठी मदत करणे व स्वत:ही तसे वागणे.



(५४)रूप पालटू शिक्षणाचे

११.३० ते १.३० शाळा सत्र १ (भाषा-गणित) भाषाविकासासाठी खेळ घेणे, अंकज्ञान वाढवण्यासाठी साहित्याद्वारे अध्ययन मागे पडणाऱ्या मुलांना मदत करणे.
दु.१.३० ते २.३० भोजन सुट्टी
२.३० ते ३.३० शाळा सत्र २ विज्ञान-अवांतर प्रयोग साहित्य वापरून प्रयोग करून दाखवणे.
३.३० ते ४.३० पद्य, गोष्टी, कोडी, हस्तकला, चित्रकला अन्य विषयांची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे व सोपे करून शिकवणे
४.३० ते ५.३० क्रीडादल ठरवलेला क्रीडाप्रकार शिकवणे, कवायत प्रकार घेणे.
सायं. ५.३० ते ६.००   मोकळीक
६.०० ते ७.०० पालक संपर्क त्यांच्या आयुष्याबद्दल माहिती घेणे, त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवणे. आरोग्य-आहार यांबाबत चर्चा, प्रौढ साक्षरतेसाठी प्रोत्साहित करणे.
७.०० ते ७.३० मोकळीक
७.३० ते ८.३० अभ्यासिका मागे पडणाऱ्या मुलांवर लक्ष देऊन तयारी करवून घेणे.
८.३० ते ९.३० भोजन
९.३० ते १०.०० बैठक निवासी मुख्याध्यापकांना दिवसभरातील घडामोडी, काम,निरीक्षणे, अनुभव यांविषयी सांगणे. दुसऱ्या दिवशीचे नियोजन करणे.

 विद्यार्थ्यांच्या दिवसभरातील कामांमध्ये प्रेरक-प्रबोधकांना स्वतः शिकलेल्या
गोष्टींचे योग्य प्रकारे उपयोजन करावे लागते. त्यांचे गाणी, गोष्टी, नाट्य, हस्तकला,

रूप पालटू शिक्षणाचे(५५)
चित्रकला, खेळ व अभ्यासविषय या सर्वच गोष्टींतील पूर्वज्ञान लक्षात घेऊन त्यांना

योग्य ते प्रशिक्षण दिले जाते, त्यांची तयारी करून घेतली जाते. प्रबोधिनीत प्रबोधकांनी प्रकल्प, सहाध्यायदिन, स्वाध्याय कौशल्ये, गटकार्य इ. अनुभव घेतलेले असतात. हे सर्व अनुभव साखरशाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरक- प्रबोधकांना प्रशिक्षण दिले जाते. वरील सर्व विषयांपैकी जे त्यांना ज्ञात आहेत त्यांचा सराव घेणे, माहीत नसलेल्या विषयांबद्दल प्रशिक्षण देणे इ. चा समावेश असतो.
 अर्थात प्रशिक्षणाबरोबर प्रबोधकांना पूर्वतयारीही करावी लागते. शालेय विषय तर ते समजून घेतातच, शिवाय गाणी, गोष्टी गोळा करणे, वर्गातील जाऊन आलेल्या गटाशी चर्चा करणे इ. ही ते करत असतात. शिवाय विद्यार्थ्यांशी बोलताना, शिकवताना स्वत:चे संभाषण कौशल्य वापरत असतात.
 मुलांना आंघोळी घालताना, वेणीफणी करताना, औषधपाणी करताना, संध्याकाळी खेळताना, कधी भटकायच्या कार्यक्रमात ते मुलांना बोलते करत असतात. त्यांची करमणूक होत आहे याचे भान ठेवून वेगवेगळ्या गोष्टी सुचवतात, माहिती देतात, मुलांमध्ये स्वच्छतेच्या संस्कारापासून राष्ट्रभक्ती, स्वाभिमान, समता, बंधुभाव, चांगल्या वाईटाची समज, कृतीप्रवणता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यातील कल्पनाशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करतात. मुलांची व प्रबोधकांची यातून भावनिक जवळीक साधली जाते. सतत एकत्र राहून, एकाच प्रकारच्या संस्कारांचे ग्रहण करत असताना, सामाजिक एकात्मतेचाही धागा बळकट केला जातो. प्रबोधक व मुलांचा सततचा संपर्क हा शाळेतील यशाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रबोधकांचे मित्रत्व, त्यांचे संपर्क सातत्य आणि निश्चित संस्कार या तीन गोष्टींचे मुलांच्या विकासातील स्थान, पडसरे व साखरशाळा या दोन्ही प्रयोगांतून निश्चित झाले आहे.
हेतू व कार्यपद्धती
 १०० दिवसांच्या शाळेतील मुलांबरोबरच प्रबोधकांच्याही वैयक्तिक विकासासाठी हा सहभाग अत्यंत आवश्यक वाटतो. मुलांच्या शैक्षणिक, मानसिक, शारीरिक वाढीमध्ये प्रबोधकांचा जसा फार महत्त्वाचा वाटा असतो तसाच प्रबोधकांच्या सामाजिक जाणीवा वाढण्यासाठी, त्याचे भान राहण्यासाठी या उपक्रमाचाही महत्त्वाचा वाटा आहे.
 प्रबोधिनीमध्ये समाजसेवा ह्या विषयांसाठी वेगळ्या तासिकांची सोय नाही, किंबहुना असे वेगळे तास असण्याची आवश्यकता वाटत नाही. विविध उपक्रमांमधील सहभागातून, ज्येष्ठांच्या संपर्कातून हा 'देशस्थितीचा अभ्यास' चालू असतो.

(५६)रूप पालटू शिक्षणाचे

 दिनक्रमातील प्रत्येक उपक्रमातील सहभाग हा प्रबोधकांच्या प्रशिक्षणाचा अन्

अनुभवाचा भाग असतो. प्रबोधिनीत आपल्यावर होणारे संस्कार इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी जी धडपड करावी लागते ती बरेच काही शिकवून जाते.
 १) गटाचे नेतृत्व करणे- आपल्यापेक्षा छोट्या वयाच्या, इयत्तेच्या मुलांना गोळा करणे, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवणे, त्यांच्याकडून करवून घेणे आणि हे करताना मित्रत्वाचे नातेही ठेवणे ही महत्त्वाची गोष्ट प्रबोधक शिकत असतात. संयतपणे वागत गटाचे नेतृत्व करणे यातून नकळत घडत जाते.
 २) निरीक्षण- रोज संध्याकाळी निवासी मुख्याध्यापक, प्रेरक व प्रबोधकांची रात्री एकत्र बैठक असते. दिवसभराच्या एकंदर कामाचा आढावा या बैठकीत घेतला जातो, दुसऱ्या दिवशीचे नियोजनही केले जाते.
 या आढावा व नियोजनासाठी विद्यार्थ्यांची वैयक्तिक निरीक्षणे ठेवणे, त्या निरीक्षणांची लेखी नोंद ठेवणे, त्यावर चर्चा करून दुसऱ्या दिवशी उपाययोजना करणे इ. गोष्टी प्रबोधकांना कराव्या लागतात.
 ३) नियोजन - आपण करणार असलेल्या कामांची माहिती घेणे, पूर्ववाचन करणे, त्या तीन दिवसांमध्ये ते काम पार पाडणे प्रबोधकांना करावे लागते. यासाठी नियोजन असणे गरजेचे असते. हे नियोजन करणे प्रबोधक शिकतात.
परिस्थिती / वातावरण
 आपले बहुतेक सर्व प्रबोधक मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय गटातील असतात. त्यामुळे देशातील अन्य लोकांची परिस्थिती कशी असते हे अनुभवणे खूप महत्त्वाचे असते. गरिबी कशी असते, लोक झोपड्यांमध्ये कसे राहतात, त्यांचे जेवण कसे असते, दिवसभर पालक घरी नसताना मुले कशी राहतात, घरातील सर्व कामे ही छोटी मुले कशी करतात, त्यांच्या आसपासचे वातावरण, त्यांच्यावर होणारे संस्कार हे सगळे प्रत्यक्षात पाहून, अनुभवून, एक वेगळेच विश्व त्यांच्या डोळ्यापुढे येते.
 अभ्यासिकेनंतर संध्याकाळी मुख्याध्यापक जेव्हा पालक संपर्कासाठी जातात तेव्हा प्रबोधकही त्यांच्या बरोबर असतात. पालकांशी गप्पा, विद्यार्थ्यांबरोबर गप्पा यांतून या लोकांच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचे वास्तव भान येते. आपली आर्थिक परिस्थिती,उपलब्ध साधने, सोयी-सुविधा, वातावरण या सर्वांची नकळत तुलना सुरू होते.
 साखरशाळेतील आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलांची कष्टाळू वृत्ती, जिद्द, कमी आर्थिक परिस्थितीतही समाधान मानण्याची वृत्ती प्रबोधकांना खूप काही शिकवून जाते.



रूप पालटू शिक्षणाचे(५७)

 प्रबोधकांची मनोगते

 "इथे येण्यापूर्वी का यायचे, काय करायचे माहीत नव्हते. शाळा खूप मोठी टुमदार असेल असे वाटले होते. शाळा व मुलांच्या झोपड्या पाहून धक्काच बसला.
 गरीबी म्हणजे काय ? हे जवळून न्याहाळता आले. आम्हांला एवढ्या छोट्या, दाटीवाटीच्या घरात राहायची सवय नसल्यामुळे आत गेल्यावर कसेतरीच वाटले. पण या लोकांची गायी-गुरे दाराशीच असतात. या लोकांनी पशुंनाही घरातीलच एक घटक मानले आहे.
 या लोकांनी आमचं खूप आदरातिथ्य केलं. त्यांचं दुसऱ्याला सुख देणारं मन पाहून श्रीमंतांच्या स्वार्थी व तुसड्या स्वभावाचा राग आला. ही मुलं गरीब असली तरी नाजूक मनाची, हळवी, कोवळी, निरागस व खेळकर आहेत."

-अभिजीत डोंगरे


 “आपल्या बोलण्याचा अर्थ त्यांना कळेल का ? काल लताने ॐ का घातला असे विचारले. उत्तर काय द्यायचे हे कळतच नव्हते. रूमवर आल्यावर ताईला विचारलं. ताईने व्यवस्थित समजून सांगितल्यावर कळले. सोप्या भाषेत कसं सांगता येईल ते लक्षात आलं.
 लहान मुलांना शिकवताना पेशन्सची गरज असते. आपले शिक्षक आपल्याला कसं शिकवत असतील ? वर्गात त्रास द्यायचं कमी करायला हवं."

- दीप्ती देवधर


 “अंकुश ज्या परिस्थितीत राहतो ते पाहून आपण खूपच आरामात राहतो, उगाच छोट्या गोष्टींसाठी रडतो असे वाटते."

- केतकी बारटक्के


 “या मुलांचा दिनक्रम पाहून धक्काच बसला. मोकळा वेळ माहीतच नाही. सारखे कामच असते. घर आवरणे, पाणी भरणे, मोठ्यांना मदत करणे. शिवाय लहान भावंडे कडेवर असतातच. पुस्तकापेक्षा परिस्थिती खूप काही शिकवते त्यांना. जबाबदारीची व्यवस्थित जाणीव त्यांना आहे."

- रश्मी काळे


निरीक्षणे व परिणाम
 प्रबोधकांच्या मनोगतांवरून त्यांच्या जाणिवा-अनुभव यांत भर पडते हे जरी खरे असले तरी उपक्रमात त्यांना अनेकदा अडचणींनाही सामोरे जावे लागते. कधी या अडचणी छोट्या असतात किंवा मोठ्याही. अर्थात त्याचे छोटे-मोठेपण हे आपल्या



(५८)रूप पालटू शिक्षणाचे
दृष्टीने. त्यांच्या दृष्टीने ती अडचण महत्त्वाचीच असते. उदा. - एखाद्या वेळी एखाद्या

मुलाला कित्येक तास समजावून सांगूनही समजून घ्यायचेच नसते अशा वेळी काय करायचे हेच समजत नाही. एखाद्या वेळी कित्येक मैल चालत शाळेत पोहोचल्यावर सगळी मुले ऊसाच्या फडावर गेलीत, शाळेत कुणीच नाही हे पाहून हताश व्हायला होते. कित्येकदा पालक संपर्काला गेल्यानंतर पालक दारू पिऊन आलेले असतात आणि रात्री कितीही समजावून सांगितले तरी पहाटे मुलांना कामाला घेऊन गेलेले असतात. शिवाय कित्येकदा प्रबोधकांचे वय लहान असल्याने पालक त्यांच्या बोलण्याला फारशी किंमतही देत नाहीत. पण एकूण उपक्रमाचे महत्त्व, देशप्रश्न म्हणून त्याचे स्थान, आपले त्यातील स्थान याची जाणीव प्रबोधकांशी वारंवार औपचारिक- अनौपचारिक बोलून करून द्यावी लागते. त्यांच्या चुका हळुवारपणे समजून घेणे, त्यात बदल सुचवताना मार्गदर्शक ह्या त्यांच्या भूमिकेला कुठेही धक्का न लावता त्यांना काही सुचविणे, त्यांच्या चांगल्या कल्पनांना योग्य वेळी दाद देणे - शाबासकीची, कौतुकाची थाप देणे असेही करावे लागते.
 अर्थात पुष्कळदा 'नव्याचे नऊ दिवस' असाही प्रकार आपल्याला अनुभवायला मिळत असतो. पण हा अनुभव जिवंत राहण्यासाठी त्यांच्यामधील संवेदनाशीलता आपणच जागी ठेवणे आवश्यक असते. डोळे उघडे ठेवून जगात वावरणे हे आपणच मुलांना शिकवावे लागते. प्रत्येक ठिकाणी ऊसतोडणी कामगारांची मुले व त्यांच्यासाठीचा साखरशाळेसारखाच उपक्रम असेल असे नाही. परिसरातील प्राथमिक शाळा, रिमांड होम, अनाथालय, बालकामगार, वीट भट्ट्या, रेल्वे स्टेशनवरील मुले, बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांची मुले यांच्यासाठीही काम करणे शक्य आहे. जे शिक्षणातून म्हणजे नेहमीच्या औपचारिक शिक्षणातून मिळत नाही अशा गोष्टींची जोड देता येणे शक्य असते. आपल्या विद्यार्थ्यांमधील अनेक गुणांची जाणीवही यामुळे आपल्याला होऊ शकते. या संदर्भातले एक-दोन अनुभव मला आठवतात की, जे या कामात सतत उत्साह तर देत राहतातच, शिवाय प्रबोधक नुसते जाऊन येतात व विसरतात असे होत नाही.
 १९९३-९४ चे साखरशाळेचे पहिले वर्ष. प्रबोधिनीतील इयत्ता आठवीतील चार विद्यार्थ्यांचा गट साखरशाळेत गेला होता. संध्याकाळी दलानंतर सर्वजण बाहेर बसले होते. बाजूलाच मुकादम कामगारांना पैसे वाटप करीत होता. कमी पैसे हातावर ठेवून जास्त पैशांवर सही घेणे चालू होते. एका विद्यार्थ्याने पुढे जाऊन ताबडतोब त्याला विरोध केला. मुकादमाने परिस्थिती लक्षात घेऊन पैसे व्यवस्थित द्यायला सुरुवात

रूप पालटू शिक्षणाचे(५९)

केली. कुणावर अन्याय होऊ नये म्हणून पुढे व्हायला हवे हे कधीतरी सांगितलेले

त्याने लक्षात तर ठेवलेच, पण आचरणातही आणले.
 दुसऱ्या एका मुलींच्या गटाचा अनुभव तर आणखी वेगळा. प्रबोधिनीत विद्यार्थी प्रकल्प पद्धतीने शिकतात. वेगवेगळ्या विषयांची निवड करून, वाचून, प्रत्यक्ष प्रयोग करून विद्यार्थी त्यातून काहीतरी सिद्धही करत असतात. साखरशाळेत जाऊन आल्यामुळे अशा प्रकारच्या कामांमध्ये आपणही सहभाग वाढवावा असे वाटल्याने विद्यार्थिनींनी जवळपास शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांची मुले दिवसभर तिथेच खेळताना दिसली. त्यांनी हाच प्रकल्पाचा विषय निवडला आणि रोज संध्याकाळी शाळा सुटल्यावर दोन तास या मुलांना शिकवायला सुरुवात केली.
 कुठल्याही शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते ती त्यातील सातत्याची साखळी जोडलेली राहणे. या अनुभवांतून हे सातत्य टिकून आहे हे लक्षात येते अन् कामाचा उत्साह द्विगुणित व्हायला लागतो.






(६०)रूप पालटू शिक्षणाचे