पान:Samagra Phule.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० महात्मा फुले : समग्र वाङ्मय शुद्र म्हणती तुम्हा हृदयीं बाण टोचले । आज बोधाया फावलें ॥ गाणे गाते ऐक बाळा तुझ्या आजोळी शिकले बोलीं नाहीं मन धालें ॥ । ॥ चाल॥ क्षेत्र क्षत्रियांचे घर, तुझे पितृ माहावीर । सुखा नसे त्यांच्या पार, आल्यागेल्याचे माहेर ।। शीखराकार डोंगर, नानावल्ली तरूवर ।। दरी खोरी वाहे नीर खळखळे निरंतर । झाडा फुलें झाला भार, सुंगधी वाहे लहर । पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ॥ नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार । भूमी अती काळसर, क्षेत्र देई पीका फार ॥ धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियास मार । दास केले निरंतर, ब्रम्हा झाला मनीं गार ॥ लोभी मेले येथे फार, विध्वा झाल्या घरोघर । उपाय नाहीं लाचार, स्त्रिया बंदी पाटावर ।। दुसरा झाला शिरजोर, परशा तोबा कठोर । मार त्याचा अनीवार, केला क्षत्रियां संव्हार । क्षत्रिय केले जरजर, भये कांपे थरथर । दुःखा नाही त्यांच्या पार, ठाव नाहीं निराधार ॥ बहु केले देशापार, बाकी राहि मांगमाहार । निःक्षेत्री झाल्यावर, म्लेंच्छ केले डोके वर ।। आले सिंधुनदीवर, स्वाऱ्या केल्या वारोंवार । गातें कटावांत सार, लक्ष देई अर्थावार ।।