पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २७ )

इस्त इंदिया कंपनी ही एक कंपनी होती. हीमध्यें ईस्त इंदिया अनेक भागीदार होते; व कामाच्या व्यवस्थे- कंपनी. करितां ते आपल्यांतीलच कांहींजणांस निव- डीत असत; त्यांना दायरेक्टर्स म्हणत असत. एलिझाबेथ राणीच्या मरणापूर्वी थोडेच दिवस म्हणजे इ. स. १६०० ही कंपनी स्थापित झाली होती; व इंग्लिश सरकाराकडून हिला व्यापार करण्याविषयीं सनद मिळाली होती.
 ठिकाणे. ह्या कंपनीनें प्रथमतः इ. स. १६११त सुरत येथें वखार घातली. नंतर १६३९त मद्रास येथें दुसरी कंपनीचीं आरंभीं चीं वखार घातली. हीं दोन्ही ठिकाणें दक्षिण हिंदुस्थानांत असून पहिलें पश्चिम किनाऱ्यावर व दुसरें पूर्व किनान्यावर आहे. ज्या जमिनीवर त्यांनीं आपल्या वखारी वांधिल्या होत्या ती जमीन त्या त्या ठिकाणच्या मुख्य अधिकाऱ्यांपासून त्यांनी भाड्याने घेतली होती. एखाद्या जर्मन मनुष्यास *लीडस येथें एखादा कारखाना स्थापावयाचा झाला, तर ज्याप्रमाणें कोणा तरी जमिनदारापासून आपल्याला घरें वगैरे तो भाड्यानें घेतो, त्याचप्रमाणे कंपनीनें हिंदु- स्थानांत केलें. कंपनीचें तिसरें ठिकाण मुंबई बेट होय.. स्पेन देशांतील लोकांशी लढण्यासाठी पोर्तुगीज लोकांना इंग्लिशांनीं जी मदत केली, तिच्यामोबदला पोर्तुगीज,

  • हें शहर इंग्लंदांत यांर्कशायरमध्यें एर नदीच्या कांठी असून लोकरीच्या कारखान्याकरितां प्रसिद्ध आहे.