पान:Samagra Phule.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ महात्मा फुले : समग्र वाङ्मय आपल्या पाठिस देणे उणे शिपायगिरीस । उपमा नाहीं हिजड्यास ॥ सर्व लोकांसहित मारिलें खानपुत्रास । परतला सिंहगडास ॥ डौलाने मोंगल भीती फिरवी तरवारीस । दावी भय शिवाजीस ॥ समीप येऊ दिले हुकूम सरबत्तीस । शत्रू पळाला भिऊन मारास ॥ करनाटकीं बदली धाडी शाइस्तेखानास । मुख्य केले माजमास ॥ राजापुरी जाई शिवाजी जमवी फौजेस । दावी भय पोर्चुगास ॥ सर्व तयारी केली निघाला नाशिक तीर्थास । हुल कसी दिली सर्वांस मध्यरात्री घेई बरोबर थोड्या स्वारांस । दाखल झाला सुर्तेस ॥ यथासांग साहा दिवस लुटी शहरास । सुखी मग गेला गडास ॥ बेदनूराहून पत्र आले देई वाचायास । आपण बसे ऐकायास ॥ शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस । लागले हरणापाठीस ॥ घोड्या ठेच लागे उभयतां आले जमीनीस । शाहाजी मुकला प्राणास॥