हिंदुस्थानचे हिंदु सम्राट्
(५३)
( १ ) सम्राट् तिसरा गोविंदराज
( राष्ट्रकूट )
( इ० स० ७९३ ते ८१४ )
सम्राट् हर्षवर्धनानंतर कनोज येथे लागोपाठ ' वर्म' (राज्यश्रीचे घराणे),
बंगालचे पाल आणि मारवाड किंवा लाट नामक प्रदेशांतील 'प्रतिहार '
अशा निरनिराळ्या वंशांतील राजांकडे राजसत्ता चालली होती. स्वतःच्या
प्रांतांत राज्य करून कनोज येथील सत्ताही आपल्या हातीं ठेवू पाहणाऱ्या
पाल-प्रतिहारांचा आणि मूळच्या ' वर्म' कुळांतील राजांना जिंकून दक्षिण-
तील 'राष्ट्रकूट' सम्राटांनी सर्वत्र आपलें अधिराज्य स्थापन केलें. उत्तर
हिंदच्या दिग्विजयाचे बाबतींत राष्ट्रकूटांनी आंध्र राजांची जणू पुनरावृत्तीच
केली !
राष्ट्रकूट हे प्रथमतः मुलकी प्रांताधिकारी व नंतर (दक्षिण गुजराथेंतील
चालुक्य साम्राज्याचे ) मांडलिक ह्या नात्याने वन्हाड प्रांतांत होते.
नंतर इ०स० ७५० च्या सुमारास चालुक्य राजे दुर्बल झाले असतां ते
स्वतंत्र राजे झाले. आणखी कांही काळाने ते महाराष्ट्रांत आले व त्यांनी
चालुक्यांचें राज्य जिंकलें.
- प्रस्तुत पुस्तकांतील बहुतेक सम्राटांच्या कारकिदीं त्यांच्या राज्या-
रोहणापासून मृत्यु होईपर्यंत दिल्या आहेत, हे वाचकांच्या ध्यानांत येईलच.