हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्
भिन्नधर्मी आणि भिन्न संस्कृतीच्या लोकांवर मिळवलेल्या राजकीय
वर्चस्वाचा अभिमान शहाणपणाच्या आवरणाखाली नेहमी दबून राहणे
कठीणच आहे. तो केव्हा आणि किती उसळी मारील ह्याचा नेम
नसतो !
राणा उदयसिंहाचा पराभव करून चितोड जिंकल्यावर अकबराने तेथे
केलेल्या कत्तलीमध्ये आणि हरएक वस्तूच्या व रजपूत कलाकौशल्याच्या
राक्षसी विध्वंसामध्ये हाच ताठा, निष्ठुरता व पाशवी शक्तीचा
दिमाख दिसून येतो. औरंगजेबाने तर ह्या बाबतींत कमाल मर्यादाच
गाठली ! असो.
होऊं लागलाही होता. एकराष्ट्रीयत्वाच्या उच्च भावनेने प्रेरित होऊन जर
मुसलमान राज्यकर्त्यांना सामान्य लोकांच्या भावनांची जोपासना केली
असती, तर किती ना
मी झाले असते ? 'रसखान' ह्या मुसलमान कवीचे
उद्द्वार पहा-
पत्थर हों तो वही गिरि को जु कियो व्रज छत्र इंद्र कारन ।
जो खग होउँ बसरो करौं वही कालिंदी कूल कदंव की डारन ॥
ह्या कवितेवरून कवीचे मनांत कालिंदी-यमुना नदीबद्दल तसेंच
गोवर्धन पर्वताबद्दल अतिशय प्रेम असले पाहिजे, हे उघड आहे. तर मग
आणखी थोडे पुढे गेल्यानंतर 'मातृभूमि' हीच भावना उत्पन्न होणार
नाही काय ?
कवि महंमद जायसी म्हणतो - हिंदूद्दी मुसलमानांप्रमाणेच देवाचे
पुत्र-कन्या होत. म्हणून त्यांच्या धर्माची निन्दा करूं नका; आदर
बाळगा.
तिन्ह संतति उपराजा भाँति भाँति कुलीन ।
हिंदू रक दुन भये अपने अपने दिन ||