पान:Samagra Phule.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११६ महात्मा फुले : समग्र वाङ्मय पोटाने गेली ॥ मरूं घातली ॥ भट्टा भेटिला बोलिवले ॥ अती गरीबी म्हणोन त्याजिले ।। बाई वारली ।। शेती पुरली ॥ गरुडपुराण कोठे लपलें। भट्टाने तोंड केलें का।। राणीबाई ।। लक्ष देई ॥ दुःख हे रडून गाईलें॥ द्विजांनी शुद्रा गांजिलें। शिकिव शुद्राला ॥ पंगु बंधुला ।। दास ब्रह्मयानें । मुळीं केलें ॥ ज्ञान देण्याचे बंद ठेवलें॥ किर्ती ऐकून ॥ आलों धावून । जगामधीं दास सोडविले ॥ धडे त्वां कैकाला दिले ॥ राव जोतिचे ॥ मार फुलांचे ॥ ओळखून शत्रू झोडिले ।। तगादे यम दारी बसले ॥ ५ ॥ ८ ब्राह्मण शुद्रास प्रतिवर्षी भाद्रपदमासी पक्षांत व वर्षातील साधारण सणावारांत व सूर्यचंद्राच्या ग्रहणकाळी कशा भुलथापी देऊन बुडवितो याविषयी ॥ अभंग। शेती दास केला सोडीना शुद्राला ।। कर बसविला वर्षासन ॥१॥ वसुलाचा थाट भाद्रपद मासी । सोडीना पुत्रासी जन्मभर ॥ ३ ॥ संक्रांती पाडवा भोके सर्व सणी।। लाज नाहीं मनीं वाटोळ्याच्या ॥३॥