पान:Samagra Phule.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तृतीय रत्न २७ विदूषक : असे असे, मार्गावर या साहेब; केवळ सुधारल्या ब्राह्मणांच्या मसलतीवर भरवंसा ठेवून त्यांच्या धोरणानेच चालू नका. बाईचा नवरा : आतां मीच तुम्हाला कसे म्हणून सांगू? पाद्री : सांगा तुम्हीच कां सांगा ना? कारण कोणी कोणाची अक्कल बाटली नाही. बाईचा नवरा : मला असे वाटते की सरकारी बोर्ड ऑफ इज्युकेशनच्या द्वारे, असा एक नेम करून टाकावा की दर खेडेगावांनी माळ्या कुणब्यांच्या वस्तीचा अनुमान करून, त्यांची मुले शाळेंत अमूक असावीत जर, कदाचित तितकी मुले गांवकरी भरती करून देणार नाहीत तर, एकदम तेथील शाळा मोडली जाईल. मग पाहू बरें! हे हेच ब्राह्मण लोक, आम्हा कुणव्या माळ्यास, मुले शाळेत पाठवावीत म्हणून उपदेश करू लागतील; शेवटी असे सुद्धा म्हणू लागतील की, अहो माळ्या कुणब्या हो, मागे जे शास्त्रांत लिहिले आहे की, शूद्रांनी लिहिणे शिकू नये ते सर्व खोटे आहे. विदूषक : साहेब असे न म्हणून काय करतील. कारण कुणबी माळी जर, आपल्या मुलांस विद्या शिकण्यास पाटवणार नाहीत तर त्यांच्या मुलाला (त्यांच्या मुलाकरिता) विद्या न मिळतां काही दिवसांनी माळ्या कुणब्यांच्या मुलांच्या पंक्तीत जाऊन बसावे लागेल, यालाच "बाप दाखीव नाहीतर पिंड पाड' असे म्हणतात. परंतु साहेव त्या सर्व कुणब्यांच्या बोलण्यावर सरकार लक्ष पुरवील काय ? पुरविल्यास पुढे फारच कुणब्यांचे बरे होईल असें मला पण वाटते. पाद्री : पाटील बुवा जर सर्व कुणब्या माळ्यांनी आपली मुलं घरी ठेवून घेतलीत. यावरून ती शाळा मोडली असेल नाही बरें ? बाईचा नवरा : मोडतील कशाने ? तेथे काही ब्राह्मणांची मुलें होती ती येत असत. विदूषक : असें कसे होईल! जातींच्या मुलाला गीडी गुलाबीने न शिकविता कोणी मारीत असतो काय? (तिकडे ब्राह्मणांनी आशीर्वाद म्हटल्यानंतर, त्यातून जोशाने हातात पळीसुद्धा पंचपात्री घेऊन, जोगाईच्या नवऱ्याच्या पाठीमागे उभा राहून, त्यास असे म्हणाला कारे बाबा घरी चालतोस ना?) पाद्री : अहो भटजी याला माझ्याबरोबर बोलू द्या. विदूषक : पण जोशाला हे काय ठावें की पाद्रीने एव्हढा वेळ श्रम करून कुणब्याला, राघूसारखा पढवून, उलटा जोशाचा पंतोजी होण्याजोगा तयार केला आहे. पाद्री : अरे बाबा आम्ही अज्ञानाचेच बरोबर बोलावयास आलो आहोत व आमच्या तारणायाची आज्ञा ही अशीच आहे.