पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २८ )

लोकांनी हे बेट इंग्लिशांस दिलें होतें. पुढें १६९६ सालीं बंगालच्या नवाबापासून गंगा नदीच्या मुखाजवळ कलकत्ता येथें एक नवी वसाहत कंपनीनें भाड्याने घेतली. मद्रास, मुंबई व कलकत्ता ह्या तीन वसाहती हिंदुस्थानांतील ब्रिटि- श अमलाचीं हल्लींचीं मुख्य स्थाने आहेत. इंग्लिश कंप- नी ह्याप्रमाणें वसाहती करीत असतां पोर्तुगीज, दच व फ्रेंच हेहि वसाहती करीत होते.
 १८ व्या शतकाच्या आरंभी हिंदुस्थान ज्या बेबंद पातशाहीच्या स्थितीत पडलें होतें, ती स्थ व्यापारास धोक्याची होती, हें उघड आहे. ह्या वेळेपर्यंत युरोपियन व्यापाऱ्यांनीं आपलें तनमनधन केवळ हिंदुस्थान जिंकण्याची व्यापाराला अर्पिलें होतें, व ह्या फ्रेंचांची योजना, देशांतील नेटिव्ह लोकांची आपाप- सांत जीं भांडणें चालत असत, त्यांमध्ये ते अगढ़ी मन घालीत नसत. त्यांच्यापाशीं फौजफांटा कांहीं नव्हता; व आपणांस कोणाकडून त्रास पोहोंचूं नये, इतकीच काय ती त्यांची इच्छा असे. परंतु पुढे हा प्रकार बदलला. त्या काळी फ्रेंच व इंग्लिश हे वसाहतींसाठी झगडत होते. ह्यामुळे त्या वेळच्या त्या अव्यवस्थित स्थितींत, इंग्लिश व्यापाऱ्यांचा नायनाट करून स्वदेशासाठी हिंदुस्थानांत सार्वभौम सत्ता संपादण्याची अमोलिक संधी आप- णांस आपोआप आली आहे, असें हिंदुस्थानांतील फ्रेंच लोकांच्या मनांत आलें, व ही गोष्ट साहजिकच आहे.