पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६४)

ह्यावर कित्येक असे म्हणतील कीं, एलिझाबेथ राणीच्या वेळी जरी इंग्लंद अगदी लहान होतें, तरी तेव्हां इंग्लिशांचें चांगलें चाललें होतें; तेव्हां पुन्हा कदा- चित् तें तेवढेच झालें तरी त्यांचें चांगलें कां चालणार नाहीं ? ह्यावर उत्तर इतकेंच आहे की, एलिझाबेथच्या काळी इंग्लिशांचें विशेष चांगल्या रीतीनें चाललें होतें, असे त्यांच्या पूर्वजांना वाटत नव्हतें, व म्हणून राष्ट्राचा विस्तार करण्यासाठीं हरएक प्रकारची खटपट त्यांनी केली. शिवाय लहान लहान राष्ट्रांना लहान मुलांची उपमा देतात; आणि अशा रीतीनें त्यांचा चांगलेपणा दर्शवितात.आतां लहान मुले लहान मुलांत आहेत तोपर्यंतच आनंदांत असतात; परंतु मोठ्या माणसांत जर तीं मिसळली, तर त्यांना इजा पोहोचण्याचा फार संभव असतो. तेव्हां युनाय्तेद स्वेत्स हीं संस्थानें ज्याप्रमाणें परस्परांस चिकटून राहण्याचा प्रयत्न करितात, त्याप्रमागेंच परस्.रांस चिकटून राहण्याचा प्रयत्न करणे ब्रिटिश वसाहतींना व मुलखांना हितावह आहे, हे उघड आहे. स्वतंत्र झाल्यानें मोठमोठ्या राष्ट्रांकडून व्यापारा- संबंधानें किंवा राजकीय संबंधानें त्यांना फार त्रास पोहों- चणार आहे; म्हणून ह्याचा विचार ब्रिटिश राष्ट्रांतील प्रत्येक वसाहतीनें व देशानें करणें अवश्य आहे.

 परंतु कित्येक इंग्लिश लोक म्हणतील कीं, "इं ग्लंदशी संबंध ठेवण्याची इच्छा वसाहतींनीं करण हे त्यांच्याच फायद्याचे आहे. पहा, आम्ही त्यांना