धार्मिक आन्दोलन
(६७)
त्याने हिन्दु-मुसलमानांनी वैरभाव विसरून ईश्वराची भक्ति कोणत्याही
मार्गाने करावी, मुसलमानच कांही देवाचे लाडके नाहीत, इत्यादि
प्रकारचा उपदेश केला. परन्तु हें समतेचें तत्वज्ञान जेतेपणाचा अहंकार
असलेल्या दिल्लीच्या बादशहांना कसें रुचावें ? त्या वेळच्या सुलतानाने
कबीराच्या ह्या गुन्ह्याबद्दल त्याला कार्शीतून घालवून दिलें !
एकंदरीने विचार करतां कबीर, कमाल, सुलतान अली, रहीम, रस-
खान इत्यादि मुसलमान थोर पुरुषांचीं चरित्रे आणि त्यांचे ग्रंथ पाहिले,
तर मुसलमान-समाजावर बहुसंख्य हिन्दूंच्या प्राचीन व उच्च तत्वज्ञानाचा
परिणाम त्या वेळीं बराच झाला होता; असे म्हणण्याला हरकत नाही. एक
कवि म्हणतो-
दीने मुहम्मदीका बेबाक बेडा
न जेजोंमें ठेहेरा न कुलजम में अटका ॥
किये जिसने तै चलके सातो समुन्दर ।
वह डूवा दहानेमें गंगा के आखिर ॥२॥
( भावार्थ- जो इस्लामधर्मरूपी नौका-समूह निर्भयपणें स्पेनपासून
चीनपर्यंत वेगाने चालला होता, तो सरतेशेवटीं आर्यतत्वज्ञानाच्या प्रशांत
गंगाप्रवाहांत विश्राम पावला ! )