फायदे होण्याचा संभव दिसल्यामुळेच त्या लढायांस
पैसा खर्च करण्याची मंजुरी पार्लमेंटानें खुषीने दिली.
परंतु फ्रान्स देश अजिबात कायमचा जिंकणे अशक्य
आहे, अशी कांहों काळानें पार्लमेंटाची खात्री झाली.
तेव्हां * डोंगर पोखरून उंदीर काढिल्याप्रमाण आपले
कृत्य होईल, असे समजून पार्लमेंटानें तो नाद सोडून
दिला. ह्या लढायांपासून तादृश फायदा झाला नाहीं,
अशी पार्लमेंटाप्रमाणे राजांचीहि समजूत झाली होती,
परंतु प्रजेची झाली नव्हती, व युद्ध सुरू ठेवण्याविषयीं
तिची ओरड सुरूव होती. ही गोष्ट लक्षांत ठेवण्या-
सारखी आहे.
नंतर दुसरा काळ म्हणजे फ्रेंचांशी सख्य अस-
ल्याचा काळ आला. आतां राजांच्या आंगची महत्त्वा-
कांक्षा कमी झाली, म्हणून हा काळ प्राप्त झाला असे
नाहीं; तर इंग्लिशांची फ्रान्स देश जिंकून घेण्याची कल्प-
ना स्वप्नवत् झाली, बेलजम देश स्पेन देशाच्या ताब्यांत
गेला, व इंग्लिश व्यापारी अमेरिकेत व्यापाराची ठाणी
• बसविण्याच्या प्रयत्नांत गुंतले; ह्या कारणांमुळे फ्रेंच लो-
कांबरोबरच्या लढाया बंद होऊन हा शांततेचा काळ
आला. अमेरिका खंडांतील ह्या खटपटींमुळे इंग्लिशांस
फ्रेंचांशी लढण्याचा प्रसंग आला नाहीं; तर स्पेन व
हालंद ह्या देशांशी आला.
- "The game is not worth the candle " ही
इंग्लिश पुस्तकांतील ह्या अर्थाची म्हण होय.