पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( १९ )

तील लोक एकमेकांचा द्वेष करितात, व एकमेकांस तुच्छ मानितात. कुणबी वगैरे हलक्या जातींतील मनुष्य ज्यांतलें पाणी प्याला आहे, अशा उष्टया भांड्यास ब्राह्मण किंवा क्षत्रिय वगैरे उच्च जातींतील एखाद्या मनुष्याचा स्पर्श झाला तर तो आपणास विटाळ झाला असें समजतो. मुसलमानांत देखील ह्याप्रमाणें धर्मसंबंधी मोठाले भेद आहेत; आणि जात, भाषा व धर्म हीं तिन्ही ज्याचीं एकच आहेत, असा हिंदुस्थानांतल्या लोकांचा एक देखील महत्त्वाचा वर्ग सांपडणार नाहीं.
 अशी ही विलक्षण वस्तुस्थिति कशाने घडून आली, असा प्रश्न सहजच उद्भवतो. ह्याचें उत्तरहि स्पष्ट आहे. निरनिराळ्या राष्ट्रांनीं ह्या देशावर अनेक वेळां स्वा-या करून हा देश जिंकिला, व त्यामुळेच देशाची अशी स्थिति झाली आहे. तसेंच ह्या स्वाऱ्यांमुळे देशाचें फारच नुकसान झालें आहे. हिंदुस्थानांतील मूळचे लोक, त्यांना ज्यांनीं प्रथम जिंकिलें ते लोक, त्यांनाहि पुन्हा दुस-या लोकांनीं येऊन जिंकिलें ते लोक, अशी ही मोठी परंपरा असून हे लोक हिंदुस्थानांत राहत गेल्यामुळे अनेक भाषा, अनेक जाति आणि अनेक धर्म देशांत उसन्न होणें साहजिकच आहे. ह्यापुढें दुसरा असा प्रश्न उसन्न होतो कीं,हिंदुस्थानावर अनेक स्वा-या कां झाल्या ?
 हिमालय पर्वताच्या योगानें हिंदुस्थान देश ज्या देशांपासून निराळा झाला आहे, त्या देशांशी ह्याची