कडून त्रिनिदाद बेट इंग्लिशांस मिळालें, व डच लोकांकडून
सीलोन मिळाले. युद्ध सुरू असतां माल्टा बेट इंग्लिशांनी
घेतलें होतें, व तें तेव्हांपासून त्यांच्याच ताब्यांत आहे.
युद्धाचा दुसरा भाग १८०४ पासून १८१५
पर्यंत सुरू होता. पहिल्या भागांत इंग्लिशांनींच फ्रेंचां-
च्या प्रजासत्ताक राज्यावर स्वारी केली होती; परंतु ह्या
दुसऱ्या भागांत नपोलियन इंग्लंदावर स्वारी करण्याच्या
विचारांत होता, म्हणून त्या स्वारीपासून देशाचें संरक्षण
करणे, इतकेंच इंग्लिशांचे काम होते. युरोपांत इंग्लि-
शांच्या ताब्यांत जेवढा प्रदेश होता, तेवढेच काय तें
नेपोलियन ह्याच्या-
बरवर यु केल्या
मुळे मिळालेल्या
वसाहती.
इंग्लिश राष्ट्र, असें नेपोलियन मानीत
नसे; तर सर्व पृथ्वीभर त्या राष्ट्राचा
जो विस्तार झाला होता, तो ध्यानांत
आणून त्याच्या महत्त्वाचा अंदाज तो करीत असे; आणि
हिंदुस्थान व इतर इंग्लिश वसाहती ह्यांवर हल्ला करून
त्यांची पृथ्वीवर सर्वत्र पसरलेली ही सत्ताच नष्ट करण्याचा
त्याचा मुख्य उद्देश होता. “ ह्या जुन्या युरोपाचा मला
कंटाळा आला आहे,” असे तो म्हणे; व राष्ट्रांच्या
सत्तेची ह्यापुढे तुलना करावयाची ती युरोपांतील त्यांच्या
महत्त्वावरूनच करावयाची नसून सर्व पृथ्वीवर त्यांचें जें
महत्त्व असेल त्याप्रमाणे करावयाची, अशी त्याची सम-
जूत झाली होती, असा त्याच्या ह्या म्हणण्याचा गर्भित
हेतु होता. इंग्लिशांच्या सुदैवानें नेपोलियन ह्यांचे इंग्लंद