पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१३१)


जिंकण्याचे बेत निष्फळ झाले. त्याची कारणे दोन होतींः- [ १ ] ज्यांच्या योगानें इंग्लिशांस समुद्रावरील वर्चस्व प्राप्त झालें, ते नेलसन ह्यानें मिळविलेले जय, व [ २ ] युरोपांतील इतर राष्ट्रांना पैशाचा पुरवठा करून त्यांना नेपोलियनाबरोबर वारंवार लढण्यास लावून त्याचें बहुतेक सामर्थ्य युरोपांतील इतर राष्ट्रांशी लढण्यां- तच खर्च व्हावें, अशी इंग्लंदानें केलेली युक्ति. ह्या युद्धा- मुळे २७,७०,००,००० पौंड कर्ज वाढलें, परंतु ह्यामुळेच इंग्लिशांना हिंदुस्थानापर्यंत मजल मारण्याचे सामर्थ्य आर्ले; व फ्रान्सच्या ताब्यांतील घेण्यासारखीं जी थोडीं बहुत ठिकाणें होतीं, तीं घेतां आली. त्याचप्रमाणे कोणत्याहि प्रकारचा अडथळा न येतां दक्षिण गोलार्धात नवीन वसाहतींचें राज्य स्थापण्याचा आरंभ करण्याचेंहि सामर्थ्य त्यांना ह्या युद्धामुळेच आलें.

 टोबागो, सेंत लूसिया, व आइल् आफ् फ्रान्स [ ह्यालाच मारिशस म्हणतात ] हीं बेटे इंग्लिशांस फ्रेंचांद- रोचरच्या युद्धाच्या ह्या दुसऱ्या भागामुळेच मिळाली. ह्या सर्व बेटांत साखरेचें उत्पन्न मोठें आहे, तसेंच केप आफ गुड होप, डेमेरारा, एसेक्कीचो व बरबाइस हीं ठिकाणेंहि ह्याच सुमारास इंग्लिशांनी डच लोकांपासून घेतली,

 वाटलूच्या लढाईनंतर इंग्लिशांच्या सांप्रतच्या वसा हतींसंबंधी राज्याची मर्यादा पूर्णपणे ठरली, असे म्हण-