चक्रवर्ती बाप्पा रावळ.
(४९)
साधूच्या आशीर्वादाप्रमाणे नशीब काढण्याची संधि पुढे बाप्पा रावळ
शोधूं लागला. भिल्ल मित्रांना बरोबर घेऊन तो चितोडच्या राजदरबारीं
गेला. तेथील राजाने बाप्पाची तेजस्वी मुद्रा पाहून त्याला व त्या भिल्लांना
सैन्यांत नोकरी दिली व कांही दिवस लोटल्यावर बाप्पाचें प्रत्यक्ष कर्तृत्व
पाहून त्याला सेनापति नेमलें. लौकरच बाप्पाच्या परीक्षेची वेळ प्राप्त
'झाली ! सिंधच्या अरबांचें सैन्य चितोडनजीक येऊन ठेपलें. स्वतः राजा
शूर, पण वृद्ध झालेला. सिंधकडील मजकूर लक्ष्यांत घेऊन मेवाडची दुर्दशा
होऊं नये, म्हणून शरण जाण्याचा सल्ला बहुतेक जुन्या सरदारांनी दिला
होता; परन्तु बाप्पाने त्या वृद्ध परन्तु मानी राजाचे मनांतील भाव ओळ-,
खून आपले प्राण पणास लावून युद्ध करण्याचे निश्चित केलें ! वीर
रजपुतांनी व शूर भिल्लांनीही आपल्या तरुण सेनापतीच्या आज्ञेप्रमाणे
तयारी केली.
शेवटीं चितोडगडाचे पायथ्याशीं बाप्पाने अरब शत्रूंबरोबर तुमुल युद्ध
करून विजय मिळविला आणि सिंधू नदीपर्यंत त्यांचा पाठलाग केला !
एवढ्यानेहि बाप्पाचा क्रोध शांत झाला नाही. महंमद कासीम याने सिंध-
मध्ये ठेवून दिलेल्या 'सेलीम' नांवाच्या सुभेदाराचा पाडाव करून त्याचे
जागीं आपल्या तर्फेचा नवीन सुभेदार नेमला आणि त्या 'सेलीम' च्या
मुलाशीं लग्न लावून मोठ्या हर्षाने तो चितोडकडे परतला ! अरबांवर
मिळविलेल्या ह्या मोठ्या विजयामुळे बाप्पाची चोहोंकढे कीर्ति झाली.
राजाराणीने त्याचें आनन्दाने स्वागत केले व त्यानंतर लौकरच भाग्यशाली
बाप्पाला मेवाडचें राज्य (इ० स० ७३०) प्राप्त झालें.
मराठी इतिहासकार त्याला 'बाप्पा रावळ' असें म्हणतात. वास्तविक
'रावळ' किंवा 'सामन्त' ह्यांपेक्षा त्याची योग्यता फारच मोठी होती.
चक्रवर्ती व सार्वभौम हे तर त्याचे किताब होतेच. खेरीज 'हिंदुसूर्य' हें
सन्मानदर्शक पद धारण करून तो मेवाडच्या सिंहासनावर बसला होता !
४