पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८४)


व्यापाराच्या वृद्धीचें वर दाखविलेले प्रमाण नक्की नसून वास्तविक प्रमाण पुष्कळ अधिक असले पाहिजे, ही गोष्टहि आपण लक्षांत आणिली पाहिजे. " सरासरीनें हिंदुस्थानांतील रेलवेपासून शेकडा ५ टक्के व्याज सुटतें; व पाटबंधाऱ्यांच्या कामांपासून सुमारें शेकडा ६ टक्के सुटतें. " तसेंच, जेव्हां ही पाटबंधाऱ्यांची रीति अधिक पूर्णतेस येईल, तेव्हां हल्लींहूनहि जास्त नफा खचित होईल. हल्लीं देखील वायव्येकडील प्रांतांत पाटबंधाऱ्यां पासून शेंकडा ८ टक्के व्याज सुटत आहे. तसेंच इ. स. १८७८/७९ च्या दुष्काळामध्ये १५/१६ कोटि रुपयांचीं धान्यें पाटबंधाऱ्यांमुळे बचावली गेली. ह्या पाटबंधाऱ्यांस एकंदर जो खर्च आला, तो सर्व ह्या एका वर्षांत भरून आला, इतका मोठा फायदा त्या वेळीं झाला. " (एच्. एस्. कनिंग्हॉम ह्यांचें पुस्तक, पृष्ठ ३७ )

 गहूं व कापूस हे जिन्नस बाहेर पाठविण्याचा व्यापार उत्तरोत्तर वाढत आहे; व पुढेंहि वाढतच जाणार. हल्लीं ज्या मार्गानें इंग्लिशांचे दीर्घ प्रयत्न सुरू आहेत, त्याच मार्गाने पुढे जसजसे ते सुरू राहतील, तसतसा त्यांनी तयार केलेल्या जिनसांचा खप हिंदुस्थानांत अधिकाधिक होत जाईल; आणि उलट पक्षी इंग्लिशांस लागणारे कच्चे पदार्थ व धान्यें ह्यांचा पुरवठाहि त्यांना हिंदुस्थानांतून अधिकाधिक होऊं लागेल. हिंदुस्थानांतील लोक जितका जितका अधिक माल उत्पन्न करूं लागतील, तितका तितका ते ब्रिटिश