पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.djvu/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१२४)

इंग्लिश वसाहतींतील लोकांस अर्थातच त्यामुळे राग आला; व युरोपांत इंग्लिश व फ्रेंच ह्यांचें सख्य असले तरी देखील वसाहतींतील त्या त्या लोकांत नेहमीं लढाया होऊं लागल्या. ह्यामुळे प्रशियाच्या राजाचा पक्ष धरून त्याला फ्रेंचांबरोबर लढण्यास इंग्लिशांनी द्रव्यद्वारें मत केली. त्यापासून आपणांस कोणता फायदा होईल अशी आशा त्यांना उत्पन्न झाली असेल बरें ? ह्याप्रमाणें सर्व लक्ष युरोपांतील लढाईतच गुंतविलें असतां त्या लांबच्या वसाहतींतील लोकांस मदत पाठविण्याची गोष्ट त्यांच्या हातून होणार नाहीं; व ह्यामुळे सदर्ह मुदतींत वसाहतींतील फ्रेंचांचे नुकसान करून आपला नफा करून श्रेण्याची संधी आपल्या वसाहतींतील लोकांस आयतीच मिळेल, अशी आशा इंग्लिशांना उत्पन्न झाली. हा परिणाम इंग्लिशांनीं प्रशियाच्या राजाचा पक्ष स्वीकारिल्यामळेच झाला हे उघड आहे. कांहीं काळानें स्पेन देशानेहि कान्सच्या तर्फेनें ह्या युद्धांत आंग घातलें, व ह्यामुळे स्पेच्या वसाहतींवरहि हल्ला करण्याची संधी इंग्लिशांस मिळाली.

 १७६३ त झालेल्या तहामुळे हें युद्ध संपलें. तिसरा जार्ज व त्याच्या पक्षाची मंडळी ह्यांनीं हा तह केला; व ह्यांतील कलमें आपणांस जितकीं अनुकूळ अस- णें अवश्य होतें तितकीं अनुकूळ नाहींत, असा मागील वेळेप्रमाणें ह्या वेळींहि लोकांनीं गिल्ला केला. युद्ध सुरू असतां इंग्लिशांनीं फ्रेचांच्या ताब्यांतील बहुतेक वेस्त इंदीज बेटे घेतलीं होतीं; व वरील तहामुळे ही त्यांची त्यांस परत