पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१५१)

वाढतो. [ २ ] त्यांच्या वाढत चाललेल्या लोक समू- हाला राहण्यास त्यांचा उपयोग होतो. [३] वसाह- तींच्या ऐवजी जर तितकीं लहान लहान स्वतंत्र संस्था- नच इंग्लिश लोकांचीं असतीं, तर जी योग्यता त्यांना जगांत प्राप्त झाली असती, त्यापेक्षा जास्त योग्यता ते व त्यांच्या वसाहती एकत्र असल्यामुळे प्राप्त झाली आहे. आतां अनुक्रमानेंच वरील उपयोगांचा विचार करूं.

 प्राचीन काळी लोकांची मुख्यत्वें अशी समजूत होती की, वसाहती ताब्यांत असल्यानें मूळ देशांतील व्यापारा- च्या जिनसांच्या खपाला अधिक जागा होते. म्हणून व्यापारासंबंधानें जे कायदे मूळ देश ठरवीत, त्यांमुळे वसाहतींना मूळ देशांशीं व्यापार करण्याची मात्र मोकळीक त्या काळी असे. हल्लीं असा प्रतिबंध इंग्लि- शांनी ठेविलेला नाही. म्हणून अशा स्थितींतहि व्यापा- वसाहतींबरोबरच्या ब्रिटिश व्यापाराचें महत्त्व. विचार केला पाहिजे: रासंबंधानें त्यांच्यापासून फायदा होत आहे की काय, हे पाहिले पाहिजे. हें लक्षांत येण्यासाठी पुढील प्रश्नांचा – ( १ ) वसाहतींशी त्यांचा सांप्रत व्यापार किती आहे ? ( २ ) पूर्वी होता त्यापेक्षा जास्त आहे किंवा कमी आहे : ( ३ ) तो वाढण्याचा संभव आहे किंवा कमी होण्याचा संभव आहे ? ह्या प्रश्नांची उत्तरें ठरविण्यासाठी आंकड्यांचा उपयोग करावा लागेल; व तो जितक्या सुलभ रीतीनें करितां येईल तितक्या सुलभ