ह्या प्रश्नाचा वर वर विचार केला तर असे वाटेल
की, ब्रिटिश बेटांतील वाढत चाललेले लोक ब्रिटिश वसाहतीं-
त राहण्यास जावोत, किंवा युनाय्तेद स्तेत्समध्ये राहण्यास
जावोत; ते ब्रिटिश बेटें सोडून गेले म्हणजे झालें. बाहेर
बाह्य प्रदेशीं जाणा-
या लोकांनी इतर
देशांत जाऊन राह-
ण्यापेक्षां ब्रिटिश व
साहतींतच जाऊन
राहवें, ह्या गोष्टीचें
महत्त्व.
कोणत्याहि देशांत गेले तरी त्या-
पासून इंग्लिशांचें नफा नुकसान
कांहीं नाहीं.
देश सोडून गेला म्हणजे
तच देशांतील इतर मजुरदारांना
एखादा मनुष्य
अर्था
एक जागा रिकामी झाली. म्हणून ज्याला कामधंदा मिळत
नसेल असा एखादा मनुष्य त्याची जागा घेईल. ह्यामुळे
हा दुसरा मनुष्य निरुद्योगी राहिला असता तर देशांतील
भिक्षेकऱ्यांच्या संख्येंत आणखी जी एक भर पडली
असती, तिर्चे भय नाहींसें झालें. तेव्हां वाढत चाल-
लेला लोकसमूह परदेशी राहण्यास गेल्यानें देशांतील
भिक्षेकऱ्यांची संख्या कमी होत जाईल, हा त्यापासून एकच
फायदा जरी असता, तरी देखील हा प्रश्न फारच महत्त्वाचा
समजणें अवश्य होतें. परंतु हा फायदा एकंदर फाय-
द्याच्या निमेच आहे. आणखी दुसरा फायदा आहे;
तो असा. एखादा मनुष्य इंग्लंद सोडून दुसऱ्या देशांत
राहण्यास चालता झाला म्हणजे त्याचा व इंग्लंदचा संबंध
अगदी तुटला असे होत नाहीं. इंग्लंदांत तो असतो
तेव्हां तो तेथील जिनसांचा उत्पादक असतो; परदे-
शांत जाऊन राहिला कीं, ग्राहक बनतो. अ इंग्लंड
पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/163
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६१)