१९२ हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास स्वतः लिहिलेले पत्र आलें. ((A Letter from the Rajah, written by himself to Raoji) त्यांत शिवाजी ४०० निवडक लोकांसह जातीने इस्तेखानाच्या तळावर गेला त्याची हकीगत आहे. -३- नं. १६४० ८ मे १६७४ नारायण शेणव्याकडून तहाबद्दलचे शिवाजीच्या सहीचे (Signed by Sevagy) कागद आले. त्यांचे भाषांतर करून पहातां, पूर्वी ठरल्यापेक्षा कित्येक गोष्टी अधिक घातलेल्या दिसून आल्यामुळे, कांहीं अवश्य दुरुस्त्या पुढे मांडल्या.. | अभ्यास :--हे उतारे वाचुन शिवाजीच्या साक्षरतेसंबंधीं तुमचे मत काय झालें तें कारणासह सांगा. डफच्या मतानुयायी लोकांचे समाधान कोणत्या साधनांनीं होईल ? । संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग [आज्ञापत्र प्रकरण ८ वें. वीणा प्रकाशन प्रत (इ. स. १९३९ पृ. ३४ ते ४३]. प्रस्तुत आज्ञापत्र रामचंद्रपंत अमात्य यांनी राज्याभिषेक शक ४२ म्हणजे (इ. स.१६७४+४२) इ. स. १७१६ त छत्रपति राजारामाचा मुलगा कोल्हापूरचा संभाजी याचे आज्ञेवरून लिहिलें असें सामान्यतः । मानले जाते. पण हा सामान्य समज फारच डळमळीत करणारे पुरावे त्या आज्ञापत्रांतच आहेत. पण मग ते कोणाचे ? याचा मात्र छडा लावतां येत नाहीं. अशी आजची या विषयावरील संशोधनाची स्थिति आहे. आज्ञापत्राचा लेखक कोणीहि असो. त्यांतील वाक्य वाक्य इतके अनुभवावर व राजनैतिक तत्त्वावर आधारलेले आहे की त्यामुळे शिवकालीन शासनशास्त्रावरील, तो एक वहुमोल ग्रंथच होय. खेरीज अठराव्या शतकांतोल, प्रगत आणि जिवंत मराठी गद्यांचा तो एक नमुनाच होय. ] संपूर्ण राज्याचे सार तें दुर्ग. दुर्ग नसतां मोकळा देश परचक्र येतांच निराश्रय, प्रजा भग्न होऊन देश उद्वस होतो. देश उद्वस झाल्यावरहि राज्य असे कोणास म्हणावे ? या करितां पूर्वी जे जे राजे झाले त्यांणी आधीं देशामध्ये १ ओसाड, ३६]